AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वाहन चालवणाऱ्या अल्पवयीन मुलांवर आरटीओ विभागाची कारवाई, आरटीओ विभागाचे पालकांना आवाहन

सांगली जिल्ह्यात आतापर्यत अनेक अपघात लहान मुलांच्या हातून घडले आहेत. वारंवार पोलिसांनी पालकांना विनंती करुन देखीन अल्पवयीन मुलं रस्त्याला गाडी चालवताना दिसतात.

वाहन चालवणाऱ्या अल्पवयीन मुलांवर आरटीओ विभागाची कारवाई, आरटीओ विभागाचे पालकांना आवाहन
rtoImage Credit source: rto
| Updated on: Mar 04, 2023 | 8:04 AM
Share

सांगली : सांगलीत (sangli) जिल्ह्यात वय पूर्ण नसताना वाहने चालवणाऱ्या अल्पवयीन मुलांच्यावर आता आरटीओ विभागाने (RTO Department) कारवाई सुरू केली आहे. यावेळी आरटीओ विभागाने अल्पवयीन मुलांना वाहने चालवायला देऊ नका असे आवाहन सुध्दा पालकांना केलं आहे. गेली एक महिना पालक आणि मुलांना आरटीओच्या अधिकाऱ्यांनी (RTO Officer sangli) समजून सांगितलं आहे. आता या कारवाईला सुरवात केली आहे, ही कारवाईची मोहीम संपूर्ण जिल्ह्यात 1 महिना सुरू राहणार असल्याची माहिती सांगलीचे मोटार वाहन निरीक्षक रमेश पाटिल दिली आहे.

आरटीओ अधिकाऱ्यांनी पालकांना समज दिली

सांगली जिल्ह्यात अल्पवयीन मुलांकडून वाहन चालवण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे अल्पवयीन मुलांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. त्याचबरोबर मोटार वाहन कायद्यानुसार अल्पवयीन मुलाना गाडी चालवण्यास देणे हा कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे गाडी चालवायला देणाऱ्या पालकांना शिक्षाही होऊ शकते. याबाबत आरटीओ विभागाने सातत्याने प्रबोधन केले आहे. तरीही सांगलीत अल्पवयीन मुले मोठ्या प्रमाणात वाहने रस्त्यावर चालवत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अशा अल्पवयीन मुलाना आरटीओ विभागाने रोखत त्याच्या पालकांना याबाबत समज दिली आहे. यापुढे अल्पवयीन मुलगा किंवा मुलगी वाहन चालवताना आढळल्यास त्यांच्यावर मोटार वाहन कायद्याने गुन्हा दाखल करण्याचा इशाराही यावेळी आरटीओ विभागाकडून देण्यात आला.

अल्पवयीन मुलं रस्त्याला गाडी चालवताना दिसतात

सांगली जिल्ह्यात आतापर्यत अनेक अपघात लहान मुलांच्या हातून घडले आहेत. वारंवार पोलिसांनी पालकांना विनंती करुन देखीन अल्पवयीन मुलं रस्त्याला गाडी चालवताना दिसतात. सांगली जिल्ह्यात सध्या अनेक ठिकाणी सहकारी साखर कारखाने सुरु आहेत. त्यामुळे प्रत्येकवेळी रस्त्याला वाहतुक अधिक असते. त्याचबरोबर उसाच्या अधिक भरलेल्या गाड्या कायम सुरु असतात. लहान मुलं अधिक वेगाने गाडी चालवतात. मागच्या चार महिन्यात अनेक मुलांचे अपघात सुध्दा झाले आहेत. आरटीओ अधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयाचं अनेकांनी स्वागत केलं आहे.

Follow Us
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी.
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले.
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने.
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण..
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण...
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती....
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती.....
राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल पंतप्रधान मोदींबाबत मोठी भविष्यवाणी
राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल पंतप्रधान मोदींबाबत मोठी भविष्यवाणी.
शिवनिका ट्रस्ट प्रकरणी SIT स्थापन; ट्रस्टींवरही येणार तपासाचा फेरा
शिवनिका ट्रस्ट प्रकरणी SIT स्थापन; ट्रस्टींवरही येणार तपासाचा फेरा.
इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय परिणाम?मोदींनी लोकसभेत सगळं सांगितलं
इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय परिणाम?मोदींनी लोकसभेत सगळं सांगितलं.
भोंदूबाबा खरातने सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरलं... मोठा कारनामा समोर
भोंदूबाबा खरातने सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरलं... मोठा कारनामा समोर.
आताच सोनं खरेदी करा बरं... गेल्या 40 वर्षात झालं नव्हतं एवढं स्वस्त...
आताच सोनं खरेदी करा बरं... गेल्या 40 वर्षात झालं नव्हतं एवढं स्वस्त....