AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वाशिष्ठी नदीचं रौद्ररूप, चिपळूणमध्ये घरात-बाजारपेठेत-दुकानांमध्ये पाणीच पाणी; पाहा Exclusive दृश्ये…

Chiplun Flood Vashishthi River Water Lavel : चिपळूणला पुन्हा पुराचा धोका; नाईक कंपनी परिसरामध्ये पाणीच पाणी; पाहा व्हीडिओ...

वाशिष्ठी नदीचं रौद्ररूप, चिपळूणमध्ये घरात-बाजारपेठेत-दुकानांमध्ये पाणीच पाणी; पाहा Exclusive दृश्ये...
| Edited By: | Updated on: Jul 25, 2023 | 12:18 PM
Share

चिपळूण, रत्नागिरी | 25 जुलै 2023 : राज्यात सर्वत्र धो-धो पाऊस कोसळतोय. कोकणातही मुसळधार पाऊस बरसतोय. रत्नागिरीतही पावसाचा जोर कायम आहे. अशात रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहराला पुन्हा एकदा पुराचा धोका संभवतो आहे. वाशिष्ठी नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. अशातच आता चिपळुणातील बाजारपेठांमध्ये पावसाचं पाणी शिरलं आहे.

चिपळूणमध्ये वाशिष्ठी नदीने रौद्ररूप धारण केलं आहे. चिपळूणमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. अशातच नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे.

चिपळूणमधील बाजारपेठेतील दुकानांमध्ये पाणी शिरलं आहे. त्यामुळे चिपळूण शहराला पुराच्या पाण्याचा धोका वाढला आहे. चिपळूण नाईक कंपनी परिसरामध्ये पाणीच पाणी पाहायला मिळतं आहे. या परिसरात दुकानाच्या पायऱ्या पाण्याखाली गेल्या आहेत. बाजारपेठेमधील रस्ता देखील पाण्याखाली गेले आहेत.

रत्नागिरीत जोरदार पाऊस होतोय. पावसाचा जोर कायम राहिला तर चिपळूण शहराला पुन्हा एकदा पुराचा धोका संभवतो आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.

2021 ला चिपळूण शहराला पुराच्या पाण्याने वेढलं होतं. अख्ख शहर पाण्याखाली गेलं होतं. त्यामुळे स्थानिकांच्या घरांचं मोठं नुकसान झालं होतं. शेतीही वाहून गेली होती. यंदाही जर पावसाचा जोर कायम राहिला तर चिपळूणला पुन्हा पूर येण्याची शक्यता आहे.

Exclusive दृश्ये…

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातही मुसळधार पाऊस होतोय. खेडच्या जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे खेड शहराला पुराचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

तर रायगड परिसरात मुसळधार पावसाळा सुरूवात झाली आहे. आज रायगड सह अन्य जिल्ह्याला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सततच्या पावसामुळे नद्याना मोठ्या प्रमाणात पाणी आलं आहे. अशात सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.

राज्यात पुढील पाच ते सहा दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. 25 ते 30 जुलैपर्यंत अतिवृष्टीचा हवामान विभागाचा अंदाज आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं देशभरात सगळीकडे पावसाची शक्यता आहे. राज्यात सगळ्या विभागातील पाण्याची तुट भरून निघेल हवामान विभागाचा अंदाज आहे. कोकण विभागात 25 ते 30 जुलैपर्यंत अतिवृष्टी इशारा देण्यात आला आहे.

Follow Us
कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका
कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका.
कर्जमाफीची फडणवीसांकडून घोषणा, कृषीमंत्र्यांनी मानले सरकारचे आभार
कर्जमाफीची फडणवीसांकडून घोषणा, कृषीमंत्र्यांनी मानले सरकारचे आभार.
अर्थसंकल्पात खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा; 12 खेळांसाठी....
अर्थसंकल्पात खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा; 12 खेळांसाठी.....
अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनाबाबत मोठी घोषणा, फडणवीस नेमकं काय म्हणाले
अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनाबाबत मोठी घोषणा, फडणवीस नेमकं काय म्हणाले.
नियमित कर्जाची फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना काय मिळणार?
नियमित कर्जाची फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना काय मिळणार?.
वडाळा ते गेट-वे ऑफ इंडिया भूमिगत मेट्रो होणार! मुख्यमंत्र्यांची घोषणा
वडाळा ते गेट-वे ऑफ इंडिया भूमिगत मेट्रो होणार! मुख्यमंत्र्यांची घोषणा.
प्रतीक्षा संपली! अखेर शेतकरी कर्जमाफीची घोषणा; काय म्हणाले फडणवीस?
प्रतीक्षा संपली! अखेर शेतकरी कर्जमाफीची घोषणा; काय म्हणाले फडणवीस?.
राज्याच्या बजेटमध्ये 10 महत्वाच्या घोषणा कोणत्या? पाहा व्हिडीओ
राज्याच्या बजेटमध्ये 10 महत्वाच्या घोषणा कोणत्या? पाहा व्हिडीओ.
जब इरादा बना लिया है...; बजेट मांडत असताना फडणवीसांकडून शेरो शायरी
जब इरादा बना लिया है...; बजेट मांडत असताना फडणवीसांकडून शेरो शायरी.
परवडणाऱ्या 10 लाख घरांचा विकास आराखडा तयार करणार
परवडणाऱ्या 10 लाख घरांचा विकास आराखडा तयार करणार.