AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खारघरची घटना सरकारने घडवली, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ; काँग्रेसने त्या कार्यक्रमाची पोलखोल केली

हा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर कार्यक्रस्थळी जमिनीवर काहीही नव्हतं, मंडप नव्हता मात्र एयर कंडिशन मंच राज्याच्या सरकारसाठी तयार केलेला होता, मात्र लोकांसाठी कोणतीही व्यवस्था करण्यात आली नव्हती.

खारघरची घटना सरकारने घडवली, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ; काँग्रेसने त्या कार्यक्रमाची पोलखोल केली
| Updated on: Apr 19, 2023 | 6:08 PM
Share

सातारा : महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी लाखो नागरिक उपस्थित होते. त्यावेळी उष्माघाताने आतापर्यंत 13 श्री सेवकांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतर या कार्यक्रमाला गालबोट लागल्याची प्रतिक्रिया उमटली आहे. या कार्यक्रमावरून आता काँग्रेसही आक्रमक झाली असून सरकारवर त्यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. खारघरची घटना सरकारने घडवलेली घटना असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे नेते आणि आमदार नाना पटोले यांनी केला आहे. या प्रकरणात सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.

नाना पटोले यांनी सांगितले की, आम्ही पहिल्या दिवसांपासून गी मागणी करतोय असंही त्यांनी यावेळी सांगिले.

नाना पटोले यांनी सरकारवर टीका करताना म्हणाले की, आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी वेळ दिलेली होती, मात्र त्यावेळी हा कार्यक्रम घेतला असंही सरकारकडून सांगण्यात येते मात्र आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यावर आरोप करणं म्हणजे लाज वाटण्यासारखी परिस्थिती आहे असा घणाघातही नाना पटोले यांनी त्यांच्यावर केला आहे.

काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी टीका करताना त्यांनी सांगितले की, मला मिळालेल्या रिपोर्टनुसार तो कार्यक्रम साडेदहा वाजता सुरू होणार होता.

मात्र अमित शाह एक तास उशिराव कार्यक्रमामध्ये पोहोचले, त्यानंतर 12 वाजता कार्यक्रमाला सुरुवात झाली त्यामुळे लोकांना या कार्यक्रमात उष्माघाताचा त्रास झाल्याची टीकाही त्यांच्याकडून करण्यात आली. महाराष्ट्र भूषण कार्यक्रमाचे नियोजनच मुळात कडकडत्या उन्हात करण्यात आले. मात्र जी लोकं कार्यक्रमासाठी आली होती, त्यांना बसण्यासाठी कोणत्याही प्रकारची व्यवस्था करण्यात आली नव्हती.

त्याचदरम्यान उष्माघाताने काही जणांचा मृत्यू झाला होता तरी देखील हा कार्यक्रम सुरू ठेवण्यात आला असा गंभीर आरोपही त्यांनी त्यांच्यावर केला.

हा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर कार्यक्रस्थळी जमिनीवर काहीही नव्हतं, मंडप नव्हता मात्र एयर कंडिशन मंच राज्याच्या सरकारसाठी तयार केलेला होता.

त्यामुळे झालेल्या मृत्यूची सर्व जबाबदारी ही राज्य सरकारची आहे कारण हा कार्यक्रम सरकारचा होता. त्यामुळे याची सर्व जबाबदारी घेऊन सरकारने राजीनामा द्यावा अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. यावेळी नाना पटोले यांनी सांगितले की, मी विशेष अधिवेशनाची मागणी राज्यपालांकडे करणार असल्याचे पत्र मेल करणार आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले.

Follow Us
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण.
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्...
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्....
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू.
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार.
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?.
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना...
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा.....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा......
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?.
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री..
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री...