Nagpur : सलील देशमुख ऑनफिल्ड, गुडघाभर पाण्यात उतरत घेतला पूर परिस्थितीचा आढावा

सध्या अनेक नेत्यांकडून पूर परिस्थितीची पहाणी करून, नागरिकांना दिलासा देण्याचे काम सुरू आहे.  अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख यांनी देखील पूरग्रस्त भागात जाऊन पहाणी करत नागरिकांना दिलासा दिला. 

Nagpur : सलील देशमुख ऑनफिल्ड, गुडघाभर पाण्यात उतरत घेतला पूर परिस्थितीचा आढावा
Follow us
| Updated on: Aug 10, 2022 | 1:32 PM

नागपूर : जून,जुलैमध्ये झालेल्या जोरदार पावसानंतर (Rain) ऑगस्टच्या सुरुवातीला राज्यात पावसाने दडी मारली होती.  मात्र आता पुन्हा एकदा राज्यभरात दमदार पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस (heavy rain) सुरू आहे. या पावसामुळे नदी, नाल्यांना पूर (flood) आला आहे. पुराचा फटका लाखो लोकांना बसला असून, अनेकांवर स्थलांतरणाची वेळ आली आहे. नदीला आलेल्या पुराचे पाणी शेतात घुसल्याने पिके पाण्याखाली गेली आहेत. पिके पण्यात गेल्याने बळी राजा संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांकडून नुकसानभरपाईची मागणी केली जात आहे. विदर्भात तर पावसामुळे परिस्थिती आणखी भीषण बनली आहे. विदर्भातील अनेक गावाना पुराचा फटका बसला आहे. दरम्यान सध्या अनेक नेत्यांकडून पूर परिस्थितीची पहाणी करून, नागरिकांना दिलासा देण्याचे काम सुरू आहे.  अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख यांनी देखील पूरग्रस्त भागात जाऊन पहाणी करत नागरिकांना दिलासा दिला.

पूरपरिस्थितीचा आढावा

माजी गृहमंत्री अनिल देशमुख  यांचे चिरंजीव सलील देशमुख थेट ऑनफिल्ड दिसले. त्यांनी नागपूर जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा आढावा घेतला. सलील देशमुख यांनी काटोल परिसरात गुडघाभर पण्यात उतरून पूर परिस्थितीची पहाणी केली. काटोल परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे तेथील नागरिकांना मोठा फटका बसला आहे. नदी, नाल्यांना पूर आला आहे. पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर काही ठिकाणी घरांची पडझड देखील झाली आहे. सलील देशमुख यांनी काटोल परिसराला भेट देऊन पुराची पहाणी केली. स्थानिकांना त्यांनी धीर दिला.

हे सुद्धा वाचा

राज्यभरात पावसामुळे मोठे नुकसान

जून आणि जुलैमध्ये राज्यात जोरदार पाऊस झाला या पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले होते. मात्र त्यानंतर ऑगस्टच्या सुरुवातीला पवासाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र आता पुन्हा एकदा पावसाने दमदार हजेरी लावली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात गेल्या तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरूच आहे. आणखी पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. नदी नाल्यांना आलेल्या पुराचा फटका हा शेतकऱ्यांना बसला आहे. तर विविध दुर्घटनेमध्ये काही जणांना आपला जीव देखील गमावावा लागला आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.