AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मीच माझा रक्षक’, हा मंत्र महाराष्ट्राने पाळावा, राजेश टोपेंचं आवाहन

कोरोना संसर्गापासून वाचवण्यासाठी राज्यातील जनतेने मीच माझा रक्षक हा मंत्र अंगिकारावा, असं आवाहन महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे (Rajesh Tope on Corona Janta Curfew).

'मीच माझा रक्षक', हा मंत्र महाराष्ट्राने पाळावा, राजेश टोपेंचं आवाहन
| Updated on: Mar 22, 2020 | 6:14 PM
Share

मुंबई : कोरोना संसर्गापासून बचावासाठी राज्यातील जनतेने ‘मीच माझा रक्षक’ हा मंत्र अंगिकारावा, असं आवाहन महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे (Rajesh Tope on Corona Janta Curfew). त्यांनी जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर आज पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी राज्यातील एकूण कोरोना नियंत्रणाच्या कामाबाबत माहिती दिली. या काळात नागरिकांनी घाबरुन जाऊन अन्नधान्याची साठवणूक करु नये असंही आवाहन केलं. तसेच या परिस्थितीचा फायदा घेऊन कुणी अन्नधान्याचा काळाबाजार केल्यास कारवाईचाही इशारा दिला.

राजेश टोपे म्हणाले, “मीच माझा रक्षक हा महत्त्वाचा संदेश संपूर्ण महाराष्ट्रात सर्वांनी पाळावा. स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा गांधींनी जे जे आवाहन जनतेला केलं, ते ते संपूर्ण देशाने पाळलं, त्याचं पालन केलं. कारण ते जनहिताच्या दृष्टीने महत्त्वाचं होतं. म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे की सर्वांनी स्वयंशिस्तीने एकमेकांपासून अंतर ठेवावं. सार्वजनिक ठिकाणी एकमेकांपासून अंतर ठेवणं हेच कोरोना नियंत्रणातील यशाचा महत्त्वाचा मंत्र आहे.”

संपूर्ण जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. त्याला लगाम लावण्यासाठी आपण शिक्षित व्हावं, यासाठी स्वयंशिस्तीत राहावं. म्हणूनच मीच माझा रक्षक मंत्राप्रमाणे गोष्टींचं पालन करावं. यामुळे आज संख्या वाढत असली तरी ती गुणाकाराप्रमाणे वाढणार नाही याचा मला विश्वास आहे. इतर देशांप्रमाणे आपल्या देशात स्थिती होणार नाही यासाठी प्रयत्न करुयात, असंही राजेश टोपे यांनी सांगितलं.

“लहान मुलं आणि वृद्धांची काळजी घ्या”

राजेश टोपे म्हणाले, “लहान मुलांची वयोवृद्धांची काळजी घ्या. जे जे रुग्ण संशयित आहेत महाराष्ट्रात 74 लोक संसर्गित आहेत. त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी नातेवाईकांनी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावे. आपण कोरोनाच्या फेज 2 मध्ये आहोत. 5 ते 6 संपर्कातील आणि 4 ते 5 नागरिक बाहेर देशातून आले आहेत.”

संबंधित बातम्या :

Corona Death India | देशात ‘कोरोना’चा सहावा बळी, पाटणामध्ये एकाचा मृत्यू

मोदींच्या आवाहनाची खिल्ली उडवू नका, माझे कुटुंबीयही कॉरन्टाईन : संजय राऊत

Corona | कोरोनाचा हाहा:कार! गेल्या 24 तासात इटलीत 793 जणांचा मृत्यू

Rajesh Tope on Corona Janta Curfew

स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश
स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश.
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले...
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले....
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ.
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका.
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण...
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण....
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?.
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?.
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी...
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी....
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल.
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ.