AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पावसाळी पर्यटनासाठी सातारा, महाबळेश्वर फिरायला जाताय? थांबा, जिल्हा प्रशासनाने घेतला मोठा निर्णय

सातारा जिल्ह्यात 1 ते 5 ऑगस्ट यादरम्यान रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्या पार्श्वभूमीवर आता सातारा जिल्हा प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे.

पावसाळी पर्यटनासाठी सातारा, महाबळेश्वर फिरायला जाताय? थांबा, जिल्हा प्रशासनाने घेतला मोठा निर्णय
| Updated on: Aug 03, 2024 | 5:54 PM
Share

Satara Tourist Spot Close : गेले काही दिवस सातत्याने राज्यात मुसळधार पाऊस कोसळताना दिसत आहे. मुंबईसह कोकण, विदर्भ, सातारा, सांगली या ठिकाणी जोरदार पाऊस होत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सातारा जिल्ह्यात 1 ते 5 ऑगस्ट यादरम्यान रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्या पार्श्वभूमीवर आता सातारा जिल्हा प्रशासनाने, जिल्ह्यातील विविध धबधबे आणि पर्यटनस्थळे बंद ठेवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. येत्या 5 ऑगस्टपर्यंत साताऱ्यातील धबधबे आणि पर्यटनस्थळे बंद ठेवण्यात येणार आहेत.

सध्या सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होत आहे. याच पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील पर्यटनस्थळी कोणतीही अनुचित घटना घडू नये, तसेच जिवीत आणि वित्तहानी होऊ नये, यासाठी ही पर्यटनस्थळे तात्पुरत्या स्वरुपात बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी येणाऱ्या पर्यटकांसाठी हे आदेश दिले आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला आहे.

कोणकोणत्या पर्यटनस्थळांवर जाण्यास बंदी?

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील लिंगमळा आणि भिलार धबधबा पर्यटनासाठी बंद असेल. तसेच सर्व पर्यटनाचे पॉइंट, पाटण तालुक्यातील – ओझर्डे (नवजा) व सडावाघापूर धबधबा, सातारा तालुक्यातील- ठोसेघर, केळवली, वजराई-भांबवली धबधबे व कास तलाव बंद ठेवण्यात येणार आहे. त्यासोबतच जावली तालुक्यातील- ऐकीव या धबधब्यांच्या ठिकाणी विशेषतः मान्सून कालावधीत पर्यटक गर्दी करत असतात. मात्र पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी ही पर्यटन स्थळं तात्पुरत्या स्वरुपात बंद ठेवण्यात येणार आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश काय?

या धबधब्यांच्या ठिकाणी जाणारे मार्ग आणि रस्ते बंद करण्यात आले आहेत. पोलीस विभाग आणि संबंधित गावातील वन हक्क समितीने धबधब्याच्या ठिकाणी पर्यटक जाणार नाहीत, याची काळजी घ्यावी, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. तसेच या ठिकाणी कोणतीही अनुचित घटना घडू नये, याबाबत काळजी घ्यावी. या पर्यटनस्थळी आवश्यकतेनुसार पोलीस बंदोबस्त करण्यात यावा आणि आवश्यक त्या ठिकाणी पेट्रोलिंग करावे, असेही आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.

पोलीस बंदोबस्तासाठी आवश्यकतेनुसार होमगार्ड विभागाची मदत घेण्यात यावी. आवश्यकता भासल्यास नियमांचा भंग करणाऱ्यांविरुध्द आवश्यक ती कठोर कारवाई करावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

Follow Us
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार.
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण.
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक...
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक....
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल.
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण.
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?.
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी.
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी.
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?.
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण.