AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिंदेंनी भुमरेंना उमेदवारी दिली तर चांगलं होईल कारण…; अंबादास दानवेंच्या विधानाने भुवया उंचावल्या

Ambadas Danve on Loksabha Election 2024 : अंबादास दानवे यांच्या विधानाने छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणात चर्चांना उधाण; लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंबादास दानवे नेमकं काय म्हणाले? भाजप नेते आशिष शेलार यांच्यावरही त्यांनी टीकास्त्र डागलं आहे. वाचा सविस्तर...

शिंदेंनी भुमरेंना उमेदवारी दिली तर चांगलं होईल कारण...; अंबादास दानवेंच्या विधानाने भुवया उंचावल्या
| Updated on: Apr 08, 2024 | 12:03 PM
Share

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध घडामोडी घडत आहेत. अशात छत्रपती संभाजीनगरमध्ये घडामोडींना वेग आला आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे मतदारसंघात दौरा करत आहेत. यावेळी शिंदे गटाच्या उमेदवारीवर त्यांनी भाष्य केलं आहे. शिवसेना शिंदे गटाकडून संदिपान भुमरे यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. यावर दानवेंनी भाष्य केलं. संदिपान भुमरे यांचं नाव अद्याप निश्चित झालेलं नाही. आमचा उमेदवार निश्चित होऊन 15 दिवस झालेले आहेत. भुमरे यांचं नाव निश्चित झाल्यास चांगलं आहे. कारण ते आमच्या लोकसभा मतदारसंघातले नाहीत. पुढे कसं करायचं त्यांचं ते आम्ही ठरवू, असं अंबादास दानवे म्हणाले.

निवडणुकीवर भाष्य

सकाळी 7 पासून मी प्रचाराला सुरुवात केली आहे. आतापर्यंत मी पाच ते 7 ठिकाणी गेलो. आज 18 ठिकाणी भेटी देणार आहे. लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. एकनाथ शिंदे शिवसेना चांगल्या पद्धतीने वाचवत आहेत… उमेदवार बदला म्हणायची हिंमत पूर्वी कुणाची नव्हती. आता उमेदवार ठरवायला दिल्लीला जावं लागायतंय. मागच्या वेळी किरीट सोमय्या यांची उमेदवारी शिवसेनेने बदलायला लावली होती. आता शिवसेनेची काय अवस्था आहे, आपल्याला माहिती आहे, असं दानवे यांनी म्हटलं.

शिंदे गटावर निशाणा

तुमच्यासाठी गद्दारी करणाऱ्यांना तुम्ही उमेदवारी देऊ शकत नाही. तुम्ही काय शिवसेना वाचवणार तुम्ही स्वतःला वाचवण्यासाठी गेलेला आहेत. भारतीय जनता पार्टी कसं एकेकाचे ऑपरेशन करते हे तुम्हाला लवकर कळेल. गोवा बिहार इथे भाजप कशी वागली आहे. तुम्हाला मुख्यमंत्रिपदाचे सुख भाजप उपभोगू देणार नाहीतुम्ही इतके दिवस काम केलं ते काय घरगडी म्हणून काम केलं का? मग याच घरगाड्याला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी नगरविकास खातं दिलं कसं? उध्दव ठाकरे इतरांना सहकारी समजतात. तरीही तुम्ही हे बोलत असाल तर ही नमक हरामी आहे, असं विधान अंबादास दानवे यांनी केलं आहे.

आशिष शेलारांना प्रत्युत्तर

आशिष शेलार यांनी आज सकाळी ट्विट करत उद्धव ठाकरेंवर टीका केली. त्यावर अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आशिष शेलार यांना उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करावी लागते नाहीतर त्यांना कुत्रा विचारणार नाही. ठाकरेंवर टीका करण्यासाठी आशिष शेलार यांचं काहीतरी ठरलं असणार आहे. चांगलं काम करतात हे तीन नेते, महाराष्ट्राच्या तिजोरी ची लूट हे तिन्ही नेते करत आहेत. 15 टक्क्यांशिवाय काम करत नाहीत, भूखंड लाटत असतात, हे काम उध्दव ठाकरे यांना करता येत नाही. सलमान खान कलाकार आहे भेटणं काही विशेष नाही, असं अंबादास दानवे म्हणालेत.

माझ्या नादी लागू नका; श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांना इशारा
माझ्या नादी लागू नका; श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांना इशारा.
पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा, कार्यकर्ता जखमी
पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा, कार्यकर्ता जखमी.
काँग्रेसची अधोगती मतांच्या राजकारणामुळे; श्रीकांत शिंदेंची टीका
काँग्रेसची अधोगती मतांच्या राजकारणामुळे; श्रीकांत शिंदेंची टीका.
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू!
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू!.
सपकाळांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; भाजप आक्रमक
सपकाळांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; भाजप आक्रमक.
सपकाळांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही! अतुल सावेंची टीका
सपकाळांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही! अतुल सावेंची टीका.
भाजपकडून हिंदू-मुस्लिम रंग देण्याचं काम! हर्षवर्धन सपकाळांकडून टीका
भाजपकडून हिंदू-मुस्लिम रंग देण्याचं काम! हर्षवर्धन सपकाळांकडून टीका.
हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात पुण्यात भाजप- काँग्रेसचे आंदोलक आक्रमक
हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात पुण्यात भाजप- काँग्रेसचे आंदोलक आक्रमक.
काळजी फक्त रोहित पवारांनाच आहे असं नाही; प्रवीण दरेकरांचं मोठं विधान
काळजी फक्त रोहित पवारांनाच आहे असं नाही; प्रवीण दरेकरांचं मोठं विधान.
हर्षवर्धन सपकाळांच्या विधानाविरोधात राज्यभरात आंदोलन
हर्षवर्धन सपकाळांच्या विधानाविरोधात राज्यभरात आंदोलन.