AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यात पाऊस घेणार ब्रेक, आता या तारखेनंतरच कोसळणार, IMD चा अंदाज काय?

राज्यात यंदा गत वर्षीपेक्षा जास्त पेरणी झाली आहे. यंदा 2 लाख 78 हजार 345 हेक्टर क्षेत्रावर अधिक पेरा झाला आहे. गेल्या वर्षी 1,94,827 हेक्टरवर पेरणी झाली होती. यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे.

राज्यात पाऊस घेणार ब्रेक, आता या तारखेनंतरच कोसळणार, IMD चा अंदाज काय?
| Updated on: Jul 14, 2025 | 7:57 AM
Share

राज्यात गेल्या काही दिवसांपासून सक्रीय असणारा पाऊस ब्रेक घेणार आहेत. राज्यातील काही भागांत तुरळक ते मध्यम पाऊस पडणार आहे. परंतु संपूर्ण राज्यातून मोठा पाऊस ब्रेक घेणार आहे. 17 जुलैपर्यंत पाऊस सुटीवर जाणार आहे. तसेच 20 जुलैनंतर राज्यात पुन्हा पाऊस सक्रीय होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. सध्या राज्यातील बहुतांश भागांत पावसाने उघडीप घेतली आहे.

पाऊस का घेणार ब्रेक?

प्रादेशिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात 17 जुलैपर्यंत पाऊस नसणार आहे. त्यानंतर जुलैच्या तिसर्‍या आठवड्यापासून पुन्हा पावसाला सुरुवात होणार आहे. सध्या अरबी समुद्रातून महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर धडकणारे मान्सून वारे कमकुवत झाले आहे. मान्सूनच्या पश्चिमी टोकाचेही काहीसे उत्तरेकडे सरकला आहे. बंगालच्या उपसागरात हवेचा दाब जुलै महिन्याच्या तिसर्‍या आठवड्यात अनुकूल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाऊस पुन्हा सक्रीय होणार आहे. राज्यात चार दिवस ऑरेंज आणि रेल अलर्ट कुठेही दिला नाही.

यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस

अंदामान निकोबार अन् केरळमध्ये मान्सून वेळेआधी दाखल झाला होता. त्यानंतर राज्यात यंदा मान्सून वेळेआधीच दाखल झाला. मे महिन्यात मान्सूपूर्व जोरदार पाऊस झाला होता. जून महिन्यात मराठवाडा, विदर्भ वगळता सर्वत्र चांगला पाऊस झाला. सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे धरणांमध्ये जलसाठा वाढला. जुलै महिन्याच्या सुरुवातीला पावासाने ओढ घेतला. परंतु जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून राज्यात सर्वत्र पाऊस झाला. विदर्भात अतिवृष्टी झाली. मराठवाड्यातील सर्व भागांत पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणी पूर्ण केली. आता काही दिवस पाऊस विश्रांती घेणार आहे. हवामान विभागाने यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.

राज्यात समाधानकारक पाऊस झाला आहे. त्यामुळे पेरण्या देखील झाल्या आहेत. राज्यात जवळपास ९० टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. पावसाच्या ब्रेक कालावधीत मशागतीच्या कामांना वेग येणार आहे. राज्यात यंदा गत वर्षीपेक्षा जास्त पेरणी झाली आहे. यंदा 2 लाख 78 हजार 345 हेक्टर क्षेत्रावर अधिक पेरा झाला आहे. गेल्या वर्षी 1,94,827 हेक्टरवर पेरणी झाली होती.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.