AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेना माझीच आहे आणि माझ्याकडेच राहणार – उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे यांनी आज सभेत बोलताना पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्यावर टीका केली. सोबतच त्यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नेत्यांवर ही टीका केली. उद्धव ठाकरे म्हणाले की, अशा प्रकारे पक्ष फोडून लोकं जाऊ लागले तर लोकांचा लोकशाहीवर विश्वास राहणार नाही.

शिवसेना माझीच आहे आणि माझ्याकडेच राहणार - उद्धव ठाकरे
shailesh musale
shailesh musale | Updated on: Nov 05, 2024 | 8:50 PM
Share

उद्धव ठाकरे यांची आज कोकणात सभा झाली. या सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात मी छत्रपतींचं मंदिर बांधल्याशिवाय राहणार नाही. सुरतमध्येही मी मंदिर बांधल्याशिवाय राहणार नाही. घर फोडणारी औलाद तुमची. शरद पवारांचे घर फोडले. अडीच वर्षात मी काय गुन्हा केला होता. कोरोनाचा बंदोबस्त करण्यात महाराष्ट्र नंबर एकचं राज्य होतं. हे तेव्हा कुठे होते संपूर्ण देशात हाहाकार माजला होता. आपण १० रुपयात थाळी सुरु केली होती. परत सत्तेत आल्यावर ती सुरु करणार आहे. महिलांसाठी १५०० रुपये देतात. पण त्यात घर चालतं का. महागाई किती वाढली आहे.

‘महाराष्ट्रात जन्मलेल्या मुलांना मोफत शिक्षण देणार. बदलापूरमध्ये जी घटना घ़डली जे तीन भाऊ आहेत त्यांनी त्या चिमुकलीच्या आईला १५०० रुपये देऊन दाखवा. त्या माऊलीला पोलीस स्टेशनमध्ये बसून ठेवलं तुम्ही. महिलांसाठी स्वतंत्र पोलीस स्टेशन आम्ही सुरु करु. सत्ता कशी आणायची, आमदार कसे फोडायचे हेच सुरु आहे. गद्दारांनी सरकार पाडलं नसतं तर अनेक उद्योग महाराष्ट्रात सुरु झाले असते. नाणार रिफायनरी आणि बारसु रिफायनरीमी हद्दपार करुन दाखवेल. जनतेच्या माथ्यावर प्रकल्प लादताय. महाराष्ट्राचं नाव कोणाचं राहणार आहे. मोदी आणि शाहांचं नाव असणार आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती कमी करणार.’ असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले.

ठाकरे म्हणाले की, ‘मोदी शाहांच्या दारात आम्ही उभं राहायचं का. ज्यांनी भाजप रुजवला त्यांची आता गरज यांना नाहीये. भाजपचे अध्यक्ष म्हणतात की संघाची आता आम्हाला गरज नाही. विदर्भात कापसावर एक रोग येतो. तो खोडाला लागतो. तसा हा दाढीवाला किडा भाजपला लागला आहे. जो भाजपला पोखरतोय.’

‘महाराष्ट्राला दिशा देण्याची वेळ आली आहे. एक बातमी वाचली की ८ तारखेला सुनावणी लावली आहे. न्यायदेवतेला दिसते की नाही हे आठ तारखेला कळेल. मी न्यायाधीशांना हात जोडून सांगतोय आम्ही अडीच वर्षापासून न्याय मागतो आहे. असा पक्ष फोडून लोकं जायला लागले तर लोकशाहीवर जनतेचा विश्वास राहणार नाही. शिवसेना माझीच आहे आणि माझ्याकडेच राहणार आहे. महाराष्ट्रावर मावळ्यांचं राज्य येणार की गुंडाचं राज्य येणार हे ठरवणारी ही निवडणूक आहे.’

Follow Us
काँग्रेसमध्ये मोठं बंड? सपकाळ यांच्या हटवणीसाठी दिल्लीत मोर्चेबांधणी
Harshwardhan Sapkal | काँग्रेसमध्ये मोठं बंड? हर्षवर्धन सपकाळ यांच्या हटवणीसाठी थेट दिल्लीत मोर्चेबांधणी
पवनराजे निंबाळकर केसच्या सुनावणीत असं काय घडलं? ओमराजे...
पवनराजे निंबाळकर केसच्या सुनावणीत असं काय घडलं? ओमराजे निंबाळकर स्पष्टच बोलले...
शरद पवारांना मोठा धक्का? राष्ट्रवादीचे 6 नगरसेवक नॉट रिचेबल
Nagpur | शरद पवारांना मोठा धक्का? राष्ट्रवादीचे 6 नगरसेवक नॉट रिचेबल; भाजपच्या गळाला लागल्याची चर्चा!
अशा लोकांमुळे पंढरपूर अशुद्ध झाले... रोहित पवारांच्या आंदोलनानंतर भाजप
अशा लोकांमुळे पंढरपूर अशुद्ध झाले... रोहित पवारांच्या आंदोलनानंतर भाजप नेत्याची जोरदार टीका
रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी गोमूत्र शिंपडलं; सक्षणा सलगर आक्रमक
Sakshana Salgar | रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी गोमूत्र शिंपडलं; सक्षणा सलगर आक्रमक, पंढरपुरात पेटला नवा राजकीय वाद!
मोठी बातमी! राष्ट्रवादीतील रिक्त पदांवर नवीन नियुकत्या; चाकणकरांच्या
मोठी बातमी! राष्ट्रवादीतील रिक्त पदांवर नवीन नियुकत्या; रुपाली चाकणकरांच्या जागी या नावाची चर्चा, राजकारणात मोठं घडणार?
राऊतांचा मोठा दावा; शिवसेनेचे सर्व 9 खासदार ठाकरेंसोबतच!
Sanjay Raut UNCUT | ऑपरेशन टायगरच्या चर्चांदरम्यान राऊतांचा मोठा दावा; शिवसेनेचे सर्व 9 खासदार ठाकरेंसोबतच!
ठाकरेंच्या कार्यक्रमाकडे नजर, शिंदेंची तयारी जोरात; 19 जूनला नेमकं काय
Uddhav Thackeray | Eknath Shinde | ठाकरेंच्या कार्यक्रमाकडे नजर, शिंदेंची तयारी जोरात; 19 जूनला नेमकं काय घडणार?
तर मी पंतप्रधानांना भेटेन, राष्ट्रहितासाठी... संजय राऊतांचं हे विधान
Sanjay Raut | 'तर मी पंतप्रधानांना भेटेन, राष्ट्रहितासाठी... संजय राऊतांचं हे विधान इतकं चर्चात का? राजकारणात मोठी खळबळ
मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा! तलावात फक्त 10% पाणी शिल्लक?
Mumbai Water Shortage | मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा! तलावात फक्त 10% पाणी शिल्लक पुढच्या आठवड्यापासून मोठी पाणीकपात?