AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुन्हा मोठा भूकंप? ठाकरेंच्या आमदारांचं आमच्यासोबत बोलणं झालं, शंभुराज देसाई यांनी बॉम्बच फोडला

या शपथविधी सोहळ्यानंतर आता शिवसेना नेते शंभुराज देसाई यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. ठाकरेंच्या आमदारांचं आमच्यासोबत बोलणं झालं आहे, असे शंभुराज देसाई म्हणाले.

पुन्हा मोठा भूकंप? ठाकरेंच्या आमदारांचं आमच्यासोबत बोलणं झालं, शंभुराज देसाई यांनी बॉम्बच फोडला
| Updated on: Dec 06, 2024 | 3:17 PM
Share

Shambhuraj Desai On Uddhav thackeray : महाराष्ट्रात नुकतंच नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला. या शपथविधी सोहळ्यात देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यासह भाजपचे वरिष्ठ मंत्रीही उपस्थितीत होते. या शपथविधी सोहळ्यानंतर आता शिवसेना नेते शंभुराज देसाई यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. ठाकरेंच्या आमदारांचं आमच्यासोबत बोलणं झालं आहे, असे शंभुराज देसाई म्हणाले.

शंभुराज देसाई यांनी नागपुरातील पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप होण्याची शक्यता वर्तवली आहे. यावेळी त्यांनी संजय राऊतांबद्दलही भाष्य केले. “ठाकरे गटाच्या आमदारांचं आमच्यासोबत बोलणं झालं आहे. त्यांच्या चर्चेतून तिथे खदखद असल्याचं लक्षात येत आहे. ही खदखद संजय राऊत यांच्यामुळे आहे. संजय राऊत यांच्यामुळे उद्धव ठाकरे गटाला खूप मोठा धोका आहे”, असे विधान शंभुराज देसाई यांनी केले.

आता उद्धव ठाकरे गट शिल्लकच राहिलेला नाही

“उद्धव ठाकरे गटातील अनेक आमदार संजय राऊत यांच्याबद्दल खाजगीमध्ये काही सांगतात. त्यांच्या वागण्यामुळे ही वेळ आली आहे. हा संजय राऊत यांना सावधगिरीची इशारा आहे. नाहीतरी आता उद्धव ठाकरे गट शिल्लकच राहिलेला नाही. २०१९ च्या निकालानंतर आमदारांची बैठक घेऊन बोट दाखवत तुमच्यापैकी मुख्यमंत्री करणार असं बोलते होते. पण नंतर ते बोट स्वत:कडे फिरलं आणि ते मुख्यमंत्री झाले. तेव्हा मुख्यमंत्री करायला शिवसैनिक दिसला नाही”, अशीही टीका शंभुराज देसाईंनी म्हटले.

…त्याला संजय राऊत जबाबदार

“उद्धव ठाकरे यांना महाविकासआघाडी कोणी करायला लावली. हे महाराष्ट्राला माहित आहे. उबाठाची जी अवस्था झाली, त्याला संजय राऊत जबाबदार आहेत. अजित पवार आज आले नाही. पण काही खात्यात कमी जास्त होणार आहे. ॲडजस्टमेंट करावी लागेल. मंत्रीपदाची नावं फायनल झाल्यावर कळतो की हा क्रायटेरीया होता”, असे शंभुराज देसाईंनी म्हटले.

“तुम्ही एक प्रयोग करा. २४ तासांत संजय राऊत यांनी केलेले वक्तव्य खरे ठरले का? १० पैकी एकंही वाक्य खरं ठरतं नाही. आमचं सरकार पडेल असं संजय राऊत म्हणत होते. पडलं का? आम्ही पुन्हा आलोय. संजय राऊत यांच्या वक्तव्याकडे गांभीर्यानं घेऊ नका”, असे शंभुराज देसाई म्हणाले.

स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश
स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश.
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले...
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले....
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ.
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका.
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण...
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण....
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?.
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?.
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी...
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी....
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल.
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ.