AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई, पुणे, रायगड, सातारा, रत्नागिरीत ऑरेंज अलर्ट, खडकवासला, गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग

राज्यात 25 जूनपर्यंत पाऊस असणार आहे. शुक्रवारी राज्यातील काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. पुण्यातील घाट विभागात पुढील दोन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मुंबई, पुणे, रायगड, सातारा, रत्नागिरीत ऑरेंज अलर्ट, खडकवासला, गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग
खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्गImage Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Jun 20, 2025 | 7:30 AM
Share

Rain Alert: राज्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे. कोकण, पुणे, मुंबईसह मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. राज्यात 25 जूनपर्यंत पाऊस असणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. पुणे जिल्ह्यातील घाट विभागात पावसाचा अधिक जोर असणार आहे. या भागात मुसळधार पावसाने 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे. मुंबई, पुणे, रायगड, सातारा, रत्नागिरीत ऑरेंज अलर्ट दिला आहे.

पुणे जिल्ह्यातील घाट विभागात पावसावर वाढला आहे. गेल्या 24 तासांत तामिनी घाट परिसरात हंगामातील सर्वाधिक तब्बल 230 मीटर पावसाची नोंद झाली. लोणावळा, शिरगाव, वळवण, अंबावणे, खोपोली, खंद परिसरात 150 ते 200 मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. पुण्यातील घाट विभागात पुढील दोन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे ऑरेंज देण्यात आला असून पर्यटकांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.

खडकवासलातून विसर्ग वाढवला

पुणे येथील खडकवासला धरणातून रात्री उशिरा विसर्ग वाढविला आहे. धरण परिसरात जोरदार पाऊस झाल्याने 1.71 टीएमसीने पाणी वाढले आहे. खडकवासला, टेमघर, वरसगाव आणि पानशेत या चार धरणांच्या पाणलोट परिसरात मागील 24 तासांत जोरदार पाऊस झाल्याने धरणांचा पाणी पातळी झपाट्याने वाढ होत आहे. खडकवासला धरण 84 टक्के भरल्याने खबरदारीचा उपाय म्हणून धरणातून पाणी सोडण्यात सुरुवात झाली. रात्री 11 वाजता 15,000 हजार क्यूसेक्सने विसर्ग सुरु करण्यात आला.

नाशिकमध्ये दुतोंड्या मारुतीच्या पायाजवळ पाणी

नाशिकमध्ये जोरदार पाऊस झाल्यामुळे गंगापूर धरणातून सकाळी 530 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. दारणा धरणातून 4742 क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. गोदाघाट परिसरातील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नाशिकच्या दुतोंड्या मारुतीच्या पायाजवळ पाणी आले. मध्यरात्रीपासून नाशिकमध्ये पावसाने विश्रांती घेतली आहे. परंतु धरणातून पाण्याचा विसर्ग होणार असल्याने गोदाघाट परिसरात पुन्हा अलर्ट दिला आहे.

आंबेनळी घाटाबाबत महत्वाचा निर्णय

सातारा जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून पश्चिम भागातील घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. यामुळे सातारा आणि रायगड जिल्हा प्रशासनाच्या वतीने महाबळेश्वर ते पोलादपूर जोडणारा आंबेनळी घाट संध्याकाळी सात वाजल्यापासून सकाळी सात वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मागील दोन दिवसांपासून महाबळेश्वरपासून पोलादपूर घाटात रायगड हद्दीत दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे आणि धुक्याचे प्रमाणही वाढल्याने प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी पत्रकारद्वारे दिली आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.