AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

School Reopen: जगभर कोरोनाची तिसरी लाट असतानाही आपल्याकडे शाळा सुरु करण्याचा निर्णय का? वर्षा गायकवाडांनी कारण सांगितलं

जगातील काही देशांमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं थैमान सुरु आहे. भारतातील केरळ, कर्नाटकातही पुन्हा कोरोनाचा शिरकाव सुरु असताना, राज्यातील शाळा सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. त्याची कारणं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केली.

School Reopen: जगभर कोरोनाची तिसरी लाट असतानाही आपल्याकडे शाळा सुरु करण्याचा निर्णय का? वर्षा गायकवाडांनी कारण सांगितलं
प्रातिनिधिक छायाचित्र
| Edited By: | Updated on: Nov 25, 2021 | 5:14 PM
Share

मुंबईः जगभरात कोरोनाची तिसरी लाट (corona third wave) सुरु असताना आपल्याकडे शाळा सुरु होतील का नाही, याबाबत साशंकता होती. राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी आज सरसकट शाळा 1 डिसेंबरपासून सुरु (School reopens) होणार, अशी घोषणा केली. त्यानंतर सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला. कोरोनाचा धोका असतानाही मुलांना शाळेत येण्याची जोखीम का घेतली जातेय, याचे कारणही गायकवाड यांनी स्पष्ट केलं. गेल्या दोन वर्षांपासून शाळेपासून दुरावलेली मुलं मुख्य प्रवाहात आणणंही तितकंच आवश्यक असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. त्यामुळेच पहिली ते दहावी सरसकट शाळा सुरु करण्याचा मोठा निर्णय आज राज्य शासनानं जाहिर केला.

मुलं मुख्य प्रवाहाबाहेर फेकली जाण्याची शक्यता

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता असतानाही शाळा सुरु होण्याची जोखीम का घेतली जात आहे, याचे कारणही शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं. दोन वर्षांपूर्वी जी मुलं पहिलीला येणार होती, त्यांनी अद्याप शाळेची इमारतही पाहिली नाही. तसेच पहिली ते चौथी या मुलांना शालेय शिक्षणात एकदम दोन वर्षांचा खंड पडला आहे. त्यामुळे ही मुलं मुख्य प्रवाहाबाहेर फेकली जाऊ शकतात. त्यामुळे त्यांच्यासाठी तातडीने शाळा सुरु करणे आवश्यक असल्याचे मत तज्ज्ञांच्या समितीने व्यक्त केले. म्हणूनच राज्य शासनाने हा निर्णय घेतल्याचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.

मुलांची काळजी कशी घेणार?

राज्यातील आठवीच्या पुढील वर्गातील शाळा सुरु झालेल्या आहेत. मात्र आता पहिलीपासून शाळा सुरु होणार आहेत. त्यातच कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, पहिली ते चौथी वर्गातील मुलांची जास्त काळजी घेणे आवश्यक आहे, असा सूर पालकांमधून उमटत आहे. तरीही शाळा सुरु केल्यानंतर मुलांचे आणि पालकांचे योग्य समुपदेशन केले जाईल. किंबहुना मुलांनी बाहेर पडल्यावर किंवा शाळेत कशा प्रकारे काळजी घ्यावी, ही समज पालकांनीच मुलांना द्यायची आहे, असे आवाहनही शालेय शिक्षणमंत्र्यांनी यावेळी बोलताना केले.

स्कूल बस सुरु होणार?

शाळेसाठीच्या बस सुरु करणे किंवा न करणे हा निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आला आहे. त्यानुसार, संबंधित जिल्ह्यात निर्णय घेतला जाईल. मात्र मुलांना घरातल्याच वाहनाने शाळेत सोडल्यास जास्त फायदेशीर ठरेल, असे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले. स्कूल बस सुरु झाल्यानंतरही बसमध्ये बसण्यासंबंधीची नियमावली जारी करण्यात येईल. तसेच शाळेतल्या वर्गांमध्ये बसणे, शाळेच्या आवारात वावरणे इत्यादी नियमावलीदेखील पुढील आठ दिवसात जारी केल्या जातील, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.

इतर बातम्या-

Covid Updates: कर्नाटकातील SDM मेडिकल कॉलेज सील, 66 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

Nashik Gold| योगायोगाचे घबाड, सोने दीड अन् चांदी 4 हजारांनी स्वस्त, वर्षातला शेवटचा गुरुपुष्यामृत गोड झाला!

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.