AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महसूल मंत्र्याने धरले काँग्रेस नेत्याचे पाय; ते चित्र बघून लोकं झाली अचंबित…

आताही ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत ते एका वेगळ्याच कारणामुळे. कारण भाजपची सत्ता राज्यात आल्यानंतर काही महिन्यांनी राधाकृष्ण विखे पाटील भाजपमध्ये गेले होते.

महसूल मंत्र्याने धरले काँग्रेस नेत्याचे पाय; ते चित्र बघून लोकं झाली अचंबित...
| Edited By: | Updated on: Apr 24, 2023 | 10:39 PM
Share

सोलापूर : राज्यासह देशात भाजपची सत्ता आल्यानंतर अनेक नेत्यांनी आपापल्य पक्षांना सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये अनेक जण सामील झाले. त्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेतील अनेक नेत्यांनीही भाजपचे कमळ हाती घेऊन आमदार, खासदार तर काही जण मंत्रीही झाले आहे. त्यापैकीच एक म्हणजे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे एक आहेत. राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपला दीर्घकाळ काँग्रेसमध्ये घालवला आहे. काँग्रेसच्या काळात त्यांनी मंत्री पदही देण्यात आले होते. मात्र राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून त्यांच्याकडून अनेकदा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसर जोरदार हल्लाबोल केला जातो.

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील भाजपमध्ये जाण्याआधी ते काँग्रेसचे कट्टर नेते समजले जात होते. मात्र त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर मात्र त्यांच्याकडून अनेकदा काँग्रेसवर जोरदार टीका करण्यात आली आहे.

राहुल गांधी यांच्यापासून ते अगदी बाळासाहेब थोरात यांच्यावरही त्यांनी टीका टिप्पणी केली होती. त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील हे कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत राहणारे नेते असल्याचेही बोलले जाते.

आताही ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत ते एका वेगळ्याच कारणामुळे. कारण भाजपची सत्ता राज्यात आल्यानंतर काही महिन्यांनी राधाकृष्ण विखे पाटील भाजपमध्ये गेले होते.

त्यानंतर त्यांच्याकडून आणि त्यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांच्याकडून सातत्याने काँग्रेसवर टीका केली जाते. तर आज मात्र एका वेगळ्याच प्रसंगाला राधाकृष्ण विखे पाटील यांना तोंड द्यावे लागले आहे.

सोलापुरात कमलाबाई पटेल नर्सिंग इन्स्टिट्यूटच्या उद्घाटनप्रसंगी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यावेळी हे दोन्हीही नेते समोरासमोर येताच राधाकृष्ण विखे पाटल यांनी काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांचे पाय धरले.

सोलापूरचे पालकमंत्री आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे चरणस्पर्श करत आशिर्वाद घेतले.

या प्रसंगानंतर मात्र या नेत्यांच्या भेटीच्या जोरदार चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगल्या होत्या. सोलापूर शहराजवळ असलेल्या कुंभारी येथील नर्सिंग इन्स्टीट्यूटचं उद्घाटन सोमवारी पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

त्यावेळी हे दोन्ही नेते समोरासमोर आले होते. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे कार्यक्रम ठिकाणी पोहोचताच सुशीलकुमार शिंदे यांनी महसूलमंत्री विखे पाटील यांचे स्वागत केले. यावेळी आदराने विखे पाटील यांनी सुशीलकुमार शिंदे यांचे चरणस्पर्श केले आणि आशिर्वाद घेतले. हे चित्र पाहून उपस्थित मान्यवर अचंबित झाले.

Follow Us
पुणे पुन्हा हादरलं! त्या बॅनरवरून वाद; दोन गटांमध्ये गोळीबार
पुणे पुन्हा हादरलं! त्या बॅनरवरून वाद; दोन गटांमध्ये गोळीबार.
हाताच्या फोडाप्रमाणे जपलेलं पीक मातीमोल, शेतकऱ्यांना लाखोंचा फटका
हाताच्या फोडाप्रमाणे जपलेलं पीक मातीमोल, शेतकऱ्यांना लाखोंचा फटका.
सांगलीत अवकाळीचा हाहाकार, काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान
सांगलीत अवकाळीचा हाहाकार, काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान.
अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; भरपाईची मागणी
अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; भरपाईची मागणी.
भोंदूबाबा प्रकरणात रुपाली चाकणकर गोत्यात; तटकरे यांची प्रतिक्रिया काय?
भोंदूबाबा प्रकरणात रुपाली चाकणकर गोत्यात; तटकरे यांची प्रतिक्रिया काय?.
तर मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटलांचीही चौकशी करा, अंधारे कडाडल्या
तर मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटलांचीही चौकशी करा, अंधारे कडाडल्या.
एकनाथ शिंदे यांचे सीडीआर तपासण्याची हिंमत गृहखातं दाखवेल का?
एकनाथ शिंदे यांचे सीडीआर तपासण्याची हिंमत गृहखातं दाखवेल का?.
तर माझे यजमानच...चाकणकर यांच्या त्या विधानाचा दाखला देत अंधारे बरसल्या
तर माझे यजमानच...चाकणकर यांच्या त्या विधानाचा दाखला देत अंधारे बरसल्या.
राज्यातील 9 मंत्री लिंगपिसाट बाबाचे अनुयायी, ही तर खरात फाईल
राज्यातील 9 मंत्री लिंगपिसाट बाबाचे अनुयायी, ही तर खरात फाईल.
उद्योग ठप्प, कामगारांचे मुंबईतून मोठ्या प्रमाणावर स्थलांतर
उद्योग ठप्प, कामगारांचे मुंबईतून मोठ्या प्रमाणावर स्थलांतर.