AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घटकाभरच्या पावसाने अंधेरी सबवे तुंबला, पालिकेची पोलखोल, मान्सूनपूर्व पावसाने मुंबईकरांना उकाड्यातून दिलासा

मॉन्सून उद्या केरळमध्ये दाखल होणार आहे. मात्र, आजच मुंबईतील अनेक भागात पावसाने हजेरी लावली. ढग दाटून आली आहेत. त्यामध्येच अनेक भागात हलक्या ते मध्यम पावसाला सुरूवात झाली. हवामान विभागाने आज पावसाचा येलो अलर्ट जारी केला.

घटकाभरच्या पावसाने अंधेरी सबवे तुंबला, पालिकेची पोलखोल, मान्सूनपूर्व पावसाने मुंबईकरांना उकाड्यातून दिलासा
Mumbai Rain
| Updated on: Jun 03, 2026 | 9:53 AM
Share

मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. उपनगरातील दहिसर, बोरिवली, कांदिवली, मालाड आणि गोरेगाव परिसरात आज सकाळपासून हलक्या पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उष्णतेमुळे हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. मे हीटमुळे मुंबईकर सध्या घामाघूम झाले होते. मात्र, आज सकाळी दहिसर, बोरिवली, कांदिवली, मालाड आणि गोरेगाव भागात अचानक ढग दाटून आले आणि हलक्या सरी कोसळू लागल्या.  अचानक आलेल्या या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून उष्णतेपासून नागरिकांना आराम मिळाला आहे. मुंबईच्या जवळपास सर्वच भागात पावसाला सुरूवात झाली. दादर, खुर्ला, प्रभादेवी, लालबाग या परिसरात ढगाळ वातावरण अजून हलका पाऊसही कोसळत आहे.

कुर्ल्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. कुर्लात मुसळधार पावसाला सुरूवात झाली. केरळमध्ये आज मॉन्सून दाखल होईल. मात्र, मॉन्सून देशात दाखल होण्यापूर्वीच राज्यात पावसाला सुरूवात झाली. अनेक भागात मोठ्या प्रमाणाच ढग दाटून आलीत. भारतीय हवामान विभागाने आज पावसाचा अलर्ट जारी केला होता. पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला.

मागच्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये मोठी उष्णता होती. आता मुंबईकरांना उष्णतेपासून दिलासा मिळाला. एकाच पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला. जवळपास ठिकाणी ढगाळ वातावरण असून पाऊस वाढण्याची शक्यता आहे. फक्त मुंबईच नाही तर राज्यातील अनेक भागात आज भारतीय हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

अंधेरी सब-वेवच्या समस्येवर उपाय म्हणून महापालिकेनं उड्डाणपुल उभारण्याचा विचार केला होता. मात्र सल्लागाराच्या अहवालात उड्डाणपूलाचा पर्याय नापास ठरला. अंधेरी पूर्व-पश्चिमला जोडणारा महत्त्वाचा दुवा असलेला अंधेरी सब-वे पण पावसाळा आला की हमखास किमान 20 ते 35 वेळा तुंबतो. मोगरा नाला या समस्येचं मूळ आहे. उगमस्थानापासून अंधेरी सब-वेपर्यंत सुमारे अडीच किलोमीटर अंतरात नाल्याला तब्बल 13 मीटरचा उतार आहे. त्यामुळे पावसाचं पाणी वेगानं सब-वे परिसरात येतं.

अंधेरी भुयारी मार्गासह दाऊद बाग आणि आझादनगर परिसरात पूरसदृश स्थिती निर्माण होते. मात्र, यावर्षी मान्सून पूर्व पावसात अवघ्या काही वेळाचा पाऊस पडल्यानंतरही अंधेरी सबवे तुंबल्यानं मुंबईकरांची चिंता वाढलीय. मॉन्सून केरळमध्ये दाखल होत असला तरीही आजच मुंबईत दाखल झाल्यासारखे वाटत आहे. तसे वातावरण सर्वत्र आहे.

पालघरमध्येही पहाटेच पावसाला सुरूवात झाली. पहाटे ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू झाला. पावसाच्या सरींमुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. पालघरच्या ग्रामीण भागात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. पुढील काही वेळात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. सर्वत्र ढगाळ वातावरण आहे.

Follow Us
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात
पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर...
Manoj Jarange | पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर... जरांगेंनी सांगितली आंदोलनाची रणनीती!
विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी...
Kunbi Certificate Update | विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी महत्त्वाचे निर्णय, जरांगेंच्या डेडलाइनपूर्वी सरकारची तयारी
मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर...अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
Ambadas Danve | मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर... जरांगे पाटलांच्या खालावलेल्या प्रकृतीवर अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? रिसोडच्या तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप, नेमकं काय घडलं?