AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सातारा जिल्हा-सत्र न्यायालयाचे ‘ते’ न्यायाधीश मोठ्या अडचणीत, त्यांचा जामीनही फेटाळला

लाच प्रकरणात जिल्हा आणि सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्या अटकपूर्व जामीनासाठी आज सातारा न्यायालयात सुनावणी करण्यात आली. यावेळी न्यायमूर्ती निकम यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला.

सातारा जिल्हा-सत्र न्यायालयाचे 'ते' न्यायाधीश मोठ्या अडचणीत, त्यांचा जामीनही फेटाळला
प्रातिनिधिक फोटो
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Dec 13, 2024 | 8:42 PM
Share

सातारा जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह 4 जणांविरोधात 5 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात न्यायमूर्ती धनंजय निकम यांच्या वतीने सातारा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी आज जिल्हा न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी जिल्हा न्यायालयात त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. असं असलं तरीही उच्च न्यायालयाच्या परवानगीशिवाय त्यांना अटक होऊ शकत नसल्यामुळे अद्याप या प्रकरणात न्यायमूर्ती यांना अटक करण्यात आलेली नाही.

नेमके प्रकरण काय?

या प्रकरणात तक्रारदार युवतीचे वडील न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांना जामीन मंजूर करण्यासाठी 5 लाख रुपयांची लाच न्यायमूर्ती धनंजय निकम यांच्या माध्यमातून त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी मागितली होती. यानंतर संबंधित युवतीने पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केली होती. यानंतर पुणे लाचलुचपत विभागाने न्यायमूर्ती धनंजय निकम यांच्यासह चौघांवर सापळा रचून ही कारवाई केली होती.

न्याय कुणाकडे मागायचा?

संबंधित प्रकरण हे अतिशय धक्कादायक आहे. सर्वसामान्य जनता ही न्याय मिळवण्यासाठी न्यायालयात जाते. पण तिथे न्यायाधीशच अशाप्रकारे वागत असतील तर मग न्यायाची अपेक्षा कुणाकडे करायची? असा प्रश्न उपस्थित होतोय. संबंधित न्यायाधीशांवरील आरोप अद्याप पूर्णपणे सिद्ध व्हायचे असले तरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत काही जण सापडले आहेत. त्यामुळे संबंधितांवर कठोर कारवाई होणं अपेक्षित आहे.

विशेष म्हणजे न्यायाधीशांकडे आपण खूप अपेक्षाने पाहत असतो. या महाराष्ट्राला आणि देशाला चांगल्या न्यायमूर्तींची परंपरा लाभली आहे. देशाचा इतिहासही अभिमानास्पद राहिला आहे. पण याचा विसर संबंधित न्यायाधीशांना झाला असेल का? किंवा अशाप्रकारचं कृत्य करणाऱ्या आरोपींना आपण काय करतोय? याचं भान का नसावं? असादेखील प्रश्न उपस्थित होतोय. तसेच न्यायाधीशच अशाप्रकारे वागायला लागले तर सर्वसामान्य जनतेने न्यायासाठी नेमकं कुणाकडे जावं? हा देखील आता महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतोय. याप्रकरणी आता काय-काय कारवाई होते, ते पाहणं महत्त्वाचं आहे.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा