AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संजय राऊत हा चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट… कुणी केला हल्लाबोल?

विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडत आहेत.

संजय राऊत हा चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट... कुणी केला हल्लाबोल?
| Updated on: Nov 01, 2024 | 4:20 PM
Share

विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडत आहेत. शिवसेना शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांनी पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.  संजय राऊत यांनी मनसेबाबत केलेल्या विधानावर शंभूराज देसाई यांनी खोचक टीका केली आहे. ‘संजय राऊत हा चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट आहे, आतापर्यंत काढलेली एकही चिठ्ठी खरी ठरलेली नाही. राऊत जे पण बोलले ते आजपर्यंत कधीही खरं झालेलं नाही. राऊत हे हवेत विधान करत असतात, त्यामुळे या विधानानांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज नाही, असं देसाई यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पारदर्शक निवडणूक करायची असेल तर रश्मी शुक्ला यांना हटवा असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं होतं, याला देखील शंभूराज देसाई यांनी उत्तर दिले आहे. संजय राउतांकडे रश्मी शुक्ला यांच्या विरोधात पुरावे असतील तर ते त्यांनी निवडणूक आयोगाकडे द्यावेत. उगाचच येवढ्या मोठ्या अधिकाऱ्यावर खोटे आरोप करू नये, असं देसाई यांनी म्हटलं आहे.

शिवसेना ठाकरे गटानं काय सूत्र स्वीकारले हा त्यांचा त्यांचा विचार आहे. मात्र त्यांना त्यांच्या स्थानिक शिवसैनिकांना सोडून बाहेरच्यांना उमेदवारी द्यावी लागते. यावरूनच मूळ शिवसेना कोण आहे, निष्ठावंत कोण आहेत, हे यावरून सिद्ध होते. यामुळे शिवसेना ठाकरे गटातील लोकांनी मुख्य शिवसेनेकडे आले पाहिजे असंही त्यांनी यावेळी म्हटलं.

सर्व पक्षांमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेईपर्यंत बंडखोरी सुरू असते. अनेक जण वेगवेगळ्या कारणातून उमेदवारी अर्ज भरत असतात.  प्रत्येक पक्ष हा संबंधित बंडखोरी करणाऱ्या वक्तीबाबत अर्ज मागे घेण्यासाठी प्रयत्न करत असतो. पक्षाला कोणतेही नुकसान पोहोचू नये यासाठी सर्व स्तरातून आम्ही प्रयत्न करत असतो, असंही यावेळी देसाई यांनी म्हटलं आहे. आता देसाई यांच्या टीकेला संजय राऊत काय  प्रत्युत्तर देणार? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर.
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले.
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले.
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची..
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची...
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा.
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल.
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना....
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना.....
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या...
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या....
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना.
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ.