AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Arya : रोहित आर्याने मुलांना ओलीस का ठेवलं, धक्कादायक कारण समोर, या बड्या नेत्यासोबत बोलण्याची केली होती मागणी

मुंबईमध्ये आज एक धक्कादायक घटना घडली आहे, या घटनेनं राज्यात खळबळ उडाली आहे, रोहित आर्या नावाच्या व्यक्तीनं पवईमधील एका स्टुडिओमध्ये काही मुलांना ओलीस ठेवलं होतं, या मुलांची सुटका करण्याच्या प्रयत्नात पोलिसांनी या व्यक्तीचा एन्काउंटर केला आहे.

Rohit Arya : रोहित आर्याने मुलांना ओलीस का ठेवलं, धक्कादायक कारण समोर, या बड्या नेत्यासोबत बोलण्याची केली होती मागणी
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 30, 2025 | 9:02 PM
Share

आज मुंबईमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे, या घटनेनं संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे, रोहित आर्या नावाच्या व्यक्तीनं मुंबईतील पवईमध्ये असलेल्या आरे स्टुडिओमध्ये काही मुलांना ओलीस ठेवलं होतं, या घटनेनं मोठा गोंधळ उडाला, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले, मुलांच्या सुटकेचा प्रयत्न सुरू असताना पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आरोपीचा मृत्यू झाला आहे. दरम्यान रोहित आर्या याने या चिमुकल्यांना डांबून का ठेवलं होतं? त्याची मागणी नेमकी काय होती, त्याचं पोलिसांसोबत नेमकं काय बोलणं झालं? याबाबत आता माहिती समोर आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार  एपीआय अमोल वाघमारे यांनी रोहित आर्या यांच एन्काउंटर केलं आहे. टॉयलेटच्या खिडकीमार्गे पोलीस पहिल्या माळ्यावर पोहोचले, रोहित आर्याकडे एक एअरगन आणि काही ज्वलनशील पदार्थ होते, आर्या मुलांना धोका पोहोचवेल याची खात्री पोलिसांना होती, त्यामुळे पोलिसांकडून त्याच्यावर गोळीबार करण्यात आला, या घटनेत त्याचा मृत्यू झाला आहे.

एन्काउंटरच्या आधी जवळपास  दोन ते अडीच तास पोलीस त्याच्याशी फोनवरून संपर्कात होते. सुरुवातील माझं शिवसेना शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांच्याशी बोलणं करून द्या, अशी मागणी आरोपीने केली होती, मात्र त्यानंतर त्याने त्यांच्याशी बोलण्यास देखील नकार दिला.  रोहित आर्याने आपली नेमकी मागणी काय हे स्पष्टपणे पोलिसांना सांगितले नाही,  अशी माहिती समोर येत आहे.

दरम्यान मुंबईच्या बाहेरून आलेली सर्व ग्रामीण भागातील मुलं रोहित आर्याने बंदिस्त करून ठेवली होती. लेट्स चेंज या वेबसिरीजसाठी रोहित आर्याने ऑडिशन ठेवले होते. आज चित्रिकरण  आहे असे सांगून त्याने मुलांना स्टुडिओमध्ये बोलावलं होतं, ऑडिशनसाठी तब्बल 100 मलं आली होती, त्यानंतर त्याने त्यातील 80 मुलांना घरी पाठवलं आणि उर्वरीत मुलांना डांबून ठेवलं होतं.  कोल्हापूर, सातारा, सांगली आणि महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यातून ही मुले ऑडिशनसाठी मुंबईत आली होती.  पोलिसानी झाडलेली गोळी रोहित आर्याच्या छातीत लागल्याने त्याचा मृत्यू  झाला, अशी माहिती आता समोर आली आहे.

Follow Us
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?.

उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका.

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका

झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यापूर्वी श्रेयसची डोकेदुखी झाली कमी, प्लेइंग 11 चा निर्णय कसा घेणार?.

झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यापूर्वी श्रेयसची डोकेदुखी झाली कमी, प्लेइंग 11 चा निर्णय कसा घेणार?

Fifa World Cup स्पेनने जिंकला पण फायदा मिया खलिफाला, एका रात्रीत मालामाल झाली, तब्बल 14 कोटी कमावलं.

Fifa World Cup स्पेनने जिंकला पण फायदा मिया खलिफाला, एका रात्रीत मालामाल झाली, तब्बल 14 कोटी कमावलं

Congress: भाजप कार्यालयाबाहेर काँग्रेस आक्रमक, कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंब्यासाठी भर पावसात आंदोलन, पोलीस येताच घडलं काय?.

Congress: भाजप कार्यालयाबाहेर काँग्रेस आक्रमक, कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंब्यासाठी भर पावसात आंदोलन, पोलीस येताच घडलं काय?

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा...

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..