AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shirala : पूल पाण्यात कोसळला, लाटा उसळल्या, कपडे धुण्यासाठी आलेल्या महिला घराकडं पळाल्या, कारण…

पूल कोसळल्यानंतर शेतकऱ्यांनी संबंधित विभागाकडे नव्या पूलाची मागणी केली आहे. ज्यावेळी पूल कोसळला त्यावेळी तिथं दोन महिला कपडे धूत होत्या. पूल कोसळल्यानंतर कॅनॉलमधील पाण्याच्या लाटा उसळल्या, त्यावेळी घाबरलेल्या महिला घराकडं पळाल्या.

Shirala : पूल पाण्यात कोसळला, लाटा उसळल्या, कपडे धुण्यासाठी आलेल्या महिला घराकडं पळाल्या, कारण...
shirala kusalewadiImage Credit source: tv9marathi
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Feb 16, 2023 | 10:10 AM
Share

शंकर देवकुळे, सांगली : जिल्ह्यातील शिराळा (Sangli Shirala) तालुक्यातील कुसळेवाडीतील (kusalewadi) वारणा डावा कालव्यावरील अचानक ढासळला. ती घटना घडली त्यावेळी पुलावर कोणी नसल्यामुळे कसल्याची प्रकारची जीवीतहाणी झाली नाही. हा पूल ज्यावेळी कोसळला, त्यावेळी तिथं कपडे धुण्यासाठी आलेल्या महिला एकदम भयभीत झाल्या असल्याची माहिती मिळाली आहे. पूर कोसळल्यामुळे शेतकऱ्यांची (farmer) मोठी अडचण होणार आहे. त्या रस्त्यावरून शेतीच्या अनेक वस्तू नेल्या जात होत्या. त्याचबरोबर कुसळेवाडी मस्कर गल्लीचा संपर्क तुटला आहे. अधिकाऱ्यांना वारंवार तक्रार देऊन सुध्दा कसल्याची प्रकारची दुरुस्ती केली नसल्याचं ग्रामस्थ सांगत आहेत.

गावची नव्वद टक्के शेती पुलाच्या पलीकडे…

शिराळा पश्चिम भागात कुसळेवाडी हे साधारण एक हजार लोक संख्येचे गाव आहे. गावाला लागून वारणा डावा कालवा गेला आहे. गावची नव्वद टक्के शेती पुलाच्या पलीकडे असल्याचं शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे कालव्यावरील पुलावरून सतत शेतकऱ्यांची रहदारी सुरू होती. पुलाच्या पलिकडे दहा कुटुंब वास्तव्यास आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून पुलाची दुरवस्था झाली होती. पुलावर लावण्यात आलेले पोल सुध्दा गायब झाले आहेत. पुलाच्या मधील दगडी भिंतीची दगडे हळूहळू ठासळू लागली होती. तर एका बाजूने पुलाचा भराव ही ठासळू लागला होता.

अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे पुल कोसळला

याबाबत कुसळेवाडीचे सरपंच श्रीकृष्ण कुसळे यांनी पुढाकार घेऊन संबंधित विभागाला वेळोवेळी पुलासंदर्भात कागदोपत्री निवेदन दिले होते. वारंवार अधिकाऱ्यांना विनवणी करुन सुध्दा अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे पुल कोसळला असल्याचा आरोप सरपंचांनी केला आहे. ज्यावेळी पूल कोसळला त्यावेळी शेतकऱ्यांची अथवा कोणत्याही प्रकारची वाहतूक सुरु नव्हती. त्यामुळे या घटनेत कोणत्याही प्रकारची जिवितहाणी झाली नाही. पुल कोसळल्याने येथील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. आता शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी पणुंब्रे वारूण गावच्या पूलावरून वाहतूक करावी लागणार आहे. तसेच कॅनोलला कायम पाणी राहिल्यास नागरिकांची मोठी अडचण होणार आहे.

त्यावेळी घाबरलेल्या महिला घराकडं पळाल्या.

पूल कोसळल्यानंतर शेतकऱ्यांनी संबंधित विभागाकडे नव्या पूलाची मागणी केली आहे. ज्यावेळी पूल कोसळला त्यावेळी तिथं दोन महिला कपडे धूत होत्या. पूल कोसळल्यानंतर कॅनॉलमधील पाण्याच्या लाटा उसळल्या, त्यावेळी घाबरलेल्या महिला घराकडं पळाल्या.  त्यांनी गावातल्या लोकांना या घटनेची माहिती दिली.  घटनास्थळी ग्रामस्थांनी धाव घेतली,

Follow Us
राजकारण पुन्हा तापलं! गडकरींनी तात्काळ राजीनामा... पुन्हा नव्या मागणी
राजकारण पुन्हा तापलं! गडकरींनी तात्काळ राजीनामा...  पुन्हा नव्या मागणीने मोठी खळबळ
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांशी संवाद, तब्बल
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांशी संवाद, तब्बल 400...
लाडक्या बहिणींना अखेर ती खुशखबर आलीच, आदिती तटकरेंनी थेट घोषणाच केली;
लाडक्या बहिणींना अखेर ती खुशखबर आलीच, आदिती तटकरेंनी थेट घोषणाच केली; लाखो महिलांन होणार फायदा!
मोदींच्या निवासस्थानाबाहेर... इंदिरा गांधींचा उल्लेख करत एकनाथ शिंदें
मोदींच्या निवासस्थानाबाहेर... इंदिरा गांधींचा उल्लेख करत एकनाथ शिंदेंचा मोठा दावा!
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेची तब्येत खालावली; रुग्णालयातील फोटोंनी
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेची तब्येत खालावली; रुग्णालयातील फोटोंनी वाढवलं टेन्शन
आम्ही फेस टु फेस वाले, तुम्ही... भर मंचावरून एकनाथ शिंदे काय म्हणाले?
आम्ही फेस टु फेस वाले, तुम्ही... भर मंचावरून एकनाथ शिंदे असं का म्हणाले?
मोठी बातमी! लालू प्रसाद यादव यांच्या मुलाला थेट अटक, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! लालू प्रसाद यादव यांच्या मुलाला थेट अटक, नेमकं काय घडलं?
ठाकरेंच्या सभेत बोलक्या बाहुल्याचाही सरकावर वर हल्लाबोल; थेट म्हणाला,
ठाकरेंच्या सभेत बोलक्या बाहुल्याचाही सरकावर वर हल्लाबोल; थेट म्हणाला, धुरंधर 3 मध्ये पंतप्रधान...
खड्डामंत्री म्हणत मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, एकाच...
खड्डामंत्री म्हणत मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, एकाच शब्दाने उडवली खळबळ
दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर स्वतः मुख्यमंत्री फडणवसीचं स्पष्टीकरण
दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवसीचं स्पष्टीकरण, म्हणाले...