AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : आता संयम संपला, मुख्यमंत्री, गृहमंत्री एक्शन मोडमध्ये, राऊतांचा भाजपला थेट इशारा

महाविकास आघाडी सरकारचे दोन मंत्री सध्या जेलमध्ये आहेत. त्यावरही त्यांनी भाष्य केलं आहे. आता संयम संपलेला आहे. मुख्यमंत्री, (Cm Uddhav Thackeray) गृहमंत्री एक्शन मोडमध्ये आले आहेत, असे म्हणत त्यांनी भाजप नेत्यांना थेट इशारा दिला आहे.

Sanjay Raut : आता संयम संपला, मुख्यमंत्री, गृहमंत्री एक्शन मोडमध्ये, राऊतांचा भाजपला थेट इशारा
संजय राऊतांचा भाजपला थेट इशाराImage Credit source: tv9
| Updated on: Apr 18, 2022 | 5:09 PM
Share

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) सतत भाजपवर बरसत आहेत. आज त्यांनी पुन्हा भाजपला केद्रीय तपास यंत्रणांच्या धाडींवरून (ED, CBI) इशारा दिला आहे. महाविकास आघाडी सरकारचे दोन मंत्री सध्या जेलमध्ये आहेत. त्यावरही त्यांनी भाष्य केलं आहे. आता संयम संपलेला आहे. मुख्यमंत्री, (Cm Uddhav Thackeray) गृहमंत्री एक्शन मोडमध्ये आले आहेत, असे म्हणत त्यांनी भाजप नेत्यांना थेट इशारा दिला आहे. केंद्रीय तपास यंत्रणा कायद्याचा आणि अधिकाराचा गैरवापर करत आहेत, राज्यात त्यांनी हैदोस घातलाय. या बेईमान आणि बेकायदेशीर कारवाया आहेत. मात्र केस किती खोट्या पायावर उभी आहे, ते तुम्हाला कळेल, असेही राऊत म्हणाले आहेत. तसेच देशमुखांच्या 6 वर्षांच्या नातीची चौकशी करावी, एवढं नीच राजकारण सध्या सुरू आहे, असेही ते म्हणाले आहेत.

आरोप करणारे नेतेच भ्रष्ट

नवाब मलिक यांच्यावरील कारवाईबाबत बोलताना, नवाब मलिक 55 लाखांची केस 5 लाखांवर आली. माझ्या बाबतीतही 11 कोटी 1500 कोटी, जुन्या काळातलं कोणतं तरी प्रकरण काढायचं आणि त्रास द्यायचा हे सुरू आहे, असा आरोप त्यांनी केला आहेत. तसेच भाजप नेत्यांवरील कारवाईबाबत बोलताना ते म्हणाले, 13, 14 वर्षांपूर्वी विक्रांतच्या नावाखाली पैसे दिले, त्यांना वाटतं आमचे पैसे योग्य ठिकाणी गेले. मात्र राजभवन आमचं नाही, त्यांचं आहे. त्यांनी पैसे न मिळाल्याची माहिती दिली. तसेच तुम्ही महात्मा गांधी आहात का? दादासाहेब धर्माधिकारी आहात का? विनोबाजी भावे आहात का? तुम्ही भ्रष्ट आहात. लोकांसाठी वेगळ्या कारणावरुच पैसे गोळा केले आणि पक्षाला दिले, पावती कुठंय.. फक्त 11 हजार म्हणत आहेत, मात्र मी म्हणतो 58 कोटी रुपयांचा आरोप माझा बरोबर आहे, असेही राऊत म्हणाले आहेत.

भाजप नेत्यांना दिलासा कसा मिळतो?

तसेच संजय राऊतांनी अनेकदा न्यायालयावर आरोप लावल्याचा आरोपही भाजपकडून होत आहे. मात्र या आरोपांना उत्तर देताना, मी वस्तूस्थिती सांगतोय. दिशा सालीयन प्रकरणामध्ये दिलासा. अटकेपासून संरक्षण, विक्रांत प्रकरणात अटकेपासून संरक्षण, मुबै बँकेच्या घोटाळ्यात अटकेपासून संरक्षण, अशी 10-12 उदाहरण देता येईल, ज्यात भाजप नेत्यांना संरक्षण दिलं जातंय. मात्र आम्हाला अटकेपासून संरक्षण नाही, आमच्यावर ताशेरे ओढले जातायत, आमच्या केसेस ऐकून घेतल्या जात नाहीत, असा आरोपही त्यांनी केला आहे.

ऊस शेतीवर शरद पवारांनी बोलनं हे अत्यंत दुर्दैवी; राजू शेट्टींचे शरद पवारांना प्रत्युत्तर

Shivsena : हिंदू मतं गमावण्याची भीती? सोनिया, पवारांनी मोदींना लिहिलेल्या पत्रावर शिवसेनेची सही नाही, राऊतांनी कारण सांगितलं

Kalyan BJP MNS Protest : येडे बिडे समजले का तुमी, कल्याण पालिकेवर भाजप-एमएनएसचा ‘तहान मोर्चा’, राजू, पाटील, रवींद्र चव्हाण आक्रमक

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.