AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : कामराचा स्टुडिओ तोडला हे चांगलं काम का?, संजय राऊत यांचा राज ठाकरेंना थेट सवाल

चांगल्या पद्धतीने मराठी माणसाकडे पाहत असाल तर आमचा तुम्हाला निश्चित पाठिंबा राहील, असं राज ठाकरे हे मुख्यमंत्री फडणवीसांना उद्देशून बोलले होते. मात्र त्यांच्या याच विधानाचा आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी चांगला समाचार घेतला आहे.

Sanjay Raut : कामराचा स्टुडिओ तोडला हे चांगलं काम का?, संजय राऊत यांचा राज ठाकरेंना थेट सवाल
संजय राऊत यांचा राज ठाकरेंना थेट सवाल Image Credit source: social media
| Updated on: Mar 31, 2025 | 10:40 AM
Share

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढी पाडवा मेळाव्यात बोलताना राज ठाकरेंनी तूफान फटकेबाजी केली. चांगल्या पद्धतीने मराठी माणसाकडे पाहत असाल तर आमचा तुम्हाला निश्चित पाठिंबा राहील, असं राज ठाकरे हे मुख्यमंत्री फडणवीसांना उद्देशून बोलले होते. मात्र त्यांच्या याच विधानाचा आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी चांगला समाचार घेतला आहे. ‘ देवेंद्र फडणवीस यांनी चांगलं काम केलं तर पाठिंबा देऊ असं राज ठाकरे म्हणाले. तर त्यांनी चांगल्या कामाची यादी जाहीर करायला हवी होती काल. कुणाल कामराचा स्टुडिओ फोडला,हे चांगलं काम आहे का?’ असा थेट सवाल राऊत यांनी राज ठाकरेंना विचारला.

मुंबईत मराठी माणसाची पिछेहाट सुरू आहे. राज्यातून उद्योग बाहेर चालले आहेत. त्यावर फडणवीस काहीच बोलत नाहीत हे चांगलं काम आहे का? मुंबईत मराठी माणसाला घर नाकारलं जातंय मराठी संस्कृतीवर हल्ला होत आहे, हे चांगलं काम असेल तर फडणवीस यांना पाठिंबा देणं राष्ट्राची गरज आहे. पण ठिक आहे, असा टोला राऊत यांनी लगावला.

काय म्हणाले संजय राऊत ?

देवेंद्र फडणवीस यांनी चांगलं काम केलं तर पाठिंबा देऊ असं राज ठाकरे म्हणाले. तर त्यांनी चांगल्या कामाची यादी जाहीर करायला हवी होती काल. त्यांना कोणत्या चांगल्या कामाची फडणवीस यांच्याकडून अपेक्षा आहे. कुणाल कामराचा स्टुडिओ फोडला, गुन्हेगारांना पाठिशी घातलं हे चांगलं काम आहे का. मुंबईत मराठी माणसाची पिछेहाट सुरू आहे. राज्यातून उद्योग बाहेर चालले आहेत. त्यावर फडणवीस काहीच बोलत नाहीत हे चांगलं काम आहे का? मुंबईत मराठी माणसाला घर नाकारलं जातंय मराठी संस्कृतीवर हल्ला होत आहे, हे चांगलं काम असेल तर फडणवीस यांना पाठिंबा देणं राष्ट्राची गरज आहे, असं राऊत म्हणाले.

राज ठाकरे यांनी मनावर घेऊन कुणाच्या कानफटात मारायचं ठरवलं असेल तर त्यांचं स्वागत

औरंगजेबाबत त्याच्या कबरी संदर्भात आम्ही सातत्याने हीच भूमिका घेतली आहे, शिवाजी महाराजांसाठी आणि मराठा साम्राज्यासाठी ज्यांनी प्राणांची आहुती दिली. त्यांच्या शौर्याचं हे प्रतीक आहे. लोकसभेत त्यांची भूमिका वेगळी होती. भाजपच्या सोयीची होती. मराठी माणसा संदर्भात कानफटात आवाज काढायचं असेल तर काढलीच पाहिजे. कोणत्या पक्षाचा माणूस ही भूमिका मांडतोय या विषयी आमच्या मनात संदेह असणार नाही. बाळासाहेब ठाकरेंनी ज्या शिवसेनेची स्थापना केली मराठी माणसासाठी. भाजपने ज्या पद्धतीने मराठी माणसाचं संघटन तोडलं. हा मराठी माणसाच्या एकजुटीवरचा हल्ला आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी मनावर घेऊन कुणाच्या कानफटात मारायचं ठरवलं असेल तर त्यांचं स्वागत आहे. आम्ही आहोतच, असंही राऊत म्हणाले.

महाराष्ट्राच्या शत्रूंना मदत होईल अशी भूमिका कोणी घेऊ नये

बाळासाहेब ठाकरेंची शिवेसना फोडण्यामागे फडणवीस यांचा हात आहे. अमित शाह यांचा हात आहे. मोदींचा हात आहे. ही शिवसेना बाळसाहेबांनी मराठी माणसासाठी तयार केली. त्याची शकले करून व्यापाऱ्यांचा ताबा राहावा म्हणून जे राजकारण आहे. राज ठाकरे यांना त्यात पाठिंबा देऊ इच्छितात त्यात राजकारण आहे. आम्ही मराठी माणसाच्या पुनर्वसनासाठी आणि प्रगतीसाठी आम्ही काम करत आहोत. अशावेळी महाराष्ट्राच्या शत्रूंना मदत होईल अशी भूमिका कोणी घेऊ नये, असं म्हणत राऊतांनी राज ठाकरेंना टोला हाणला.

देवेंद्र फडणवीस यांना चांगलं काम करायचं असेल. त्यांच्या मंत्रिमंडळात जे सदस्य आहे, त्याने कुणाल कामराला ठार मारण्याची धमकी दिली आहे. असा माणूस मंत्रिमंडळात कसा राहू शकतो? दुसरा कोणी असता तर आतापर्यंत पोलीस त्याला घेऊन गेले असते आणि जीवे मारण्याच्या धमकीबद्दल त्याला मोक्का लावला असता. मंत्रिमंडळात असे काही लोकं आहेत ज्यांनी कुणाल कामराला टायरवर उलटा टांगून मारणं म्हणजे ठार मारणं, किंवा जिवंत कसा राहतो अशी भाषा करणं ही तुमच्या मंत्रिमंडळातील लोक करत आहेत आणि गृहमंत्री सहन करत आहेत, अशा शब्दांत राऊतांनी सुनावलं.

Follow Us
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही.
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?.
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा.
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान.
लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - CM फडणवीस
लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - CM फडणवीस.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना...
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना....
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प.
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?.
सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका; फडणवीस यांच्या....
सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका; फडणवीस यांच्या.....
पुन्हा लॉकडाऊन?केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींचं ट्विट काय
पुन्हा लॉकडाऊन?केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींचं ट्विट काय.