AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Pawar: शरद पवार पुन्हा मैदानात; राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनीच सरकारला घाम फोडणारी घोषणा, कार्यकर्त्यांना थेट संदेश

राष्ट्रवादी पक्षाच्या 27 व्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम बुधवारी मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Sharad Pawar: शरद पवार पुन्हा मैदानात; राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनीच सरकारला घाम फोडणारी घोषणा, कार्यकर्त्यांना थेट संदेश
sharad pawarImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 10, 2026 | 2:48 PM
Share

राष्ट्रवादी काँग्रेसच्या 27 व्या वर्धापन दिनाचा कार्यक्राम बुधवारी मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून सरकारवर चांगलाच हल्लाबोल केला आहे. यावेळी बोलताना त्यांनी सध्याच्या शेतकऱ्यांच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. खतासाठी शेतकऱ्यांची लाईन लागली आहे. रात्र रात्र खत मिळत नाही. खताच्या दुकानाबाहेर शेतकरी झोपले आहेत. ही अवस्था आहे. आज शेतकरी संकटात आहे. कर्जबाजारी आहे. कालच एक यादी आली. आठ दिवसांत किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्याची माहिती त्यामध्ये  आहे.  या सत्ताधाऱ्यांना घामाची किंमत कळत नाही, म्हणून हा शेतकरी आत्महत्या करताना दिसत आहे, असं यावेळी शरद पवार यांनी म्हटलं आहे.

या वर्धापन दिनाच्या निमित्ताने शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करता येणार नाही, त्यांच्यासाठी लक्ष द्यावे लागेल. समाजासाठी काम करणाऱ्यांना हा देश माझा आहे, असं वाटणारा राज्यकारभार चालला पाहिजे,  पण त्याची पूर्तता होत नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात अस्वस्थता निर्माण झाली आहे, असं यावेळी शरद पवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान येत्या आठ ते दहा दिवसांमध्ये बसू,  उपेक्षित समाजाचे प्रश्न एकत्र येऊन सोडवू. आवश्यकता असेल तर राष्ट्रवादी रस्त्यावर उतरेल, ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना योग्य दिशा दाखवू. त्यांनी आपलं म्हणणं स्वीकारलं नाही तर संघर्ष करू, अशी घोषणा यावेळी शरद पवार यांनी केली आहे.

आज जगात अनेक संकट येत आहेत. गेले काही महिने इराण आणि इतर देशांचं युद्ध सुरू आहे. भारताचं वैशिष्ट्य म्हणजे आंतरराष्ट्रीय संघर्षामध्ये ज्या देशांवर अन्याय होतो, त्या देशांना मदत करण्याचं आहे.  आता ईराणवर हल्ले होत आहेत. आतापर्यंत आपलीजी परराष्ट्र नीती होती, ती आता सांभाळली जात नाही. त्यामुळे आता थांबायचं नाही,  कामाला लागायचं,  राष्ट्रवादी स्वस्थ बसणार नाही, ही भूमिका कर्तृत्व आणि कष्टाने दाखवून द्यायची आहे, असं आवाहानही शरद पवार यांनी आपल्या पक्षातील नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना केलं आहे.

Follow Us
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे आवाहन; ग्लोबल साऊथला नियम घडवणारे...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे आवाहन; ग्लोबल साऊथला नियम घडवणारे बनवण्यावर भर
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
गणेशोत्सवासाठी कोकण जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन रवाना
पोलिसांनी अडवलंच तर... मुंबईत होणाऱ्या निर्णायक मराठा आंदोलनाबाबत...
पोलिसांनी अडवलंच तर...  मुंबईत होणाऱ्या मराठा आंदोलनाबाबत मनोज जरांगेंचा मोठा इशारा