AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खारघरची घटना सरकारने घडवली, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ; काँग्रेसने त्या कार्यक्रमाची पोलखोल केली

हा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर कार्यक्रस्थळी जमिनीवर काहीही नव्हतं, मंडप नव्हता मात्र एयर कंडिशन मंच राज्याच्या सरकारसाठी तयार केलेला होता, मात्र लोकांसाठी कोणतीही व्यवस्था करण्यात आली नव्हती.

खारघरची घटना सरकारने घडवली, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ; काँग्रेसने त्या कार्यक्रमाची पोलखोल केली
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Apr 19, 2023 | 6:08 PM
Share

सातारा : महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी लाखो नागरिक उपस्थित होते. त्यावेळी उष्माघाताने आतापर्यंत 13 श्री सेवकांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतर या कार्यक्रमाला गालबोट लागल्याची प्रतिक्रिया उमटली आहे. या कार्यक्रमावरून आता काँग्रेसही आक्रमक झाली असून सरकारवर त्यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. खारघरची घटना सरकारने घडवलेली घटना असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे नेते आणि आमदार नाना पटोले यांनी केला आहे. या प्रकरणात सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.

नाना पटोले यांनी सांगितले की, आम्ही पहिल्या दिवसांपासून गी मागणी करतोय असंही त्यांनी यावेळी सांगिले.

नाना पटोले यांनी सरकारवर टीका करताना म्हणाले की, आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी वेळ दिलेली होती, मात्र त्यावेळी हा कार्यक्रम घेतला असंही सरकारकडून सांगण्यात येते मात्र आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यावर आरोप करणं म्हणजे लाज वाटण्यासारखी परिस्थिती आहे असा घणाघातही नाना पटोले यांनी त्यांच्यावर केला आहे.

काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी टीका करताना त्यांनी सांगितले की, मला मिळालेल्या रिपोर्टनुसार तो कार्यक्रम साडेदहा वाजता सुरू होणार होता.

मात्र अमित शाह एक तास उशिराव कार्यक्रमामध्ये पोहोचले, त्यानंतर 12 वाजता कार्यक्रमाला सुरुवात झाली त्यामुळे लोकांना या कार्यक्रमात उष्माघाताचा त्रास झाल्याची टीकाही त्यांच्याकडून करण्यात आली. महाराष्ट्र भूषण कार्यक्रमाचे नियोजनच मुळात कडकडत्या उन्हात करण्यात आले. मात्र जी लोकं कार्यक्रमासाठी आली होती, त्यांना बसण्यासाठी कोणत्याही प्रकारची व्यवस्था करण्यात आली नव्हती.

त्याचदरम्यान उष्माघाताने काही जणांचा मृत्यू झाला होता तरी देखील हा कार्यक्रम सुरू ठेवण्यात आला असा गंभीर आरोपही त्यांनी त्यांच्यावर केला.

हा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर कार्यक्रस्थळी जमिनीवर काहीही नव्हतं, मंडप नव्हता मात्र एयर कंडिशन मंच राज्याच्या सरकारसाठी तयार केलेला होता.

त्यामुळे झालेल्या मृत्यूची सर्व जबाबदारी ही राज्य सरकारची आहे कारण हा कार्यक्रम सरकारचा होता. त्यामुळे याची सर्व जबाबदारी घेऊन सरकारने राजीनामा द्यावा अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. यावेळी नाना पटोले यांनी सांगितले की, मी विशेष अधिवेशनाची मागणी राज्यपालांकडे करणार असल्याचे पत्र मेल करणार आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले.

Follow Us
रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? महाजनांचा मोठा काय?
Girish Mahajan | रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? गिरीश महाजनांचा मोठा दावा काय?
गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक.....
Gondia Rain | गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक शेतकरी चिंतेत
नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
Mumbai | नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! 13 एप्रिलला अटक, आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
Thane Assault Case | ठाण्यातील वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर
Buldhana | लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर; कच्च्या मालाचे नमुने तपासणीसाठी जप्त
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून मोठी भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार, नवे नियम लागू
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
Devendra Fadnavis On Shetkari Karjmafi | कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत संजय राऊतांनाही खोचक टोला
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
Devendra Fadnavis UNCUT | मोदींच्या 12 वर्षांचा महाअहवाल! भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
Devendra Fadnavis | भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले मोदी सरकारच्या 12 वर्षांचे रिपोर्ट कार्ड