AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पावसाची प्रतिक्षा संपणार, पुढील चार दिवसासाठी पावसाचा यलो अलर्ट

राज्यात काही भागात पावसाचं जोरदार आगमन झालं होतं. त्यानंतर मात्र पावसाने दडी मारल्याचं दिसून आलं. अशातच हवामान खात्याने पावसाची प्रतीक्षा संपणार असल्याचा दावा केला आहे. तर शेकऱ्यांनाही सल्ला दिला आहे.

पावसाची प्रतिक्षा संपणार, पुढील चार दिवसासाठी पावसाचा यलो अलर्ट
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Jun 18, 2024 | 4:20 PM
Share

यंदा राज्यभर मान्सूनपूर्व पावसाने राज्यात हजेरी लावलेली पाहायला मिळालं होतं. मात्र पावसाने सर्व ठिकाणी हजेरी लावलेली दिसली नाही. गेल्या तीन ते चार दिवसांपासून महाराष्ट्रातील काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडत आहे. पूर्व विदर्भ आणि नंदूरबारमध्ये मान्सून अद्याप दाखल झालेला नाही. अशातच पुणे हवामान विभागाचे प्रमुख के. एस. होसराळीकर यांनी पावसबाबत अपडेट दिली असून शेतकऱ्यांनाही कृषी विभागाचा सल्ला घेऊन पेरणी करावी असं आवाहन केलं आहे.

के. एस. होसराळीक काय म्हणाले?

पुढील तीन-चार दिवस विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि कोकणामध्ये हवामान विभागाने येलो अलर्ट दिलाय. हवामान विभागाच्या अंदाजानुसार गेल्या तीन चार दिवसापासून महाराष्ट्रातील काही भागात मेघगर्जनेसहर पाऊस पडतोय. मात्र मान्सून पूर्णपणे राज्यात सर्व दूर दाखल झालेला नाही. नंदुरबार, पूर्व विदर्भात अजून मान्सूनची प्रतीक्षा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामान विभाग आणि कृषी विभागाचा सल्ला घेऊनच पेरणी करण्याचा आवाहन करण्यात आलय. राज्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय. तसा पाऊस पडत असल्याचे हवामान विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी म्हटलं आहे.

कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडतोय. हवामान विभागाने येल्लो अलर्ट दिलेला आहे. तरीही मान्सून सर्वदूर महाराष्ट्रात आणखी पोहोचला नसल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

दरम्यान, आता खरीप हंगामातील पिकांसाठी पेरणी महत्त्वाची आहे. कारण जर पेरणी केली आणि पावसान दडी मारली तर शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट असणार आहे. त्यामुळे होसाळीकर यांनी कृषी विभागाचा सल्ला घेऊन शेतकऱ्यांना पेरणी करावी असं म्हटलं आहे.

Follow Us
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे  पुण्यात विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर आता पुणे पोलिसांनी अवैध दारू अड्ड्यांविरोधात मोठी मोहीम सुरू केली आहे. शहरात कुठेही अवैध मद्यविक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यास तातडीने कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे. अवैध दारू विक्री, वाहतूक आणि साठवणूक करणाऱ्यांविरोधात विशेष पथक तयार करण्यात आले आहे.  यासंदर्भात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत केवळ किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई न करता संपूर्ण नेटवर्क उद्ध्वस्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दारू अड्ड्यांना माल पुरवणारे, वाहतूक करणारे आणि आर्थिक मदत करणाऱ्यांवरही पोलिसांचा फोकस असणार आहे.  पुण्यातील विविध भागांमध्ये पोलिसांनी तपास मोहीम सुरू केली असून संशयित ठिकाणांची झडती घेतली जात आहे. अनेक अवैध अड्ड्यांची माहिती पोलिसांकडे जमा होत असून लवकरच मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे. नागरिकांनीही अवैध दारू विक्रीची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल
Mumbai Shivsena UBT Protest | महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल
अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
Monsoon Update | अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती जागांवर चुरशीची लढत
नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
Vidhan Parishad Election | शेवटच्या मिनिटाला मोठा ट्विस्ट! नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
तिकडे नोटीस आली, इकडे उमेदवारी अर्ज मागे, शिवसेनेच्या उमेदवाराने...
धक्कादायक! तिकडे नोटीस आली, इकडे उमेदवारी अर्ज मागे, शिवसेनेच्या उमेदवाराने...संभाजीनगरात हाय वोल्टेज ड्रामा!