‘या’ दिवशी केला जाईल पापमोचनी एकादशीचा व्रत, जाणून घ्या शुभवेळ पूजेची पद्धत आणि महत्त्व
पापमोचनी एकादशीचे व्रत करणे आणि विहित विधींनुसार भगवान विष्णूची पूजा केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि आनंदी जीवन मिळते. तर, मार्चमध्ये पापमोचनी एकादशीचे व्रत कधी पाळले जाईल तसेच त्याचा शुभ मुहूर्त, पूजा करण्याची पद्धत आणि महत्त्व जाणून घेऊयात.

सनातन धर्मात एकादशी हा एक अतिशय पवित्र आणि विशेष व्रत मानला जातो. हा व्रत विश्वाचे रक्षक भगवान श्री हरि विष्णू यांना समर्पित आहे. आपल्या सर्वांना माहितच आहे की दर महिन्याला दोन एकादशी व्रत असतात. पहिला महिन्याच्या कृष्ण पक्षात आणि दुसरा एकादशी व्रत हा महिन्याच्या शुक्ल पक्षात असतो. तर या महिन्याच्या पापमोचनी आणि कामदा एकादशी व्रत पाळले जातात.
चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला पापमोचनी एकादशीचे व्रत केले जाते. धार्मिक श्रद्धा अशी आहे की हे व्रत केल्याने आणि योग्य विधींनी भगवान विष्णूची पूजा केल्याने व्यक्तीच्या सर्व पापांचा नाश होतो आणि आनंदी जीवन मिळते. तर आपण मार्च महिन्यामध्ये कोणत्या दिवशी पापमोचनी एकादशीचे व्रत करावे व त्याचा शुभ काळ, पूजा करण्याची पद्धत आणि महत्त्व याबद्दल देखील जाणून घेऊयात.
पापमोचनी एकादशी व्रताची तारीख आणि शुभ मुहूर्त
कॅलेंडरनुसार चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी 14 मार्च 2026 रोजी सकाळी 8 वाजून 10 मिनिटांनी सुरू होईल आणि 15 मार्च 2026 रोजी सकाळी 9 वाजून 16 मिनिटांनी ही तिथी संपेल. म्हणून उदय तिथीनुसार 15 मार्च रोजी पापमोचनी एकादशी व्रत पाळले जाईल. 16 मार्च 2026 रोजी सकाळी 6 वाजून 30मिनिट ते 8 वाजून 54 मिनिटां दरम्यान उपवास सोडता येईल.
पापमोचनी एकादशीची पूजा पद्धत
पापमोचनी एकादशीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे.
यानंतर सूर्यदेवाची प्रार्थना करा. भगवान विष्णूचे ध्यान करताना, उपवास करण्याचे व्रत घ्या.
तुमच्या घराच्या देव्हाऱ्यात एक पाठ मांडा आणि त्यात भगवान विष्णूची मूर्ती किंवा फोटो ठेवा.
पूजा करताना गंगाजल, फुले, फळे, चंदन, हळद, अगरबत्ती, दिवा, मिठाई इत्यादी अर्पण करा.
भगवान विष्णूंचे मंत्र जप करा.
पूजा पाठ करताना पापमोचनी एकादशीची कथा वाचा.
शेवटी भगवान विष्णूंची आरती करून पूजा संपन्न करा.
पापमोचनी एकादशीचे महत्त्व
पापमोचनी एकादशीला त्यांच्या नावाचे फळ मिळते. या व्रतामुळे आणि भगवान विष्णूंच्या पूजेमुळे, जाणूनबुजून किंवा अजाणतेपणे केलेल्या पापांपासून मुक्तता मिळते. भगवान विष्णू त्यांचे आशीर्वाद वर्षाव करतात, ज्यामुळे आनंद आणि सौभाग्य मिळते. या व्रताचे पुण्यपूर्ण परिणाम मृत्युनंतर मोक्ष मिळवून देतात.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
