AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur : सलील देशमुख ऑनफिल्ड, गुडघाभर पाण्यात उतरत घेतला पूर परिस्थितीचा आढावा

सध्या अनेक नेत्यांकडून पूर परिस्थितीची पहाणी करून, नागरिकांना दिलासा देण्याचे काम सुरू आहे.  अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख यांनी देखील पूरग्रस्त भागात जाऊन पहाणी करत नागरिकांना दिलासा दिला. 

Nagpur : सलील देशमुख ऑनफिल्ड, गुडघाभर पाण्यात उतरत घेतला पूर परिस्थितीचा आढावा
| Updated on: Aug 10, 2022 | 1:32 PM
Share

नागपूर : जून,जुलैमध्ये झालेल्या जोरदार पावसानंतर (Rain) ऑगस्टच्या सुरुवातीला राज्यात पावसाने दडी मारली होती.  मात्र आता पुन्हा एकदा राज्यभरात दमदार पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस (heavy rain) सुरू आहे. या पावसामुळे नदी, नाल्यांना पूर (flood) आला आहे. पुराचा फटका लाखो लोकांना बसला असून, अनेकांवर स्थलांतरणाची वेळ आली आहे. नदीला आलेल्या पुराचे पाणी शेतात घुसल्याने पिके पाण्याखाली गेली आहेत. पिके पण्यात गेल्याने बळी राजा संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांकडून नुकसानभरपाईची मागणी केली जात आहे. विदर्भात तर पावसामुळे परिस्थिती आणखी भीषण बनली आहे. विदर्भातील अनेक गावाना पुराचा फटका बसला आहे. दरम्यान सध्या अनेक नेत्यांकडून पूर परिस्थितीची पहाणी करून, नागरिकांना दिलासा देण्याचे काम सुरू आहे.  अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख यांनी देखील पूरग्रस्त भागात जाऊन पहाणी करत नागरिकांना दिलासा दिला.

पूरपरिस्थितीचा आढावा

माजी गृहमंत्री अनिल देशमुख  यांचे चिरंजीव सलील देशमुख थेट ऑनफिल्ड दिसले. त्यांनी नागपूर जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा आढावा घेतला. सलील देशमुख यांनी काटोल परिसरात गुडघाभर पण्यात उतरून पूर परिस्थितीची पहाणी केली. काटोल परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे तेथील नागरिकांना मोठा फटका बसला आहे. नदी, नाल्यांना पूर आला आहे. पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर काही ठिकाणी घरांची पडझड देखील झाली आहे. सलील देशमुख यांनी काटोल परिसराला भेट देऊन पुराची पहाणी केली. स्थानिकांना त्यांनी धीर दिला.

राज्यभरात पावसामुळे मोठे नुकसान

जून आणि जुलैमध्ये राज्यात जोरदार पाऊस झाला या पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले होते. मात्र त्यानंतर ऑगस्टच्या सुरुवातीला पवासाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र आता पुन्हा एकदा पावसाने दमदार हजेरी लावली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात गेल्या तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरूच आहे. आणखी पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. नदी नाल्यांना आलेल्या पुराचा फटका हा शेतकऱ्यांना बसला आहे. तर विविध दुर्घटनेमध्ये काही जणांना आपला जीव देखील गमावावा लागला आहे.

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.