AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जी लोकं १७ दारं फिरले त्यांनी आम्हाला नैतिकता शिकवू नये, अंबादास दानवे यांचा रोख कुणावर?

शिवसेना सत्तेसाठी नाही तर सत्ता शिवसेनेसाठी आहे. सत्ता निश्चितपणे शिवसेनेकडे येईल, असा आशावाद अंबादास दानवे यांनी व्यक्त केला.

जी लोकं १७ दारं फिरले त्यांनी आम्हाला नैतिकता शिकवू नये, अंबादास दानवे यांचा रोख कुणावर?
Govinda Hatwar
Govinda Hatwar | Updated on: May 12, 2023 | 4:44 PM
Share

कुणाल जायकर, प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी सत्ताधाऱ्यांवर केली टीका केली. नैतिकतेच्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांच्यासह सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. एवढे मोठे मुख्यमंत्री पदावर लाथ मारली, ही उद्धव ठाकरे यांची नैतिकता नाही का? गद्दारी करून- करून लोकं गेले. वर्षावर कित्तेक लोकं बसले होते. मनाने तिकडे आणि शरीराने इकडे असाल, तर मला काय करायचं आहे. तुम्ही जा, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट सांगितले होते. आपल्या रक्तमासाची लोक आपल्याला सोडून गेले. त्या हेतुने नैतिकेतून त्यांनी राजीनामा दिला. उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला याचा कोणताही पश्चाताप होत नाही, असं अंबादास दानवे यांनी स्पष्ट केले.

पहाटेचा शपथविधी ही कुठली नैतिकता?

शिवसेना सत्तेसाठी नाही तर सत्ता शिवसेनेसाठी आहे. सत्ता निश्चितपणे शिवसेनेकडे येईल, असा आशावाद अंबादास दानवे यांनी व्यक्त केला. अंबादास दानवे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. देवेंद्र फडणवीस यांनी रात्री तीन वाजता राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केली. त्यांनी आम्हाला नैतिकता शिकवण्याची गरज नाही. पहाटे तीन-चार वाजता घेतलेला शपथविधी ही कोणती नैतिकता होती, याचे उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी द्यावे, असंही अंबादास दानवे यांनी म्हंटलं.

भाजपने आम्हाला नैतिकता शिकवण्याची गरज नाही

राजभवनात शपथ घेतली ती कोणती नैतिकता होती. मेहबूबा मुक्तीसोबत तुम्ही गेलात, ही कोणती नैतिकता आहे. संघमुक्त भारत म्हणणाऱ्या नीतीश कुमार यांच्याबरोबर तु्म्ही सरकार स्थापन केलात, ही कोणती नैतिकता आहे. त्यामुळे भाजपने आम्हाला नैतिकता शिकवण्याची गरज नाही, असा टोला अंबादास दानवे यांनी लगावला. जे पहाटे तीन-चार वाजता शपथविधी घेतात त्यांना आम्हाला नैतिकतेच्या गोष्टी सांगण्याची गरज नाही, असं अंबादास दानवे यांनी सुनावलं.

नितेश राणे हा चिल्लर माणूस

नितेश राणे हा चिल्लर माणूस आहे. त्यांचे वडील कुठे कुठे जाऊन आले. शिवसेना, काँग्रेस, स्वाभीमान पक्ष स्थापन केला. आता भाजपात गेले. त्यांनी 17 दार केले. ते भारतीय जनता पार्टीच्या तुकड्यावर पाळले जातात, त्यांनी आम्हाला शिकवू नये, असा खरपूस समाचार अंबादास दानवे यांनी घेतला.

सर्वोच्च न्यायालयाचा १४५ पानांचा अहवाल. निकालाचं वाचन श्रीकांत शिंदे यांनी केलं पाहिजे. तसेच त्यांच्या गद्दार सहकाऱ्यांनी केले पाहिजे. सुस्पष्टपणे सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. येणाऱ्या काळात सर्वोच्च न्यायालयाच्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्याचे परिणाम दिसतील.

ठाकरे यांच्यावर टीका करणे ही नमक हरामी

संजय शिरसाट हे माता बहिणींवर टीका करतात. ठाकरे साहेब यावेत म्हणून चार-चार वेळा त्यांचे दारं झिजवत होते. ठाकरे साहेबांनी आपल्या मतदारसंघात यावे, म्हणून दहा-दहा वेळा जात होते. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणे ही नमक हरामी आहे. त्यामुळे यांच्या टीकेला काय उत्तर द्यायचं.

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागला आहे. राज्यपालांनी चुकीचे केले हे स्पष्टपणे सांगितले. जनाची नाही, तर मनाची लाज वाटली पाहिजे. आतापर्यंत निकाल ऐकून राजीनामा फेकून द्यायला पाहिजे होता, असा टोला अंबादास दानवे यांनी लगावला.

Follow Us
एक-एक टक्का देतो, आधी 40... शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; खळबळ
एक-एक टक्का देतो, आधी 40...  शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; एकच खळबळ
श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुला
Omraje Nimbalkar | श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले....
ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस
Omraje Nimbalakar | ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस... मोठा गोंधळ
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेम
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेमकं काय म्हणाले?
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच पोलिसांना...
तर नोकरी सोडून राजकारणात या, विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर
तर नोकरी सोडून राजकारणात या, IPS विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर राज ठाकरेंचा थेट हल्लबोल!
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय देशमुखांनी थेट हे काय सांगितलं?
ठरलं तर मग! पुढचे 3 वर्षे हाच कार्यक्रम; शिवसेनेत... उद्धव ठाकरेंनी
ठरलं तर मग! पुढचे 3 वर्षे हाच कार्यक्रम; शिवसेनेत... उद्धव ठाकरेंनी सांगितला मास्टर प्लॅन
शिंदेंनी शब्द पाळला! आणखी एका खासदाराला दिलं सर्वात मोठं गिफ्ट? तब्बल
शिंदेंनी शब्द पाळला! आणखी एका खासदाराला दिलं सर्वात मोठं गिफ्ट? तब्बल...
पुन्हा पेपरफुटी! TET परीक्षेचा पेपर फुटला, पुन्हा परिक्षा कधी होणार?
पुन्हा पेपरफुटी! TET परीक्षेचा पेपर फुटला, पुन्हा परिक्षा कधी होणार?