AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुर्घटनाग्रस्त इर्शाळवाडीतून उद्धव ठाकरे यांची सर्वच राजकीय पक्षांना साद; म्हणाले…

उद्धव ठाकरे दुर्घटनाग्रस्त इर्शाळवाडीत दाखल; स्थानिकांशी संवाद साधताना म्हणाले, दुर्घटनाग्रस्त इर्शाळवाडीत मीही जाऊ शकतो पण...

दुर्घटनाग्रस्त इर्शाळवाडीतून उद्धव ठाकरे यांची सर्वच राजकीय पक्षांना साद; म्हणाले...
| Updated on: Jul 22, 2023 | 1:56 PM
Share

इर्शाळवाडी, रायगड | 20 जुलै 2023 : रायगडमध्ये जिल्ह्यातील खालापूरजवळ गुरूवारी 20 जुलैला दरड कोसळली. या दरडीखाली अख्ख इर्शाळवाडी गाव दबलं गेलं. अशात आज तिसऱ्या दिवशीही तिथं शोध मोहिम सुरू आहे. ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी इर्शाळवाडी गावाला भेट दिली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. विविध मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलंय.

उद्धव ठाकरे यांनी इर्शाळवाडीत जात स्थानिकांशी संवाद साधला. त्यांना धीर दिला. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असा शब्द दिला. सोबतच सर्वपक्षीय नेत्यांना त्यांनी एक आवाहन केलं आहे.

दरवर्षी अशा घटना घडत आहे. असं काही घडलं की मग आपण खडबडून जागे होतो. त्यासाठी धावपळ करतो. या घटनेत मी राजकारण करू इच्छित नाही. पण राजकारणी मंडळींसाठी ही लाजीरवाणी बाब आहे. सर्वच पक्षांनी राजकारण बाजूला ठेवून एकत्र आलं पाहिजे. दरड कोसळण्याच्या घटना वारंवार होता कामा नयेत, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

मी मुख्यमंत्री असताना मी प्रयत्न करत होतो. अशा दुर्गम आणि धोकादायक भागातील लोकांचं आसपासच्या सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केलं पाहिजे. हे घडायला हवं. एकत्र येऊन अशा भागातील लोकांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

आपण सध्या इर्शाळवाडीच्या पायथ्याशी आहोत. इथून काही अंतरावर इर्शाळवाडी गाव आहे. या गावात दुर्घटनास्थळी जायला मी जाऊ शकतो. पण मी तिथं गेलो की सोबतची माणसं येणार त्यामुळे वरती गर्दी होणार. शोधकार्यात अडथळा येणार. त्यामुळे मी तिथं जाणं टाळतो आहे. NDRF च्या जवानांना त्यांचं काम करू द्या. इथं शोधकार्य लवकरात लवकर पूर्ण होणं आणि लोकांना मदत मिळणं गरजेचं आहे. त्यासाठी इर्शाळवाडी या दुर्घटनाग्रस्त ठिकाणी जाणं मी टाळतो आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्रात आजही अनेक वाड्या-वस्त्या, गावं डोंगराच्या पायथ्याशी आहेत. तळीये गावातही मी गेलो होते. तेव्हा पाहिलं की होत्याचं नव्हतं झालं होतं. आताही इर्शाळवाडीची तीच अवस्था आहे. लोकांशी बोललो. त्यांच्या वेदनांशी मी सहमत आहे. पण बोलण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. कोणत्या शब्दात त्यांचं सांत्वन करू कळत नाहीये, असं उद्धव ठाकरे म्हणालेत.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.