AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी ! जागा वाटपावरून महायुतीत वाद? रामदास आठवले काय म्हणाले?

लोणावळा येथे बोलताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले की बाबा सिद्दीकी प्रकरणावरुन राजीनामा मागण्याची काही गरज नाही. अशा घटना विरोधकांच्या काळातही घडल्या आहेत. त्यामुळे राजीनामा मागणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले.

मोठी बातमी ! जागा वाटपावरून महायुतीत वाद? रामदास आठवले काय म्हणाले?
ramdas athwale
| Updated on: Oct 14, 2024 | 9:01 PM
Share

बाबा सिद्दीकी यांचा गोळीबारात झालेला मृत्यू अत्यंत दुर्दैवी घटना आहे. हल्ल्याच्या घटना अचानक घडतात.माझ्यावर देखील दोन वेळा हल्ला झाला होता. गुप्तचर यंत्रणा ऍक्टीव्ह असली पाहिजे. कुणाचं ही राज्य असलं तरी अशा घटना घडू नयेत.विरोधकांनी या घटनेवरून आता राजकारण करू नये. त्यांच्या ही कार्यकाळात अशा घटना घडल्या आहेत.नेमक्या कुठल्या कारणावरून आणि कुणी सुपारी दिली होती, याचा तपास पोलीस करत आहेत असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे. महायुतीतून सुरु असलेल्या जागा वाटपावरूनही त्यांनी महत्वाचे भाष्य केले आहे. काय म्हणाले रामदास आठवले ते पाहूयात…

मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवं. ही मागणी सर्वात आधी मी केली होती असेही रामदास आठवले यावेळी सांगितले. ते पुढे म्हणाले की 8 लाखाच्या आत उत्पन्न असलेल्या मराठा समाजातील कुटुंबाला आरक्षण मिळावं ही आमची सातत्याने मागणी आहे. परंतू मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळणे कठीण आहे. कमिटी आणि कोर्ट मान्य करणार नाही असेही ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की ओबीसींमधून दुसरी कॅटगिरी करून त्यात मराठा समाजाला टाकले पाहिजे. तसे आरक्षण महाराष्ट्रात मिळू शकते. पण, हे महाराष्ट्र पुरते मर्यादित ठेवू शकणार नाहीत. देशभरातील जाट, क्षत्रिय यांना देखील अशा पद्धतीने आरक्षण द्यावे लागेल. माझे मराठा आणि ओबीसींना एकच सांगणं आहे की एकमेकांचा द्वेष करू नका. छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितल्या प्रमाणे एकोप्याने राहावे. भुजबळ आणि जरांगे यांच्यात नेहमीच सामना असतो. त्यांनी यातून मार्ग काढला पाहिजे असेही आठवले यांनी म्हटले आहे.

महायुतीत जागा वाटपावरुन वाद

आम्हाला आठ ते दहा जागा हव्या होत्या. परंतू कमी जागा मिळाल्या तरी आपण दुसरा निर्णय घेणार नाही. महायुतीसोबत आपण लढणार आहे.जागा कमी जास्त होतील. तिन्ही पक्षामध्ये जागावाटपावरुन ( महायुती ) वाद विवाद सुरू आहेत. लवकरच जागा वाटपाचा हा तिढा सुटेल. भाजपासारख्या मोठ्या पक्षातून तिकीट मिळणार नसल्याने अनेक जण शरद पवार गटात जात आहेत.हर्षवर्धन पाटील हे त्याचं उदाहरण आहे.काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे कुणीही जात नाही. पक्ष बदलणाऱ्यांना फार फायदा होणार नाही असेही रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार.
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा.
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का.
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा...
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा....
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी.