AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई, पुणे, रायगड, सातारा, रत्नागिरीत ऑरेंज अलर्ट, खडकवासला, गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग

राज्यात 25 जूनपर्यंत पाऊस असणार आहे. शुक्रवारी राज्यातील काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. पुण्यातील घाट विभागात पुढील दोन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मुंबई, पुणे, रायगड, सातारा, रत्नागिरीत ऑरेंज अलर्ट, खडकवासला, गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग
खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्गImage Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Jun 20, 2025 | 7:30 AM
Share

Rain Alert: राज्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे. कोकण, पुणे, मुंबईसह मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. राज्यात 25 जूनपर्यंत पाऊस असणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. पुणे जिल्ह्यातील घाट विभागात पावसाचा अधिक जोर असणार आहे. या भागात मुसळधार पावसाने 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे. मुंबई, पुणे, रायगड, सातारा, रत्नागिरीत ऑरेंज अलर्ट दिला आहे.

पुणे जिल्ह्यातील घाट विभागात पावसावर वाढला आहे. गेल्या 24 तासांत तामिनी घाट परिसरात हंगामातील सर्वाधिक तब्बल 230 मीटर पावसाची नोंद झाली. लोणावळा, शिरगाव, वळवण, अंबावणे, खोपोली, खंद परिसरात 150 ते 200 मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. पुण्यातील घाट विभागात पुढील दोन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे ऑरेंज देण्यात आला असून पर्यटकांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.

खडकवासलातून विसर्ग वाढवला

पुणे येथील खडकवासला धरणातून रात्री उशिरा विसर्ग वाढविला आहे. धरण परिसरात जोरदार पाऊस झाल्याने 1.71 टीएमसीने पाणी वाढले आहे. खडकवासला, टेमघर, वरसगाव आणि पानशेत या चार धरणांच्या पाणलोट परिसरात मागील 24 तासांत जोरदार पाऊस झाल्याने धरणांचा पाणी पातळी झपाट्याने वाढ होत आहे. खडकवासला धरण 84 टक्के भरल्याने खबरदारीचा उपाय म्हणून धरणातून पाणी सोडण्यात सुरुवात झाली. रात्री 11 वाजता 15,000 हजार क्यूसेक्सने विसर्ग सुरु करण्यात आला.

नाशिकमध्ये दुतोंड्या मारुतीच्या पायाजवळ पाणी

नाशिकमध्ये जोरदार पाऊस झाल्यामुळे गंगापूर धरणातून सकाळी 530 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. दारणा धरणातून 4742 क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. गोदाघाट परिसरातील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नाशिकच्या दुतोंड्या मारुतीच्या पायाजवळ पाणी आले. मध्यरात्रीपासून नाशिकमध्ये पावसाने विश्रांती घेतली आहे. परंतु धरणातून पाण्याचा विसर्ग होणार असल्याने गोदाघाट परिसरात पुन्हा अलर्ट दिला आहे.

आंबेनळी घाटाबाबत महत्वाचा निर्णय

सातारा जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून पश्चिम भागातील घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. यामुळे सातारा आणि रायगड जिल्हा प्रशासनाच्या वतीने महाबळेश्वर ते पोलादपूर जोडणारा आंबेनळी घाट संध्याकाळी सात वाजल्यापासून सकाळी सात वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मागील दोन दिवसांपासून महाबळेश्वरपासून पोलादपूर घाटात रायगड हद्दीत दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे आणि धुक्याचे प्रमाणही वाढल्याने प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी पत्रकारद्वारे दिली आहे.

Follow Us
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर.
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले.
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले.
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची..
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची...
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा.
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल.
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना....
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना.....
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या...
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या....
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना.
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ.