Sanjay Raut: अखंड काँग्रेससाठी राऊतांचा नारा… शरद पवारांना घातली कोणती गळ? एकत्र येणार काँग्रेसचे फुटीर गट?

Sanjay Raut on Congress: उद्धव ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी मोठे राजकीय वक्तव्य केले आहे. अखंड काँग्रेसचा त्यांनी नारा दिला आहे. काँग्रेसमधून फुटून जे पक्ष राज्यस्तरावर तयार झाले आहेत. त्यांना राऊतांनी मोठे आवाहन केले आहे. त्याचवेळी शरद पवार यांनाही गळ घातली आहे.

Sanjay Raut: अखंड काँग्रेससाठी राऊतांचा नारा... शरद पवारांना घातली कोणती गळ? एकत्र येणार काँग्रेसचे फुटीर गट?
संजय राऊत, काँग्रेस, शरद पवार
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Jun 11, 2026 | 10:55 AM

Sanjay Raut on Congress: खासदार संजय राऊत यांनी अखंड काँग्रेसचा नारा दिला आहे. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत अखंड काँग्रेस हा भाजपसाठी मोठे आव्हान उभं करू शकतो असे वक्तव्य राऊतांनी केले आहे. काँग्रेसमधून फुटून जे पक्ष स्थानिक पातळीवर काम करत आहेत. त्यांना राऊतांनी मोठे आवाहन केले आहे. त्याचवेळी शरद पवार यांनाही गळ घातली आहे. त्यांच्या या नव्या दाव्याने खळबळ उडाली आहे. दिल्लीत ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस पक्ष श्रेष्ठींशी बैठक घेतल्यानंतर राऊतांच्या विधानाला महत्त्व आले आहे.

शरद पवार यांनी घ्यावा पुढाकार

देशात काँग्रेस अधिक मजबूत व्हायला पाहिजे. काँग्रेसमधून जे लहान पक्ष फुटून निघाले आहेत. त्यांनी देशाची परिस्थिती समजून घ्यायला पाहिजे. त्यानुसार अखंड काँग्रेस, प्रबळ पर्याय म्हणून देशात उभी राहायला हवी. शरद पवार यांनी यासंदर्भात पुढाकार घेतला पाहिजे, असे मोठे आवाहन खासदार संजय राऊत यांनी केले आहे. नवी दिल्लीत तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली. या भेटीसंदर्भात राऊतांना प्रश्न विचारण्यात आला, त्यावेळी ही जी एकत्र येण्याची विचारधारा तयार होत आहे. त्यासंदर्भात त्यांनी नेतृत्व केलं. पुढाकार घेतला तर हा विचार एकदम पुढे जाईल. काँग्रेसमधून फुटून जे पक्ष बाहेर पडले आहेत. ते काँग्रेससोबत काम करत आहेत. हा जर विचार एकत्र आला तर नरेंद्र मोदी यांनी देशावर जो भ्रष्ट आणि कपट या माध्यमातून कारभार लादलेला आहे. त्याला फार मोठं आव्हान उभं करता येईल, असा विश्वास खासदार राऊत यांनी व्यक्त केला.

मोदी कुठे इलेक्टेड प्रायमिनिस्टर आहेत?

नरेंद्र मोदी यांचं खरं पंतप्रधान पद हे 2014 ते 2019 लोकांनी निवडून दिलेले आहे. त्यानंतर चोरलेल्या निवडणुकीतून ते पंतप्रधान झालेले आहेत. 2014 मध्ये लोकांनी त्यांना निवडून दिले. त्यानंतरच्या दोन्ही निवडणुकीत जनतेने पराभूत केलेले असताना निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्ट, ईडीचा वापर या माध्यमातून ते निवडून आले. गेल्या निवडणुकीत 2024 मध्ये ते निवडून आलेलेच नाही. ते कुठे इलेक्टेड प्रायमिनिस्टर आहेत? असा टोला राऊतांनी लगावला.

85 न्यायाधीश पिकनिकवर

सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश मंत्र्यांसोबत लंडनला पिकनिकवर गेले आहेत. जनतेच्या पक्षावर देशातील 85 न्यायाधीश पिकनिकवर गेलेले आहेत. त्या देशातील न्यायव्यवस्थेकडून तुम्ही काय आशा ठेवू शकता, असा सवाल राऊतांनी विचारला. त्याच आधारावर मोदी पंतप्रधान पदावर टिकलेले असल्याचा आरोप राऊतांनी केला. गेल्या चार वर्षांपासून त्यांना शिवसेना फुटीवरील निवाडा केलेला नाही. मिनाक्षी नटराजन यांना कसा न्याय मिळेल असा सवाल राऊतांनी यावेळी केला.

Follow Us