AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हे चित्र काय बरोबर नाही? मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राऊतांचा संताप, फडणवीस, शिंदेंकडे केली मोठी मागणी

राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे, मराठा बांधवांचं मुंबईमध्ये आंदोलन सुरू आहे, यावर प्रतिक्रिया देताना आता संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे मोठी मागणी केली आहे.

हे चित्र काय बरोबर नाही? मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राऊतांचा संताप, फडणवीस, शिंदेंकडे केली मोठी मागणी
| Updated on: Aug 30, 2025 | 12:07 PM
Share

राज्यात पुन्हा एकदा मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून आंदोलनाला सुरुवात झाली आहे. मराठा समाज मुंबईमध्ये एकवटला आहे. भर पावसात देखील आंदोलन सुरूच होतं. यावरून आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मोठी मागणी केली आहे.

नेमकं काय म्हणाले राऊत? 

केंद्रामध्ये नरेंद्र मोदी यांचं सरकार आहे, हा विषय जर केंद्राच्या अखत्यारीमधला असेल तर केंद्रात सुद्धा आपलंच सरकार आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांचं केंद्रात चांगलं वजन आहे. फडणवीसांचं वजन नरेंद्र मोदींकडे आहे, तर शिंदेंचं वजन हे अमित शाहांकडे आहे. या दोन्ही नेत्यांचं मन वळवण्याचं काम आणि एक वेगळा कायदा करण्याचं काम या दोन नेत्यांनी केलं पाहिजे, आम्ही पाहातोय, आमचा सगळा मराठी माणूस पावसात भिजतोय, चिखलात बसला आहे. महाराष्ट्रासाठी हे काय चित्र बर नाही, असं यावेळी संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान आरक्षणासाठी संविधानात बसणारे मार्ग काढावे लागतील, केवळ आश्वासन देऊन दोन समाज एकमेकांसमोर उभे राहू नयेत, यासाठी आम्ही प्रयत्नशिल आहोत. असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं, त्यावर देखील संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे जे समाजाचं नेतृत्व करणारे जे लोक आहेत, ते फडणवीसांचे चेले आहेत. ते फडणवीस सांगतात तसेच वागत आहेत. आणि या विषयावर फडणवीसांनी आम्हाला संविधानाच्या गोष्टी सांगू नयेत. राजकीय इच्छा शक्तिचा एल्गार कोणी केला होता? संविधानाच्या चौकटीत आरक्षण बसालाय पाहिजे हे खरं आहे. संविधान बदलण्याचं काम सातत्यानं होत आहे, आताही संविधान बदललं. आमदार, खासदार, मुख्यमंत्र्यांना अटक करण्यासाठी, तुम्ही संविधान बदलू शकता. आपले जे राजकीय विरोधक आहेत, मंत्री, मुख्यमंत्री यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर तीस दिवसांच्या आत त्यांनी पद सोडावं यासाठी तुम्ही बदल करू शकता. मग महाराष्ट्रातील मराठा समाज हा त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलेला आहे. मग त्यासाठी तुम्ही संविधान बदलायला काय हरकत आहे? असा सवालही यावेळी राऊत यांनी केला आहे.

Follow Us
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच,बंड करण्याआधी
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच, बंड करण्याआधीच...ऑपरेशन लोटसबाबत मोठी माहिती समोर!
राजकीय हालचालींना वेग! ठकारेंचे चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं
राजकीय हालचालींना वेग! ठकारे सेनेतील चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं घडणार?
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला...
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला... नागपूरमध्ये डोकं चक्रावणारा प्रकार
काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर... गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकद
Chandrapur | काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर...  गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकदा चिघळणार
महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
Chandrashekhar Bawankule | महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळं; संशयाचा काटा
Sanchita Ugle Case | तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळलं; संशयाचा काटा नेमका कुणावार
एकही मत फुटता कामा नये; महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
एकही मत फुटता कामा नये; विधान परिषद निवडणुकीत महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
मोठी बातमी! पांढऱ्या कोटामागचा काळा चेहरा? उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केल
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केला अन्...त्या कृतीची सगळीकडे चर्चा!
मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप..
Manda Mhatre | मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप, भाजपाचे दोन्ही नेत्यांमध्ये मोठा वाद!