AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मी चुकून जरी गृहमंत्री झालो तर महायुतीचे 60 टक्के नेते…’, रोहित पवार नेमकं काय म्हणाले?

"मी चुकून जरी गृहमंत्री झालो तर महायुतीचे 60 टक्के नेते गुवाहाटीला राहायला जातील", असं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कर्जत-जामखेडचे उमेदवार रोहित पवार यांनी म्हटलं आहे. त्यांची कर्जत-जामखेडमध्ये प्रचारसभा पार पडली. यावेळी ते बोलत होते.

'मी चुकून जरी गृहमंत्री झालो तर महायुतीचे 60 टक्के नेते...', रोहित पवार नेमकं काय म्हणाले?
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवारImage Credit source: Facebook
| Updated on: Nov 12, 2024 | 6:28 PM
Share

महाराष्ट्राचं राजकारणात गुवाहाटीची चर्चा सातत्याने होत असते. गुवाहाटीची चर्चा होण्यामागे कारणही तसं आहे. अडीच वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात जो भूकंप घडून आला त्याचं केंद्र थेट गुवाहाटी येथूनच होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सर्व समर्थक आमदारांसह गुवाहाटीला गेले होते. राज्यात नवं सरकार स्थापन झाल्यानंतर सर्व आमदार गुवाहाटी येथून परत महाराष्ट्रात आले होते. तेव्हा शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांचं फोनवरील संभाषणाचं काय झाडं, काय डोंगर, काय हॉटेल, सगळं ओक्केमध्ये आहे, हे वाक्य तुफान चर्चेत आलं होतं. यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात गुवाहाटीची चर्चा सातत्याने होत राहते. आतादेखील आमदार रोहित पवार यांनी गुवाहाटीचा उल्लेख करत महायुतीवर निशाणा साधला आहे.

“मी चुकून जरी गृहमंत्री झालो तर महायुतीचे 60 टक्के नेते गुवाहाटीला राहायला जातील”, असं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कर्जत-जामखेडचे उमेदवार रोहित पवार यांनी म्हटलं आहे. कर्जत जामखेड मतदारसंघातील जामखेड येथे प्रचारसभेचे आयोजन केलं होतं. या प्रचारसभेत रोहित पवारांचे भावी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असे बॅनर झळकले होते. त्यावर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली.

रोहित पवार नेमकं काय म्हणाले?

“कार्यकर्त्यांच्या भावना असतात. त्या त्यांनी व्यक्त केल्या आहेत. मात्र चुकून जरी मी गृहमंत्री झालो तर महायुती सरकार मधले 60 टक्के नेते गुहाटीला राहतील आणि जरी नाही झालो तरी जे कोणी गृहमंत्री होतील त्यांच्याकडे कागदपत्रांसहित पुरावे देऊन कारवाई करू आणि सामान्य जनतेचा पैसा सामान्य जनतेच्या विकास कामासाठी वापरू”, असं रोहित पवार म्हणाले.

‘…तर महाराष्ट्रात अस्वस्थता निर्माण झाली असती म्हणून’

“2004 साली छगन भुजबळांना मुख्यमंत्री केलं असतं तर राज्यामध्ये अस्वस्थता निर्माण झाली असती”, असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाते प्रमुख शरद पवार यांनी एका मुलाखतीत सांगितलं आहे. यावर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. “2004 मध्ये अजित पवार, जयंत पाटील, रामराजे निंबाळकर यांच्यासारखे अनेक मोठे नेते पक्षामध्ये होते. भुजबळांना जर मुख्यमंत्री केलं असतं तर नेत्यांमध्ये नाराजी निर्माण झाली असती आणि महाराष्ट्रात अस्वस्थता निर्माण झाली असती”, असं शरद पवारांना म्हणायचं असावं, असं मत रोहित पवारांनी मांडलं.

Follow Us
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच...
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच....