AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकट्याला रस्त्यात गाठलं अन् जीव जाईपर्यंत चोपलं, तरूणाच्या हत्येने महाराष्ट्र हादरला

Jalgaon Crime : जळगावातील एका धक्कादायक घटनेने महाराष्ट्र हादरला आहे. जळगावात सात ते आठ जणांनी केलेल्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

एकट्याला रस्त्यात गाठलं अन् जीव जाईपर्यंत चोपलं, तरूणाच्या हत्येने महाराष्ट्र हादरला
Jalgaon CrimeImage Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Dec 03, 2025 | 5:50 PM
Share

गेल्या काही काळापासून राज्यातील गुन्हेगारीच्या घटना वाढल्या आहेत. अशातच आता जळगावातील एका धक्कादायक घटनेने महाराष्ट्र हादरला आहे. जळगावात सात ते आठ जणांनी केलेल्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तुषार चंद्रकांत तायडे असे 19 वर्षीय मयत तरुणाचे नाव आहे, तो जळगावातील समता नगर परिसरातील रहिवासी आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

तरूणाला एकट्याला गाठत मारहाण

समोर आलेल्या माहितीनुसार तुषार चंद्रकांत तायडे हा तरूण त्याच्या आजीवर अंत्यसंस्कार करून यावल तालुक्यातून दुचाकीने परत येत होते. याच दरम्यान रस्त्यात सात ते आठ जण चारचाकीतून आले आणि त्याला घेऊन गेले. त्यानंतर यावल बोरावल रोडवर त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत तुषार तायडे गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याला जखमी अवस्थेत जळगावच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. मात्र गंभीर दुखापत झाल्यामुळे तुषारचा पहाटे 1 वाजता मृत्यू झाला. या घटनेमुळे समता नगर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

8 जणांविरोधात गुन्हा दाखल

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या वादातून ही मारहाण करण्यात आल्याचे समोर आले आहे. या तरुणाने आरोपीविरुद्ध महिनाभरापूर्वी instagram वर एक व्हिडिओ केला होता, या कारणावरून त्याला बेदम मारहाण झाली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात मारहाण करणारे राहुल सोनवणे, विक्रम सोनवणे यांच्यासह सहा जणांविरोधात खुनाचा गुन्हा करण्यात आला आहे. या घटनेतील आरोपी सध्या फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीसांची पथके रवाना झाली असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपींना अटक झाल्यानंतर या हत्येमागील खरे कारण समोर येणार आहे.

नातेवाईकांचे आंदोलन

तुषार चंद्रकांत तायडे याच्या मृत्यूनंतर आक्रमक झालेल्या नातेवाईकांनी रस्ता आंदोलन केले. जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पावित्रा नातेवाईकांनी घेतला होता. आरोपींना आमच्या ताब्यात द्या अशी मागणीही नातेवाईकांकडून करण्यात आली होती. मात्र पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिल्यावर पाऊण तासानंतर आंदोलन मागे घेत नातेवाईकांनी तरुणाच्या मृतदेह ताब्यात घेतला असल्याची माहिती समोर आली आहे.

Follow Us
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...