AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“त्या निवडून आल्या असत्या तर…”, नवनीत राणांच्या पराभवाबद्दल रवी राणा यांचे मोठे वक्तव्य

जर असंच होत राहिलं तर राजकारणात चांगले लोक राहणार नाहीत", असेही रवी राणा यांनी म्हटले.

त्या निवडून आल्या असत्या तर..., नवनीत राणांच्या पराभवाबद्दल रवी राणा यांचे मोठे वक्तव्य
| Updated on: Sep 02, 2024 | 3:13 PM
Share

Ravi Rana On Navneet rana : महाराष्ट्रातील अमरावतीमधून भाजपाच्या उमेदवार नवनीत कौर राणा यांचा पराभव झाला आहे. काँग्रेसचे बळवंत वानखेडे यांनी अमरावतीतील भाजप उमेदवार नवनीत राणा यांचा पराभव केला. या दोघांमध्ये चांगलीच चुरशीची लढाई पाहायला मिळाली. आता यावरुन नवनीत राणा यांचे पती आमदार रवी राणा यांनी भाष्य केले आहे. “नवनीत राणांनी पाच वर्षे अनेक विकास कामे केली. लोकांशी जनसंपर्क ठेवला. पण तरी त्यांना निवडणुकीत घरी बसावं लागलं. त्या निवडून आल्या असत्या तर केंद्रीय मंत्री झाल्या असत्या”, असे विधान रवी राणा यांनी केलं आहे.

सध्या सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या रवी राणा हे जोरदार तयारीला लागले आहेत. नुकतंच त्यांनी त्यांच्या मतदारसंघातील एका कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी नवनीत राणा यांच्या पराभवाबद्दल भाष्य केले. “जर असंच होत राहिलं तर राजकारणात चांगले लोक राहणार नाही”, असे वक्तव्य रवी राणा यांनी केले.

“…तर केंद्रीय मंत्री झाल्या असत्या”

“गेली पाच वर्षे नवनीत राणा यांनी अनेक विकास कामे केली. त्यांनी लोकांशी चांगला जनसंपर्कही ठेवला. मात्र तरीही त्यांना निवडणुकीत घरी बसावं लागलं. नवनीत राणा जर यंदाच्या लोकसभा निवडणुकीत खासदार म्हणून निवडून आल्या असत्या, तर केंद्रीय मंत्री झाल्या असत्या”, असे रवी राणा म्हणाले.

“राजकारणात चांगले लोक राहणार नाहीत”

“नवनीत राणा यांनी गेली पाच वर्षे विकास केला. खूप मेहनत केली. पण आता ती खड्ड्यात गेली. अमरावतीत आता अशी हवा आली आहे की जो २० दिवसांपूर्वी आला तो निवडून आला. जर असंच होत राहिलं तर राजकारणात चांगले लोक राहणार नाहीत”, असेही रवी राणा यांनी म्हटले.

“फक्त नवनीत राणा यांचाच नाही तर अमरावती जिल्ह्याच्या विकासाचा पराभव झाला आहे. काही मुठभर नेत्यांनी ठरवलं होतं की नवनीत राणा यांचा पराभव करायचा, पण लक्षात ठेवा त्यांच्या मनासारख झालं असलं तरी या जिल्ह्याचा विकास थांबला आहे. अनेकांनी म्हटलं की आग लगी है तो धुव्वा निकलेगा, लेकीन ध्यान रखना आग यहाँ लगी है, तो वहा भी आग लगने वाली है”, असेही रवी राणा यांनी म्हटले.

“जनतेची ताकद माझ्यासोबत”

तसेच यावेळी त्यांनी बच्चू कडूंवरही टीका केली. “काही नेत्यांनी मला पाडायचं हे ठरवलं असलं तरीही जनतेची ताकद माझ्यासोबत आहे. ते मला धक्का लागू देणार नाही”, असे रवी राणा म्हणाले.

Follow Us
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या भागात पवासाची हजेरी!
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या  भागात पवासाची हजेरी!
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले तरी कुठे? वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप!
विरोधीपक्ष मोठ्या तयारीत? ममता बॅनर्जींची सोनिया गांधींसोबत बंद दाराआड
विरोधी पक्ष मोठ्या तयारीत? ममता बॅनर्जींची सोनिया गांधींसोबत बंद दाराआड चर्चा; 45 मिनीटे... काय घडलं?
यूट्यूब टिचर खान सरांच्या अटकेविषयी सर्वात मोठी अपडेट, कोर्टाने दिला..
यूट्यूब टिचर खान सरांच्या अटकेविषयी सर्वात मोठी अपडेट, कोर्टाने दिला महत्त्वाचा आदेश, आता...
राष्ट्रवादीत मोठं घडतंय? राजीनाम्याऐवजी नायकवडींना पवरांनी दिली मोठी..
राष्ट्रवादीत मोठं घडतंय? राजीनाम्याऐवजी नायकवडींना दिली मोठी जबाबदारी, स्वतःच म्हणाले...
पुणेकरांनो सावधान! पाणी वाचवा, नाहीतर नळ कोरडे पडतील
Pune Water Cut | पुणेकरांनो सावधान! पाणी वाचवा, नाहीतर नळ कोरडे पडतील; महापालिकेची मोठी घोषणा काय?
4 सिलेंडरनंतर महिलांनी काय करायचं? उरलेले 8 महिने धूरच घ्यायचा का?
Sachin Sawant | 4 सिलेंडरनंतर महिलांनी काय करायचं? उरलेले 8 महिने धूरच घ्यायचा का?; उज्ज्वला योजनेवरून काँग्रेसचा संताप
लक्ष्मण हाकेंच्या व्हिडीओने खळबळ, बड्या नेत्याबद्दल सांगताना...थेट केल
Video | लक्ष्मण हाकेंच्या व्हिडीओने खळबळ, बड्या नेत्याबद्दल सांगताना...थेट केलेल्या विधानाची राज्यात मोठी चर्चा!
धरण भरलं, आश्वासनं भरली; पण गावकऱ्यांच्या घागरी मात्र रिकाम्याच!
Dahanu | धरण भरलं, आश्वासनं भरली; पण गावकऱ्यांच्या घागरी मात्र रिकाम्याच! साखरे गावाचा पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष
Video | बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावर शिंदेची प्रतिक्रिया, हावभावानेच
Video | बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावर शिंदेची प्रतिक्रिया, हावभावानेच वेधलं लक्ष