AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनसे आणि भाजपनं एकत्र आलं पाहिजे असं वाटतं का? राज ठाकरेंनी मनातलं सांगून टाकलं!

राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटासोबत युतीबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे, त्यानंतर आता चर्चेला उधाण आलं आहे, मात्र दुसरीकडे त्यांनी यावेळी आपली भाजपबाबतची भूमिका देखील स्पष्ट केली आहे.

मनसे आणि भाजपनं एकत्र आलं पाहिजे असं वाटतं का? राज ठाकरेंनी मनातलं सांगून टाकलं!
| Updated on: Apr 19, 2025 | 6:10 PM
Share

महेश मांजरेकर यांना दिलेल्या एका मुलाखतीमध्ये मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी विविध विषयांवर आपली भूमिका व्यक्त केली आहे. शिवसेना ठाकरे गटासोबत युतीसंदर्भात त्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाची युती होऊ शकते अशी चर्चा आता सुरू झाली आहे. दरम्यान यावेळी त्यांना भाजपसोबत युती व्हावी असं वाटतं का? असाही प्रश्न विचारण्यात आला होता, या प्रश्नाला उत्तर देताना भाजपसोबत जाणं हे राजकीय होईल, पण राजकारणात कधी काय घडेल सांगता येत नाही, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले राज ठाकरे? 

मी मराठी माणसाबद्दल बोलू शकतो, भाजपसोबत जाणं राजकीय होईल, सर्वच भूमिका जुळतील असं नाही. पण राजकारणात कधी काय घडेल सांगता येत नाही. उद्या एकमेकांना हात जोडले जातील, हात मिळवले जातील, नमस्कार केला जाईल.  राजकारणात सर्वच गोष्टीला वेग आला आहे. कधी काय घडेल सांगता येत नाही, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, विचारधारेत फरक आहे. महाराष्ट्र हडपण्याचा प्रकार चारही बाजुने सुरू आहे. त्यावर मी जेव्हा बोलेन तेव्हा हे सर्व पक्ष मला किती साथ देतील ते  माहीत नाही. राजकीय अ‍ॅडजस्टमेंट या वेगळ्या गोष्टी आहेत, असं राज ठाकरे यांंनी यावेळी म्हटलं आहे.

शिवसेना ठाकरे गटासोबत युतीची चर्चा  

महेश मांजरेकर यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये बोलताना राज ठाकरे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे पुन्हा एकत्र येणार का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता, या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी म्हटलं की,  “या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं, वाद या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत. एकत्र येणं, एकत्र राहणं, ही काही कठीण गोष्ट आहे, असं मला वाटत नाही”  असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे, राज ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर आता मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाची युती होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.