AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पहाटेच घराबाहेर पडले… अन् घात झाला; कॉलेजच्या तीन मित्रांचा मृत्यू ; घात की अपघात ? संशय का बळावला ?

सोलापूरमध्ये पहाटेच्या अपघातात तीन कॉलेज विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत त्यांची प्राणज्योत मालवली. मृतांपैकी एक तरुण गोसेवक असल्याने हा अपघात नसून घातपात असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे शहरात शोककळा पसरली असून कुटुंबीयांकडून सखोल चौकशीची मागणी होत आहे.

पहाटेच घराबाहेर पडले... अन् घात झाला; कॉलेजच्या तीन मित्रांचा मृत्यू ; घात की अपघात ? संशय का बळावला ?
तीन मित्रांचा अंत
| Updated on: Feb 16, 2026 | 2:35 PM
Share

सोलापूरमध्ये आज एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. कॉलेजातील तीन तरुणांचा अपघातात मृत्यू झाला आहे. हे तिन्ही मित्र पहाटे घराबाहेर पडले होते. ते परत आलेच नाही. अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला. यातील एकजण गोसेवक असल्याने हा अपघात आहे की घातपात? असा संशय बळावला आहे. पोलिसांनी अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून अधिक तपास सुरू आहे. तर या अपघातामुळे तिन्ही कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून या प्रकरणाची कसून चौकशी करण्याची मागणी होत आहे.

सोलापूर शहरातील रुपाभवानी माता मंदिराच्या परिसरात ही घटना घडली आहे. या तीन तरुणांना अज्ञात वाहनाने धडक दिली. पहाटे 4 च्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे. अज्ञात वाहनाने धडक दिल्यानंतर जोराचा आवाज आला. त्यामुळे गावकरी तात्काळ घटनास्थळी धावले. जखमी अवस्थेतील या तिघांना गावकऱ्यांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केले. पण रुग्णालयात जाईपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. तर अंधाराची वेळ असल्याने अज्ञात वाहन चालक फरार झाला आहे. त्यामुळे आरोपीला शोधण्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.

तर्कवितर्क काय ?

नागेश गवंडी, रोहन पोरे, बसवराज चनशेट्टी अशी मृत तरुणांची नावे आहेत. तिघेही एकाच गावचे असून एकाच कॉलेजात शिकत होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे या तिघांपैकी एक तरुण गोसेवक असल्याने हा अपघात की घातपात याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा केला आहे. पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

पहाटे का बाहेर पडले ?

हे तिन्ही तरुण पहाटेच घराबाहेर पडले होते. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. तिघांनाही पहाटे बाहेर जाण्याची गरज काय होती? त्यांना कुणी बोलावलं होतं का? असे प्रश्न स्थानिकांना पडले असून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी होत आहे.

Follow Us
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका;
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका; म्हणाले हिंदुत्त्व...
ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! अहिरांनी ठणकावू सांगितलं
Sachin Ahir | ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! सचिन अहिर यांनी ठणकावू सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
Sachin Ahir Exclusive| 6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या
Nalasopara Rain Updates | मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या लोकल
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना नेमका काय इशारा?
राम मंदीर कथित गैरव्यवहारवर सुधीर मुनगंटीवार यांची मोठी प्रतिक्रिया...
Sudhir Mungantiwar | राम मंदीर कथित गैरव्यवहारवर सुधीर मुनगंटीवार यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले, योगी आदित्यनाथ...
56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! तब्बल एवढ्या हजार कोटींची कर्जमाफी
Sudhir Mungantiwar | 56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! तब्बल एवढ्या हजार कोटींची कर्जमाफी; एकही शेतकरी वंचित राहणार नाही - सुधीर मुनगंटीवार
समुद्र खवळला! तब्बल 4.33 मीटर उंच लाटा... व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
समुद्र खवळला! तब्बल 4.33 मीटर उंच लाटा... व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
कल्याणमध्ये पावसाचा कहर!; घरात शिरलं पाणी, गुडघाभर पाण्यातून...
Kalyan News | कल्याणमध्ये पावसाचा कहर!; घरात शिरलं पाणी, गुडघाभर पाण्यातून नागरिकांची जीवघेणी कसरत
यांच्या डोक्यात एकच कीडा, त्यांना... संजय शिरसाटांच्या त्या विधानाने
यांच्या डोक्यात एकच कीडा, त्यांना... संजय शिरसाटांच्या त्या विधानाने खळबळ, नेमका रोख कोणाकडे?