AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Pawar: शरद पवार पुन्हा मैदानात; राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनीच सरकारला घाम फोडणारी घोषणा, कार्यकर्त्यांना थेट संदेश

राष्ट्रवादी पक्षाच्या 27 व्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम बुधवारी मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Sharad Pawar: शरद पवार पुन्हा मैदानात; राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनीच सरकारला घाम फोडणारी घोषणा, कार्यकर्त्यांना थेट संदेश
sharad pawarImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 10, 2026 | 2:48 PM
Share

राष्ट्रवादी काँग्रेसच्या 27 व्या वर्धापन दिनाचा कार्यक्राम बुधवारी मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून सरकारवर चांगलाच हल्लाबोल केला आहे. यावेळी बोलताना त्यांनी सध्याच्या शेतकऱ्यांच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. खतासाठी शेतकऱ्यांची लाईन लागली आहे. रात्र रात्र खत मिळत नाही. खताच्या दुकानाबाहेर शेतकरी झोपले आहेत. ही अवस्था आहे. आज शेतकरी संकटात आहे. कर्जबाजारी आहे. कालच एक यादी आली. आठ दिवसांत किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्याची माहिती त्यामध्ये  आहे.  या सत्ताधाऱ्यांना घामाची किंमत कळत नाही, म्हणून हा शेतकरी आत्महत्या करताना दिसत आहे, असं यावेळी शरद पवार यांनी म्हटलं आहे.

या वर्धापन दिनाच्या निमित्ताने शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करता येणार नाही, त्यांच्यासाठी लक्ष द्यावे लागेल. समाजासाठी काम करणाऱ्यांना हा देश माझा आहे, असं वाटणारा राज्यकारभार चालला पाहिजे,  पण त्याची पूर्तता होत नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात अस्वस्थता निर्माण झाली आहे, असं यावेळी शरद पवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान येत्या आठ ते दहा दिवसांमध्ये बसू,  उपेक्षित समाजाचे प्रश्न एकत्र येऊन सोडवू. आवश्यकता असेल तर राष्ट्रवादी रस्त्यावर उतरेल, ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना योग्य दिशा दाखवू. त्यांनी आपलं म्हणणं स्वीकारलं नाही तर संघर्ष करू, अशी घोषणा यावेळी शरद पवार यांनी केली आहे.

आज जगात अनेक संकट येत आहेत. गेले काही महिने इराण आणि इतर देशांचं युद्ध सुरू आहे. भारताचं वैशिष्ट्य म्हणजे आंतरराष्ट्रीय संघर्षामध्ये ज्या देशांवर अन्याय होतो, त्या देशांना मदत करण्याचं आहे.  आता ईराणवर हल्ले होत आहेत. आतापर्यंत आपलीजी परराष्ट्र नीती होती, ती आता सांभाळली जात नाही. त्यामुळे आता थांबायचं नाही,  कामाला लागायचं,  राष्ट्रवादी स्वस्थ बसणार नाही, ही भूमिका कर्तृत्व आणि कष्टाने दाखवून द्यायची आहे, असं आवाहानही शरद पवार यांनी आपल्या पक्षातील नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना केलं आहे.

Follow Us
आज आम्हाला अटक होऊ शकते, पण.... अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले?
Abhijeet Dipke | आज आम्हाला अटक होऊ शकते, पण.... अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले?
आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच रद्द?
Delhi Police News | विद्यार्थी आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच केल्या रद्द, नवा आदेश काय?
हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप
Varsha Gaikwad | मुंबई पोलिसाकडून महिला आंदोलकाशी गैरवर्तन? हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप
साताऱ्यात भीषण अपघात! भरधाव कार नाल्यात उलटली; तिघांचा जागीच मृत्यू
Phaltan Car Accident | साताऱ्यात भीषण अपघात! भरधाव कार नाल्यात उलटली; तिघांचा जागीच मृत्यू
विद्यार्थ्यांचं स्वप्न तुटलं तर देशाचं भविष्य तुटतं! वरुण धवनची पोस्ट
Varun Dhavan On Students Protest | विद्यार्थ्यांचं स्वप्न तुटलं तर देशाचं भविष्य तुटतं! अभिनेता वरुण धवनची पोस्ट व्हायरल
26 दिवसांचं उपोषण संपलं! वांगचूक यांनी सरकारसमोर ठेवल्या या मोठ्या अटी
26 दिवसांचं उपोषण संपलं! सोनम वांगचूक यांनी सरकारसमोर ठेवल्या या मोठ्या अटी
ते आंदोलन आता थांबणार नाही, संजय राऊतांचा सरकारला थेट इशारा
Sanjay Raut | सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडलं पण... ते आंदोलन आता थांबणार नाही, संजय राऊतांचा सरकारला थेट इशारा
पेपरफुटीसाठी फास्ट ट्रक कोर्ट, कठोर शिक्षेच्या कायद्याच्या मसुद्यावर..
PM Modi On NEET | पेपरफुटीसाठी फास्ट ट्रक कोर्ट आणि कठोर शिक्षेच्या कायद्याच्या मसुद्यावर आजच चर्चा होणार
NCP च्या विलिनीकरणाला ब्रेक? नेतृत्त्वाच्या वादामुळे चर्चाच रखडली
NCP Marger News | राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला ब्रेक? नेतृत्त्वाच्या वादामुळे चर्चाच रखडली!
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा टाकताच...