AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“ज्या घोषणा अर्थसंकल्पात आम्ही केल्या, त्याची तरतूद पूर्ण करणार”; या मंत्र्याने सरकारतर्फे विश्वास दिला…

आम्ही सर्व आमदार मंत्री अयोध्येला जाणार होतो मात्र आम्ही आता अधिवेशन संपल्यामुळे अयोध्येला जाऊन प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेणार आहोत आणि धनुष्यबाणाचे पूजनही करणार आहे असं शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्र्याने सांगितले आहे.

ज्या घोषणा अर्थसंकल्पात आम्ही केल्या, त्याची तरतूद पूर्ण करणार; या मंत्र्याने सरकारतर्फे विश्वास दिला...
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Apr 03, 2023 | 7:16 PM
Share

सातारा : काही दिवसापूर्वी राज्यातील काही भागात अवकाळी आणि गारपीट झाल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला होता. तर ऐन रब्बी हंगामात अवकाळी पाऊस झाल्याने शेतमालाला बाजारात योग्य बाजारभाव मिळाला नाही. त्यामुळे उभा पिकावर शेतकऱ्यांनी नांगर फिरवला होता. या नैसर्गिक संकटामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याने अनेक शेतकऱ्यांनी सरकारकडे नुकसानीची मागणी केली. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारनेही अवकाळी व गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यामुळे आता त्याविषयी मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना सवलत द्यायची आहे त्याचा निर्णयदेखील घेण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

अधिवेशन काळामध्ये सरकारला कोंडीत पकडण्याचा विरोधकांकडून यशस्वी प्रयत्न करण्यात आला. तर एका वेळी लक्षवेधी 22 सूचना लावण्यात आल्या होत्या. त्यामुळे विरोधक पूर्णपणे हतबल झालेलेही पाहायला मिळाले असल्याची माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

मागील अडीच वर्षात केंद्राचा निधी पडून होता. त्यामुळे अनेक प्रस्ताव त्या काळात गेलेच नाहीत. दिल्लीला पाठपुरावा न केल्यामुळे मागील अडीच वर्षात केंद्राकडून निधी कमी आला आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले. शिंदे-फडणवीस सरकारने ज्या घोषणा अर्थसंकल्पामध्ये केल्या आहेत. त्याची तरतूदही आम्ही पूर्ण करणार असल्याचेही त्यांनी बोलून दाखवले आहे.

शिंदे-फडणवीस सरकार हे जनसामान्यांचे सरकार आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यावर 50 हजार रुपये लवकरच देऊ असे अश्वासनही त्यांनी दिले आहे. मात्र सरकारकडून याबाबत अजून कोणतीही तारीख अजून देण्यात आले नाही, त्याबाबत याद्या बनवण्याचे काम सुरू असल्याचेही शंभूराज देसाई यांनी सांगितले आहे.

विधानसभेमध्ये विरोधकांच्या विरोधामध्ये तीव्रता दिसून आली नाही. यावेळी मुद्देसूद विरोध दिसून आला नाही अरविंद सावंत यांना हे सर्व सांगायला तीन वर्षे का लागली.

मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरेंचं नाव घेण्यात आलं होतं याविषयी आम्हा सर्व आमदारांना आधी कल्पना का दिली नाही. तीन वर्षानंतर यामध्ये किती सत्य आहे हे ओळखून जावे

महाविकास आघाडीचे नेतृत्व उद्धव ठाकरेंना देणे हा त्यांचा प्रश्न आहे.मात्र शिवसेना आणि भाजपला सत्तेपासून बाजूला ठेवण्यासाठी हे तीन पक्ष एकत्र आले आहेत.

कालच्या झालेल्या सभेवरूनही शंभूराज देसाई यांनी टोला लगावला आहे. नाना पटोले हे कालच्या सभेदरम्यान एका दिवसासाठी आजारी पडतात आणि आज गुजरात दौऱ्याला जातात. त्यामुळे असे कसे असा प्रश्नही निर्माण होण्यासारखा आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीबाबत या निवडणुका स्थानिक लेवलला घेतल्या जातात. यामध्ये चिन्हाचा समावेश नसतो. मात्र स्थानिक पातळीवर फायद्याचा सोयीचे असेल अशा सूचना आमच्या पदाधिकाऱ्यांना दिले असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली आहे.

