AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुन्हा मोठा भूकंप? ठाकरेंच्या आमदारांचं आमच्यासोबत बोलणं झालं, शंभुराज देसाई यांनी बॉम्बच फोडला

या शपथविधी सोहळ्यानंतर आता शिवसेना नेते शंभुराज देसाई यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. ठाकरेंच्या आमदारांचं आमच्यासोबत बोलणं झालं आहे, असे शंभुराज देसाई म्हणाले.

पुन्हा मोठा भूकंप? ठाकरेंच्या आमदारांचं आमच्यासोबत बोलणं झालं, शंभुराज देसाई यांनी बॉम्बच फोडला
| Updated on: Dec 06, 2024 | 3:17 PM
Share

Shambhuraj Desai On Uddhav thackeray : महाराष्ट्रात नुकतंच नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला. या शपथविधी सोहळ्यात देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यासह भाजपचे वरिष्ठ मंत्रीही उपस्थितीत होते. या शपथविधी सोहळ्यानंतर आता शिवसेना नेते शंभुराज देसाई यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. ठाकरेंच्या आमदारांचं आमच्यासोबत बोलणं झालं आहे, असे शंभुराज देसाई म्हणाले.

शंभुराज देसाई यांनी नागपुरातील पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप होण्याची शक्यता वर्तवली आहे. यावेळी त्यांनी संजय राऊतांबद्दलही भाष्य केले. “ठाकरे गटाच्या आमदारांचं आमच्यासोबत बोलणं झालं आहे. त्यांच्या चर्चेतून तिथे खदखद असल्याचं लक्षात येत आहे. ही खदखद संजय राऊत यांच्यामुळे आहे. संजय राऊत यांच्यामुळे उद्धव ठाकरे गटाला खूप मोठा धोका आहे”, असे विधान शंभुराज देसाई यांनी केले.

आता उद्धव ठाकरे गट शिल्लकच राहिलेला नाही

“उद्धव ठाकरे गटातील अनेक आमदार संजय राऊत यांच्याबद्दल खाजगीमध्ये काही सांगतात. त्यांच्या वागण्यामुळे ही वेळ आली आहे. हा संजय राऊत यांना सावधगिरीची इशारा आहे. नाहीतरी आता उद्धव ठाकरे गट शिल्लकच राहिलेला नाही. २०१९ च्या निकालानंतर आमदारांची बैठक घेऊन बोट दाखवत तुमच्यापैकी मुख्यमंत्री करणार असं बोलते होते. पण नंतर ते बोट स्वत:कडे फिरलं आणि ते मुख्यमंत्री झाले. तेव्हा मुख्यमंत्री करायला शिवसैनिक दिसला नाही”, अशीही टीका शंभुराज देसाईंनी म्हटले.

…त्याला संजय राऊत जबाबदार

“उद्धव ठाकरे यांना महाविकासआघाडी कोणी करायला लावली. हे महाराष्ट्राला माहित आहे. उबाठाची जी अवस्था झाली, त्याला संजय राऊत जबाबदार आहेत. अजित पवार आज आले नाही. पण काही खात्यात कमी जास्त होणार आहे. ॲडजस्टमेंट करावी लागेल. मंत्रीपदाची नावं फायनल झाल्यावर कळतो की हा क्रायटेरीया होता”, असे शंभुराज देसाईंनी म्हटले.

“तुम्ही एक प्रयोग करा. २४ तासांत संजय राऊत यांनी केलेले वक्तव्य खरे ठरले का? १० पैकी एकंही वाक्य खरं ठरतं नाही. आमचं सरकार पडेल असं संजय राऊत म्हणत होते. पडलं का? आम्ही पुन्हा आलोय. संजय राऊत यांच्या वक्तव्याकडे गांभीर्यानं घेऊ नका”, असे शंभुराज देसाई म्हणाले.

Follow Us
पालकमंत्रीपदाचा तिढा सुटला,पालकमंत्रीपदी गोगावले, महाजन यांची नियुक्ती
रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले, नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन
राहुल गांधींकडे उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता? सुप्रीम कोर्टाची थेट...
राहुल गांधींकडे उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता? सुप्रीम कोर्टाची थेट याचिकाकर्त्यांनाच नोटीस; ED, CBI...
दिमागी नक्षलवाद: सोशल मीडियावर नवीन ट्रेंड, लाखोंनी केले फॉलो
दिमागी नक्षल पार्टीचा सोशल मीडियावर धुमाकूळ: पंतप्रधानांच्या शब्दातून झालेली ऑनलाईन चळवळ
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांना दिले तातडीचे निर्देश... झारखंड विद्यार्थी
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांना दिले तातडीचे निर्देश... झारखंड विद्यार्थी आंदोलनावर अखेर राहुल गांधींनी सोडलं मौन
दिल्लीत राजकीय हालचालींना वेग! CM फडणवीस आणि पंतप्रधानांच्या भेटीत...
दिल्लीत राजकीय हालचालींना वेग! CM फडणवीस आणि पंतप्रधानांच्या भेटीत नेमकं काय घडलं? मोठी अपडेट समोर
मोठी बातमी! मनोज जरांगेंचे वडील त्यांच्या भेटीसाठी रुग्णालयात दाखल;
मोठी बातमी! मनोज जरांगेंचे वडील त्यांच्या भेटीसाठी रुग्णालयात दाखल; लेकाची प्रकृती खालावल्याचं कळताच...
नाशिकमधील जीवघेण्या खड्ड्यांमुळे ठाकरे सेनेचा महापालिकेवर भव्य मोर्चा
नाशिकमधील जीवघेण्या खड्ड्यांमुळे ठाकरे सेनेचा महापालिकेवर भव्य मोर्चा
चाळणी झालेल्या रस्त्यांवर ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन; नाशिककरांसाठी..
चाळणी झालेल्या रस्त्यांवर ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन; नाशिककरांसाठी संजय राऊत मैदानात, पहा व्हिडीओ
ज्याची भीती तेच... महाराष्ट्रातदेखील बिहार सारखं होणार, SIR बाबत
ज्याची भीती तेच... महाराष्ट्रातदेखील बिहार सारखं होणार, SIR बाबत बड्या नेत्याचा धक्कादायक दावा
मराठा आरक्षण आंदोलन: मनोज जरांगेंची ५८ लाख कुणबी प्रमाणपत्रांची मागणी
मराठा आरक्षणावर जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा: ५८ लाख कुणबी प्रमाणपत्रांची मागणी, सत्ता जाण्याची शक्यता