ऑपरेशन टायगरसाठी इतक्या कोटींची सुपारी; मराठवाड्यातील त्या कॉन्ट्रॅक्टरवर मोठी जबाबदारी…चंद्रकांत खैरे यांनी थेट आकडाच सांगितला

Chandrakant Khaire big Allegation on Eknath Shinde: ऑपरेशन टायगर फत्ते झाल्याचे आजच्या उद्धव सेनेच्या बैठकीवरून स्पष्ट झाले. खासदारांना 50 खोके वाटल्याचा आरोप संजय राऊतांनी केला होता. आता त्यापुढे जात या घोडेबाजारासाठी मराठवाड्यातील कॉन्ट्रॅक्टरवर इतक्या कोटींची जबाबदारी दिल्याचा खळबळजनक आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.

ऑपरेशन टायगरसाठी इतक्या कोटींची सुपारी; मराठवाड्यातील त्या कॉन्ट्रॅक्टरवर मोठी जबाबदारी...चंद्रकांत खैरे यांनी थेट आकडाच सांगितला
चंद्रकांत खैरे, शिंदे सेना, उद्धव सेना
Image Credit source: एजन्सी
| Updated on: Jun 18, 2026 | 2:13 PM

ज्ञानेश्वर लोंढे, प्रतिनिधी, टीव्ही ९ मराठी : ऑपरेशन टायगर अखेर फत्ते झाले. आज उद्धव सेनेने बोलावलेल्या बैठकीला 9 पैकी 6 खासदारांनी दांडी मारली. काल झालेल्या पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत यांनी बंडखोरांना 50 कोटी देण्याचे, मंत्रिपद देण्याचे आश्वासन दिल्याचा आरोप केला. तर पक्ष फुटीसाठी 15 कोटी आगाऊ रक्कमही देण्यात आल्याचा आरोप केला होता. तर ठाकरे सेनेचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire big Allegation on Eknath Shinde) यांनी तर या खासदारांना किती कोटी वाटण्यात आले याचा आकडाच सांगितला. त्यांच्या या नव्या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे.

600 कोटींची जबाबदारी

ऑपरेशन टायगरसाठी मराठवाड्यातील कॉन्ट्रॅक्टरवर 600 कोटीची जबाबदारी दिल्याचा खळबळजनक आरोप उद्धव सेनेचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला. सध्या ऑपरेशन टायगर एसएससी आहे. सध्या ते कायद्याच्या कचाट्यात अडकल आहे. ते यशस्वी होऊ शकत नाही. ज्या पद्धतीने त्यांनी गद्दारी केली ही गद्दारी कोणालाही अवडली नाही. आनंद दिघे साहेबांनी खोपकर याला जी सजा दिली होती. शिवसेनाप्रमुख काय म्हटले तुडवा हे साहेबाच वाक्य मी तुम्हाला दाखवलं. आम्हाला राग येतो. आम्ही एवढे कष्ट करायचे, उद्धव ठाकरे यांनी कष्ट करायचे. शिवसैनिकांनी कष्ट करायचे. नागरिकांनी मतदान करायचं आणि यांनी फुटायचं. छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुद्धा गद्दारांना माफ केलं नव्हतं एवढे लक्षात ठेवा, असा इशारा खैरे यांनी दिला. त्या सहा खासदाराची आता कायदेशीर कारवाई सुरू केली आहे, असे खैरे म्हणाले.

आता तोच आदेश आहे

मतदारसंघात गद्दारांना तुडवा असे राऊत म्हणाले होते. त्यावर खैरेंनी प्रतिक्रिया दिली. बरोबर आहे, राग येतो राग. राग येतो हे गद्दार साले, शिवसैनिकांनी निवडून आणायचं उद्धव साहेबांनी फिरायचं आणि त्यांनी गद्दारी करायची मग आम्हाला राग राग येतो. बाळासाहेबांनी सुद्धा आदेश दिला होता तुडवा, आता तोच आदेश आहे, असे खैरे म्हणाले.

राऊतांनी सांगितलेला आकडा कमी

बंडखोर खासदारांना 15 कोटीचे टोकन दिल्याचा आरोप राऊतांनी केला आहे. त्यावर संजय राऊत यांनी थोडे कमी सांगितले, त्याच्यापेक्षा जास्त टोकन आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त अमाऊंट आहे. मला एका महिन्यापूर्वी सांगितलं होतं एका जणांनी ट्रेनमध्ये की मराठवाड्यातीलच एका कॉन्टॅक्टरला ऑपरेशन टायगरसाठी 600 कोटींची जबाबदारी देण्यात आली आहे. मी घाबरत नाही मी ओपनली बोललोय, त्याच्यापेक्षा जास्त आहे आणि 50 कोटींपेक्षा हा आकडा जास्त आहे, असा दावा चंद्रकांत खैरे यांनी केला.

सामंत 22 आमदार घेऊन भाजपकडे गेले

मंत्री उदय सामंत यांनी स्टेट्‍स ठेवले की, मोठे मोठे गार केले गंमत मध्ये, त्यावर चंद्रकांत खैरे यांनी टीका केली. उदय सामंत 22 आमदार घेऊन भाजपकडे गेले होते, असा आरोप खैरे यांनी केला. शिंदेंना पाहिल्याबरोबर तुम्ही कसे घाबरले मग मांजरा सारखी येऊन जॉईन झाले. मांजर दूध पिते डोळे झाकून तसा तुम्ही केलं त्यांनी जास्त बडबड करू नये त्यांचं काय रेकॉर्ड आहे ते आम्हाला माहित आहे, असा इशारा खैरे यांनी दिला.

आता कायदेशीर कारवाई

दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये हे ६ खासदार आले नाही. व्हिप दिल्यानंतर सुद्धा आले नाही तर एक कायदेशीर कारवाई त्या ठिकाणी होणारच आहे.कायदेशीर कारवाई यासाठी होणार कारण आपण सर्वांना, शिवसेना पक्षाने, उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाने सगळं काही ईमेलमध्ये, व्हाट्सअपमध्ये, त्यांच्या घरी पत्र हे सगळं पाठवलं होतं, पण ते त्यांना मिळालंही. परंतु मिळाल्यानंतर सुद्धा ते आले नाही, तर त्यामुळे त्यांनी पक्षाशी द्रोह केला, विद्रोह केला आणि म्हणून मी या ठिकाणी त्यांना, हे सांगेल की त्यांनी योग्य केलं नाही. जे सहाच्या सहा खासदार उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखालील मशालवर निवडून आले, आणि त्यांनी आता ही गद्दारी केली. ही गद्दारी पक्षाशी केली, ही गद्दारी त्या-त्या मतदारसंघातील केली, त्या मतदारसंघातील लोकांशी केली, म्हणून हे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ही भूमिका आमच्या पक्षाची आहे, असे खैरे यांनी स्पष्ट केले.

खासदारांच्या आई-वडिलांनी किती वाघ मारले?

चंद्रकांत खैरे यांनी खासदार ज्योती वाघमारे यांच्यावरही निशाणा साधला. कोणीतरी काहीतरी त्यांना बोलतं, एक ती बाई कोण आहे आता नवीन ती वाघमारे, किती वाघ मारले माहिती नाही तिच्या वडिलांनी, ते वाघमारे बाई म्हणते की यांना ठाण्याचा हॉस्पिटलमध्ये बेड ठेवलेला आहे. अरे तुम्हाला आता काळ असा बदलतो ना सरकार येतं सरकार जातं. त्यावेळेस तुमची ही अवस्था होणार आहे, आमची नाही होणार. आमचं हे संपलं आता, आता खूप हाय हाय झालं, आता अति झालं पण आता मात्र याच्यानंतर आमचे दिवस येतील आणि मग ही वाघमारे बाई कोण आहे, तिने तिच्या आई-वडिलांनी काही वाघ मारले की नाही माहित नाही पण आडनाव वाघमारे आहे. तर त्या बाईने त्या, मी सांगेल की तू असं म्हणतेस की नाही आता बेड रिकामं ठेवलेलं आहे, आता हे बेड तुमच्यासाठीच कामाला येणार आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी सांगेल की असं बोलणं योग्य नाही, अशी टीका खैरे यांनी केली.

Follow Us