AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पिंपरी चिंचवडमध्ये पाणीबाणी; नागरिकांसाठी पालिकेचा मोठा अलर्ट

एकीकडे कोरोनाचं संकट तर आता दुसरीकडे पिंपरी चिंचवडकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये पाणीबाणी; नागरिकांसाठी पालिकेचा मोठा अलर्ट
| Edited By: | Updated on: Oct 06, 2020 | 9:37 AM
Share

पिंपरी चिंचवड : राज्यात आधीच कोरोनाच्या महामारीमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अशात पुण्यात कोरोनाचा सगळ्यात जास्त धोका आहे. एकीकडे कोरोनाचं संकट तर आता दुसरीकडे पिंपरी चिंचवडकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आज आणि उद्या पाणी पुरवठा बंद राहणारा असल्याचं महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे. (water supply will be cut off today and tomorrow in pimpri Chinchwad)

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा दिला जाणाऱ्या रावेत इथल्या जलउपसा केंद्रातील उच्चदाब वीज संच मांडणीचं अचानक काम उद्भवलं आहे. उपस्कर वाहिनीचे तातडीने दुरुस्तीचं काम करण्यात येणार असल्याने संपूर्ण शहरात पाणी पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती आहे.

पालिकेने सांगितल्यानुसार, आज सकाळी 11 ते 12.30 या कालावधी जलउपसा बंद राहणार आहे. त्यामुळे 12 नंतरचा, सायंकाळचा आणि रात्रीचा तसंच दूसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी सकाळचा संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा कमी दाबाने किंवा विस्कळीत राहणार आहे. त्यामुळे चिंचवडकरांनी याची दक्षता घेत पाण्याचा अपव्यय टाळावा आणि पुरेसा पाणीसाठा घरात भरून ठेवावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

नागरिकांनी उपलब्ध पाणी जपून वापरून महानगरपालिकेस सहकार्य करण्याचं आवाहन महापालिका पाणी पुरवठा विभागाकडून करण्यात आलं आहे. (water supply will be cut off today and tomorrow in pimpri Chinchwad)

खरंतर, यंदा झालेल्या चांगल्या पावसामुळे पुणेकरांची तहान भागवणारी सर्व धरणं चांगली भरली आहेत. त्यामुळे वर्षभरासाठी पुणेकरांची तहान भागली असं म्हणायला हरकत नाही. गेल्या महिन्यात झालेल्या पावसाने चारही धरणांतील पाणीसाठा वाढला आहे. चारही धरणांमध्ये ऑगस्ट महिन्यापर्यंत 18.13 टीएमसी म्हणजेच 62.21% टक्के पाणीसाठा होता, आता त्यामध्ये आणखी वाढ झाली आहे. त्यामुळे पुणेकरांची वर्षभर तहान भागणार आहे. पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली असली तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कमी जलसाठा आहे.

गेल्या वर्षीच्या 29.15 टीएमसी म्हणजेच 100 टक्क्याच्या तुलनेत जलसाठा कमी आहे. त्यामुळे यंदा धरण पूर्ण भरल्यास जिल्ह्यातील शेतीच्या पाण्याची चिंता मिटणार आहे. जुलै महिन्यात पाणी साठा कमी झाल्यानं पाणी कपातीची टांगती तलवार होती.

इतर बातम्या – 

ट्रम्प खरंच कोरोना पॉझिटिव्ह होते की होता पॉलिटिकल स्टंट? अमेरिकेत चर्चेला उधाण
Alert! ताशी 24046 किमी वेगाने पृथ्वीच्या दिशेने येतोय लघुग्रह, विमानाइतका आहे आकार

(water supply will be cut off today and tomorrow in pimpri Chinchwad)

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.