AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: माझ्यानंतर उद्धवला साथ द्या!, रामदास कदमांच्या निरोपाच्या भाषणाची चर्चा, कोकणाबद्दल कंठही दाटला

रामदास कदम यांचं गेल्या काही काळापासून शिवसेनेसोबतच सुरु असलेलं भांडण. त्याचाही उल्लेख त्यांनी भाषणात केला. कोकणासाठी काय करु शकले नाहीत, तेही रामदास कदमांनी यावेळी आवर्जून सांगितलं.

Video: माझ्यानंतर उद्धवला साथ द्या!, रामदास कदमांच्या निरोपाच्या भाषणाची चर्चा, कोकणाबद्दल कंठही दाटला
शिवसेना आमदार रामदास कदम विधान परिषदेतून निवृत्त झाले
| Edited By: | Updated on: Dec 28, 2021 | 7:22 AM
Share

विधानसभेचं हिवाळी अधिवेशन काम कमी आणि गदारोळानं जास्त गाजतंय. कालचा दिवस तर नितेश राणे, सुहास कांदे, भास्कर जाधव, फडणवीस यांच्या आरोप प्रत्यारोपांनी गाजलं. पण त्याच वेळेस विधान परिषदेतून दोन मोठे नेते निवृत्त झाले. ते होते काँग्रेसचे भाई जगताप आणि शिवसेनेचे रामदास कदम. (Ramdas Kadam) विशेष म्हणजे दोघांनाही भाई म्हटलं जातं. रामदास कदमांनी निरोपाचं भाषण मात्र आटोपशीर केलं. अवघ्या सात मिनिटात त्यांचं भाषण संपलं पण हेच सात मिनिटांचं भाषण चर्चेत राहिलं. त्याला कारण आहे ते रामदास कदम यांचं गेल्या काही काळापासून शिवसेनेसोबतच सुरु असलेलं भांडण. त्याचाही उल्लेख त्यांनी भाषणात केला. कोकणासाठी काय करु शकले नाहीत, तेही रामदास कदमांनी यावेळी आवर्जून सांगितलं. नेमकं काय म्हणाले रामदास कदम? रामदास कदम यांनी अडीच वर्षापूर्वीच राजकारणातून रिटायरमेंट जाहीर केलीय. पण तरीही विधान परिषदेसाठी (Ramdas Kadam Vidhanparishad) ते उत्सूक असल्याची चर्चा कायम रंगली. त्यातच शिवसेनेचे नेते अनिल परब यांच्यासोबत त्यांचा झगडा सुरु झाला. तो शेवटी एकमेकांचे जाहीर वाभाडे काढण्यापर्यंत पोहोचला. रामदास कदम ज्यावेळेस निरोपाचं भाषण करायला उभे राहीले त्यावेळेही त्यावर त्या वादाची छाया स्पष्ट जाणवत होती. पण कदमांनी यावेळी वादावर न बोलता, माझ्यानंतर उद्धवला साथ द्या, बाळासाहेबांच्या ह्या वक्तव्यावर भर दिला. एवढच नाही तर कदम म्हणाले की, बाळासाहेबांच्या आत्म्याला वेदना होतील अशी एकही गोष्ट माझ्या हातून घडणार नाही. ते म्हणाले- पक्षामुळे व्यक्ती मोठी होते, व्यक्तीमुळे पक्ष नाही, मराठा माणसाच्या न्याय हक्कासाठी झगडणारी शिवसेना ह्या घोषवाक्यासह माननीय बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेला जन्म दिला. त्या घोषवाक्याकडे आकर्षीत होऊन मी 1970 साली शिवसेनेत काम करायला सुरुवात केली. त्याला आता 52 वर्षे होतायत. एक शिवसैनिक, गटप्रमुख, उपशाखाप्रमुख, शाखाप्रमुख, आमदार, नामदार, मी स्वत:ला भाग्यवान समजतो सभापती महोदय, अनेक वर्षे 40-45 वर्ष मला शिवसेनाप्रमुखांच्या सानिध्यात काम करण्याची संधी मिळाली.

शल्य काय? रामदास कदमांनी स्वत:च्या मनातलं शल्यही बोलून दाखवलं, ते म्हणाले-हे मी मुद्दाम सांगतोय, माझ्या कोकणात जी सिंचनची व्यवस्था आहे ती फक्त दीड टक्का आहे. मी अनेक वेळा प्रयत्न केले. अगदी मंत्री असताना कॅबिनेटमध्ये हा विषय मी लावून धरला. मला सभापती महोदय, त्यात यश मिळालं नाही. सगळ्यात जास्त पाऊस कोकणामध्ये आणि सर्वात अन्याय कोकणावर. पश्चिम महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण दीड टक्का आहे आणि सिंचनाचं प्रमाण मात्र 55 टक्के आहे. याचं दु:खं, शल्य माझ्या मनामध्ये आहे.

परबांसोबतच्या वादावर काय म्हणाले? गेल्या काही काळापासून मंत्री अनिल परब आणि रामदास कदम यांच्यात धूमश्चक्री सुरु आहे. त्यात शिवसेनेचे मोठं नुकसान होताना दिसतंय. गेल्या आठवड्यात तर रामदास कदमांनी सरकारच्याविरोधात कोर्टात जाण्याचं सभागृहात जाहीर केलं. पण आजच्या निरोपाच्या वेळी मात्र त्यांनी हा वाद सावरण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले-मला पक्षानं पुष्कळ दिलं. मी अधिक बोलणार नाही आज. कधी कधी कुटुंबामध्ये भांड्याला भांडं लागतं. त्याचा विपर्यास करण्याची काही कारणं नाहीत. होतात मतभेद थोडेसे होतात, पण ते तात्पुरते असतात. माझा स्वभाव तसाच आहे, थोडासा भडक, कधी कधी चिडतो. पण प्रवीण दरेकरांनी सांगितल्याप्रमाणे तितका मवाळ देखील आहे. तितक्या जवळ आल्यानंतर माणुस कळतो.

हे सुद्धा वाचा:

Aurangabad Zoo: मिटमिट्यातील झुलॉजिकल पार्कला केंद्र सरकारची अंतिम मंजुरी, सफारी पार्क उबारण्यातील मार्ग मोकळा

आरोग्य विमा काढताना काय काळजी घ्यावी?, जाणून घ्या या महत्त्वपूर्ण बाबी

Suicide note | सुसाईड नोट बायकोला पाठविली, हिंगणघाटवरून आत्महत्या करण्यासाठी नागपुरात आला; पोलिसांची एंट्री झाल्यावर वेगळंच घडलं!

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.