शरद पवार म्हणजे महाराष्ट्राला आणि देशाला लागलेली कीड, राष्ट्रद्रोह…, संभाजी भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य

मोठी बातमी समोर येत आहे, संभाजी भिडे यांनी शरद पवार यांच्याविरोधात वादग्रस्त विधान केलं आहे. शरद पवार म्हणजे महाराष्ट्राला आणि देशाला लागलेली कीड असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

शरद पवार म्हणजे महाराष्ट्राला आणि देशाला लागलेली कीड, राष्ट्रद्रोह..., संभाजी भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य
संभाजी भिडे यांचं वादग्रस्त विधान
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jan 26, 2026 | 5:15 PM

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे हे कायम आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. त्यांच्या विधानांची जोरदार चर्चा होते, दरम्यान त्यांनी आता पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल बोलताना संभाजी भिडे यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. शरद पवार  म्हणजे महाराष्ट्र आणि देशाला लागलेली कीड आहे, शरद पवार म्हणजे राष्ट्रद्रोह आहे, असं संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे. आता संभाजी भिडे यांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. ते आज कर्जत येथे लोहगड, भीमगड, भिवगड अशा गडकिल्ले मोहिमेसाठी आले आहेत, त्यावेळी ते कर्जत येथे बोलत होते.

नेमकं काय म्हणाले संभाजी भिडे?

संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे.  राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल बोलताना संभाजी भिडे यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. संभाजी भिडे यांच्या या विधानामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.  शरद पवार म्हणजे महाराष्ट्र आणि देशाला लागलेली कीड आहे, शरद पवार म्हणजे राष्ट्रद्रोह आहे. राज्याला अशी कीड लागली असून, लवासाची ही कीड काढून टाकू असं संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे. ते कर्जत येथे लोहगड, भीमगड, भिवगड अशा गडकिल्ले मोहिमेसाठी आले आहेत, त्यावेळी संभाजी भिडे हे कर्जतमध्ये बोलत होते.

यापूर्वीही वादग्रस्त विधान 

दरम्यान ही पहिलीच वेळ नाहीये, तर यापूर्वी देखील संभाजी भिडे यांनी अनेक वादग्रस्त विधानं केली आहेत, त्यावरून मोठा वाद देखील निर्माण झाला होता. आता पुन्हा एकदा संभाजी भिडे यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. शरद पवार म्हणजे महाराष्ट्र आणि देशाला लागलेली कीड आहे, ही लवासाची कीड काढून टाकू असं त्यांनी म्हटलं आहे. आता भिडे यांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.