यावेळी कोरोनाविषयी बोलताना सांगितले की, कोरोनाबाबत ज्या ठिकाणी पेशंट वाढत आहेत. त्या ठिकाणी कोरोना चाचण्या वाढवण्याच्या सूचनादेखील प्रशासनाला देण्यात आले आहेत.जर कोरोनाचे पेशंट वाढू लागले आहेत तर इन्फ्रास्ट्रक्चर तयार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

मागील काही दिवसांपूर्वी आम्ही सर्व आमदार मंत्री अयोध्येला जाणार होतो मात्र आम्ही आता अधिवेशन संपल्यामुळे अयोध्येला जाऊन प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेणार आहोत आणि धनुष्यबाणाचे पूजनही करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

मंत्री शंभूराज देसाई यांनी मंत्रिमंडळ विस्ताराविषयीही बोलताना त्यांनी मंत्रिमंडळाच्या विस्तार लवकरच होणार असल्याचे विश्वासाने त्यांनी बोलून दाखवले.

छत्रपती संभाजीनगरमधील राडा झाल्यानंतर त्यावरून राजकीय टीका टिप्पणी करण्यात आली. जातीय दंगलीवरून भाजप आणि शिवसेनेवरही जोरदार हल्लाबोल करण्यात आला होता.

त्यावरून जातीय दंगली महाविकास आघाडी सरकारच्या काळातही झाल्या आहेत. दंगली घडवणाऱ्यातील काही संशयित पकडले असून लवकरच याची वस्तुस्थिती समोर येणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

Follow Us
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताध
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताधाऱ्यांवर बोरची टीका
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत वाघमारेंचा ठाकरे गटाला इशारा
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत ज्योती वाघमारेंचा ठाकरे गटाला थेट इशारा, संजय राऊतांवरही निशाणा
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं विधान; राजकारणात मोठा भूकंप येणार?
प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप
आता प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप; लवकरच...
कर्जमाफीवरून सरकारने अखेर बैठक बोलवली, नेमकं काय घडतंय?
Dattatray Bharne | कर्जमाफीवरून सरकारने अखेर बैठक बोलवली, रोहित पवारांच्या उपोषणामुळे हालचाली वाढल्या, नेमकं काय घडतंय?
24 तासांतच चांदीचा मुकुट पुन्हा चोरला; तुळजाभवानी मंदिरातील धक्कादायक
24 तासांतच चांदीचा मुकुट पुन्हा चोरला; तुळजाभवानी मंदिरातील धक्कादायक CCTV फुटेज समोर!
अर्वाच्च भाषेतील ऑडीओ क्लिप व्हायरल; बड्या अधिकाऱ्यावर मोठी कारवाई,
अर्वाच्च भाषेतील ऑडीओ क्लिप व्हायरल; बड्या अधिकाऱ्यावर मोठी कारवाई,  ठाकरेंच्या नगरसेवकाला... नेमकं प्रकरण काय?
भाजप आमदाराच्या पत्नीच्या गाडीचा भीषण अपघात; डोक्याला अन्....
मोठी बातमी! भाजप आमदाराच्या पत्नीच्या गाडीचा भीषण अपघात; डोक्याला आणि पायाला दुखापत
40 वर्षांच्या अनुभवासह धीरज सेठ यांच्याकडे देशाच्या सुरक्षेची धुरा
Dhiraj Seth | भारतीय लष्कराला नवे सेनाप्रमुख! 40 वर्षांच्या अनुभवासह धीरज सेठ यांच्याकडे देशाच्या सुरक्षेची धुरा
अजितदादांप्रमाणेच एकनाथ शिंदेंचाही घातपात होणार? बड्या नेत्याच्या
अजितदादांप्रमाणेच एकनाथ शिंदेंचाही घातपात होणार? बड्या नेत्याच्या दाव्याने एकच खळबळ; नेमकं काय सांगितलं?