AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हा बाळासाहेब ठाकरेंचा अवमान, संजय राऊतांनी ठणकावले, थेट म्हटले, जे लोक सीबीआय आणि ईडीला..

आज उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक पार पडतंय. एनडीएचे उमेदवार सी.पी. राधाकृष्णन आणि इंडिया आघाडीचे पी. सुदर्शन रेड्डी यांच्यात ही लढत आहे. या निवडणुकीबद्दल संजय राऊत यांनी थेट मोठे भाष्य केले आहे.

हा बाळासाहेब ठाकरेंचा अवमान, संजय राऊतांनी ठणकावले, थेट म्हटले, जे लोक सीबीआय आणि ईडीला..
Sanjay Raut
| Updated on: Sep 09, 2025 | 10:34 AM
Share

आज देशात उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक पार पडतंय. एनडीएचे उमेदवार सी.पी. राधाकृष्णन आणि इंडिया आघाडीचे पी. सुदर्शन रेड्डी यांच्यातील ही लढत आहे. 10 वाजता सुरू झालेली मतदान प्रक्रिया संध्याकाळी 5 वाजता संपेल. 391 मतांची आवश्यकता आहे. एनडीएकडे 422 आणि इंडिया आघाडीकडे 312 खासदारांचे समर्थन आहे. मात्र, काहींनी या निवडणुकीत तटस्थ राहण्याची भूमिका घेतलीये. आता या निवडणुकीबद्दल संजय राऊत यांना मोठा खुलासा केलाय. यासोबतच त्यांनी गंभीर आरोपही केले आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मतदान करण्यासाठी संसदेत पोहोचले आणि त्यांनी आपला हक्क बजावला.

संजय राऊत यांनी म्हटले की, भाजपाला प्रत्येक निवडणुकीत पैशांच्या वापराची मोठी चटक लागलीये. BJD, BRS वर एनडीएला मतदान करण्यासाठी दबाब आहे. आमची मते पक्की आहेत आणि ही लढत रंगतदार होणार. हे तिन्ही दल तटस्थ राहिले म्हणजे हाच भारतीय जनता पार्टीला मोठा धक्का आहे. जे सातत्याने भाजपाच्या बाजूने उभा राहिले प्रत्येक विधायकाच्यावेळी आज ते उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमध्ये मतदानासाठी येणार नाहीत, हा भाजपाला आणि मोदी, शहांच्या राजकारणाला धक्का आहे.

भविष्यामध्ये काय होऊ शकते, याचा हा अंदाज आहे. आमच्या उमेदवाराला मतच पडणार नाही, हे म्हणत असतील पण आज रात्री नऊपर्यंत दुध का दुध पाणी का पाणी होईलच. या क्षणी त्यांच्यामध्ये आणि आमच्यामध्ये 40 मतांची तफावत आहे, हे आम्ही मान्य करतो. त्यांच्याकडे मित्रपक्षाचे मिळून बहुमत आहे. तरीही आम्ही आमचे सुदर्शन रेड्डी यांना निवडणुकीत उतरवले आहे. पाहू काय होतंय.

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, ज्यांचा स्वत:चा पक्ष भाजपात विलीन होण्यास निघालाय, ते भाष्य करत असल्याचे म्हणत शिंदेंच्या शिवसेनेवर राऊतांनी टीका केली. जे आज शिवसेनेत आहेत ते निष्ठावंत आमदार खासदार आहेत. ज्यांना जायचे होते तो गाळ निघून गेला. जे पैशाला विकत गेले, दहशतीला किंवा सीबीआय आणि ईडीला घाबरून निघून गेले, त्यांनी आमच्या पक्षातील निष्ठावंतांवर बोलणे हा शिवसेनेचा आणि बाळासाहेब ठाकरेंचा अवमान आहे.

Follow Us
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?.
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह..
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह...
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी.
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला.
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?.
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?.
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप.
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?.
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले.
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा.