AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…तर या सर्वांची युती झाल्याशिवाय राहणार नाही, राज ठाकरे कडाडले

मीरा भाईंदरमध्ये आज राज ठाकरे यांची सभा पार पडली या सभेत बोलताना हिंदीच्या मुद्द्यावरून त्यांनी सरकावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

...तर या सर्वांची युती झाल्याशिवाय राहणार नाही, राज ठाकरे कडाडले
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 18, 2025 | 8:57 PM
Share

मीरा भाईंदरमध्ये अमराठी भाषिक व्यापाऱ्यांनी मारहाणीचा निषेध करण्यासाठी मोर्चा काढाला होता, त्याला प्रत्युत्तर म्हणून मनसेनं देखील मोर्चा काढला. मनसेच्या या मोर्चानंतर आज पहिल्यांदाच मीरा भाईंदरमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांची सभा पार पडली. या सभेत राज ठाकरे काय बोलणार? नेमकी काय भूमिका मांडणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. या सभेत बोलताना राज ठाकरे यांनी कडक इशारा दिला आहे.  कानावर मराठी समजणार नसेल तर कानाखाली बसणारच असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले राज ठाकरे? 

राज ठाकरे यांनी यावेळी बोलताना सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. हिंमत बघा कशी होते यांची.  तुम्ही काही बोलला तर राष्ट्रीय बातमी होते. पण हे काही बोलतात तेव्हा त्यांना माहीत असतं सरकार आमच्या मागे आहे. सरकारच या गोष्टी लादणार असेल तर या लोकांची हिंमत वाढणारच आहे. तुमची सत्ता लोकसभेत आणि विधानभवनात. आमची सत्ता रस्त्यावर आहे. हा महाराष्ट्र आहे. तुमच्या बापाचा महाराष्ट्र आहे. परत कोणी वेडावाकडा वागण्याचा प्रयत्न केला तर त्याचा गाल आणि हात या सर्व गोष्टींची युती झाल्याशिवाय राहणार नाही. काही सरकारी आणि काही बेरोजगार पत्रकार असतात. युट्यूबवर जातात आणि म्हणतात ही फडणवीसांनी दिलेली दिलेली स्क्रिप्ट आहे. हा कोणता स्क्रिप्ट रायटर आहे जो स्वत:चा अपमान लिहितो? असं म्हणत त्यांनी यावेळी जोरदार फटकेबाजी केल्याचं पाहायला मिळालं.

दरम्यान यावेळी त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हिंदीसाठी भांडत आहे, इतर शाळात मराठी सक्तीची केली पाहिजे. ते सोडून हिंदी सक्तीची करत आहात. कोणाच्या दबावाखाली. कोण दबाव टाकतं तुमच्यावर. केंद्राचं हे धोरण पूर्वीपासूनचं आहे. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला. त्यासाठी प्रचंड मोठा लढा द्यावा लागला. मुंबईला महाराष्ट्रापासून बाजूला करण्याचा काही गुजराती व्यापारी आणि नेत्यांचा डाव होता, असं यावेळी राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.