AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या आतंकवाद्यांना लोकशाही मार्गाने उत्तर द्या, सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्याने संताप, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा न घेण्याचे आवाहन

Sadabhau Khot on CJP Agitation: शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी दिल्लीत जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्यांना आतंकवाद्याची उपमा दिली आहे. त्यांच्या या वक्तव्यावर संतापाची लाट उसळली आहे. काय म्हणाले सदाभाऊ खोत?

या आतंकवाद्यांना लोकशाही मार्गाने उत्तर द्या, सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्याने संताप, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा न घेण्याचे आवाहन
या आतंकवाद्यांना लोकशाही मार्गाने उत्तर द्या, सदाभाऊंच्या वक्तव्याने वाद
| Updated on: Jul 21, 2026 | 12:04 PM
Share

Sadabhau Khot on CJP Agitation: शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी दिल्लीत जंतर-मंतरवर सुरू असलेल्या आंदोलकांना आतंकवाद्यांची उपमा दिली आहे. एका कार्यक्रमात त्यांनी या आतंकवाद्यांना सरकारने लोकशाही मार्गाने उत्तर द्यावे असे आवाहन केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून संतापाची लाट उसळली आहे. त्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्याचे आवाहनही केले आहे. दिल्लीत 6 जूनपासून कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू आहेत. तर 20 हून अधिक दिवस सोनम वांगचुक यांनी उपोषण केले. त्यांना पोलिसांनी उचलून रुग्णालयात उपाचारासाठी नेले.

दिल्लीतील आंदोलन हे षडयंत्र- सदाभाऊ खोत

पेपरफुटीविरोधात दिल्लीत गोंधळ सुरू आहे, यात निश्चितच षडयंत्र आहे. दोषींना पकडले गेले आहे, वेगवेगळ्या पद्धतीनं चौकशी सुरू आहे. दोषींना सोडणार नाही अशी भूमिका सरकारनं घेतली आहे. नीट उत्तीर्ण झाले ते ॲडमिशनसाठी धावपळ करत आहे. मात्र ज्यांचा संबंध नाही ते राजीनाम्याची मागणी करत आहे. धर्मेंद्र प्रधान यांचा संबंध नाही, त्यांचा राजीनामा घेऊ नये असे आवाहन सदाभाऊ खोत यांनी केले.

प्रकरण लावून धरलं चौकशीचे आदेश दिले. मात्र इंडिया आघाडी, मविआ केंद्र आणि राज्यातले सरकार आहे त्यांच्या विरोधात वातावरण तयार करत आहे. सातत्याने खोटे बोलत आहे. इंडिया मविआ म्हणते आमचा संबंध नाही. मात्र, एक ट्रोल आहे, जयंत पाटील यांचा ग्रुप चालवतो. संपूर्ण प्रकरण अशांतता माजवण्याचे प्रकरण राष्ट्रवादी करत आहे. आय लव्ह जयंत पाटील पेजवर देखील आंदोलनात तेल टाकण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला आहे.

या आतंकवाद्यांना लोकशाही मार्गाने उत्तर द्या

इंडिया आघाडी मविआ आंतकवादासारखी परिस्थिती निर्माण करू पाहात आहे. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा सरकारने मुळीच घेऊ नये. केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र आणि शिक्षणात धर्मेंद्र आहेत, असे म्हणत सदाभाऊंनी आंदोलकांना आतंकवाद्यांची उपमा दिली आहे. या आतंकवाद्यांना लोकशाही मार्गाने सरकारनं उत्तर द्यावे असे आवाहन त्यांनी केले. त्यांच्या या वक्तव्याने आता वाद पेटला आहे. त्यांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त होत आहे.

उद्यापासून कर्जमाफीला सुरुवात

उद्यापासून राजस्व अभियान राबवले जाणार आहे. उद्या देवाभाऊंचा वाढदिवस आणि अजित दादा पवार यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम होत आहेत. जनतेच्या समस्यांचे निराकरण केलं जाईल. महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पात्र आहेत त्यांना पैसे देण्यास देखील सुरुवात करणार आहे. सरकारकडून जनतेच्या सेवेचा संदेश दिला जाणार आहे, असे सदाभाऊ खोत म्हणाले.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...