AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जेंझनी या सरकारच्या झिंज्या उपटल्या, राज ठाकरे यांची जोरदार टीका, म्हटले, सरकारने..

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून मुंबईमध्ये जल्लोष सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने लोक जमले. राज ठाकरे केंद्र सरकावर टीका करताना दिसले. आदित्य ठाकरे आणि आमित ठाकरेही यावेळी उपस्थित होते.

जेंझनी या सरकारच्या झिंज्या उपटल्या, राज ठाकरे यांची जोरदार टीका, म्हटले, सरकारने..
| Updated on: Jul 26, 2026 | 11:40 AM
Share

शिवसेना ठाकरे गटाते नेते उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज विजय जल्लोष सभा आयोजित केली. दादरमध्ये वीर सावरकर मार्गावर ठाकरे बंधूंनी जल्लोष सभेचे आयोजन केले. याची जोरदार तयारीही सुरू होती. मोठ्या प्रमाणात लोक या सभेत दाखल झाले. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी म्हटले की, तुम्ही जे आंदोलन अख्ख्या देशभर पेटवले. पेटवलेल्या ज्या आंदोलनाला यश आले, त्याचा उत्साह साजरा करायचा म्हणून तुम्ही सर्वजण इथे विजय साजरा करण्यासाठी जमले. या देशातील जेंझनी या सरकारच्या झिंज्या कशा उपटल्या हे आपल्याला या आंदोलनातून कळले. मी इथे आज एक महत्वाची गोष्टी नमूद करतो. आज नीटच्या परीक्षा, पेपरफुटीचे झालेले सर्व आंदोलन आणि त्यानंतर आपल्या देशभरात बसलेल्या परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. मी त्यांची आता नावे वाचून दाखवणार आहे.

यावेळी राज ठाकरे यांनी काही विद्यार्थ्यांची नावे वाचून दाखवली. यावेळी त्यांनी अनेक राज्यातील विद्यार्थ्यांची नावे वाचली. हे विद्यार्थी वेगवेगळ्या राज्यातील होती. राज ठाकरे यांनी पुढे म्हटले की, नीट पेपरफुटीनंतर 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. नीट परीक्षेच्या पेपरफुटीनंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांची नावे होती.

माझी सर्वांना नम्र विनंती आहे की, तुमच्या आंदोलनाला यश आले आणि हा उत्साह आपण सर्वजण साजरा करूच पण आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांसाठी आपण एक मिनिटे माैन धारून करून आणि शांत उभे राहू. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी आयोजित केलेल्या जल्लोष सभेत मोठ्या संख्येने विद्यार्थी जमा झाले आहेत. नीट परीक्षेच्या पेपरफुटीच्या मुद्द्यात धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी या सभेचे मोर्चाचे आयोजन करण्यात आले.

मात्र, काल अचानक दुपारी धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. त्यांच्या या राजीनाम्यानंतर जल्लोष सभा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून घेण्यात आली. या सभेला मोठा प्रतिसाद मिळताना दिसला. लोक ध्वज हातात घेऊन सभेला पोहोचले आहेत. आदित्य ठाकरे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना दिसले. मोठा उत्साह उपस्थितांमध्ये बघायला मिळत आहे.

Follow Us
गणेशोत्सवासाठी कोकण जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन रवाना
पोलिसांनी अडवलंच तर... मुंबईत होणाऱ्या निर्णायक मराठा आंदोलनाबाबत...
पोलिसांनी अडवलंच तर...  मुंबईत होणाऱ्या मराठा आंदोलनाबाबत मनोज जरांगेंचा मोठा इशारा
गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! कोकणवासीयांचा...
Ganeshotsav 2026 | गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! माणगावात 7-8 किमी वाहनांच्या रांगा; कोकणवासीयांचा प्रवास रखडला
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर... जरांगेंनी जाहीर केला...
Manoj Jarange Patil | पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर आझाद मैदानावर... जरांगे पाटलांनी जाहीर केला महामोर्चाचा मेगा प्लॅन
कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय!
Manoj Jarange Patil | कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय! मनोज जरांगे पाटलांचा ठाम निर्धार
ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी मोठ्या हालाचली; तामिळनाडूच्या...
ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी मोठ्या हालाचली; तामिळनाडूच्या दिग्गज नेत्या पोहोचल्या भेटीला
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट...
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट... संपूर्ण रेकॉर्ड ठेवावा लागणार
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू,
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू, मनोज जरांगेंबाबत मोठं विधान
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून...
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून... पहा व्हिडीओ