AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Solapur Dhananjay Munde : ‘शेतकऱ्यांमध्ये विश्वगुरुलाही वाकवण्याची ताकद’, सोलापुरात धनंजय मुंडेंची मोदींसह राणा आणि राज ठाकरेंवर टीका

एकदा शेतकरी पेटून उठला, तर भल्याभल्यांना वाकवू शकतो, हे दाखवून दिले. स्वत:ला विश्वगुरू समजतात, त्या विश्वगुरूला वाकवायची ताकद शेतकऱ्यांमध्ये आहे. त्या शेतकऱ्याचा पुत्र असल्याचा अभिमान वाटत असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले.

Solapur Dhananjay Munde : 'शेतकऱ्यांमध्ये विश्वगुरुलाही वाकवण्याची ताकद', सोलापुरात धनंजय मुंडेंची मोदींसह राणा आणि राज ठाकरेंवर टीका
धनंजय मुंडेImage Credit source: tv9
| Updated on: Apr 30, 2022 | 3:34 PM
Share

सोलापूर : हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) मातोश्रीसमोर नाही, मारोतीच्या मंदिरात वाचायची असते. नाहीतर संकटमोचक तुमच्या मागे लागेल, मेळच बसायचा नाही, असे म्हणत राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी नवनीत राणा आणि राज ठाकरेंवर टीका केली. हनुमान चालिसाचे राजकारण करू नका, असेही मुंडे यावेळी म्हणाले. सोलापुरात शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी त्यांनी ही टीका केली. जे कोणी आम्हाला आव्हान देत आहे, त्यांनी आमच्यासमोर हनुमान चालिसा म्हणून दाखवावी, असे आव्हानही दिले. भोंगे आणि हनुमान चालिसावरून राज ठाकरे, नवनीत राणांवर टीका करताना त्यांनी आम्हाला धर्म शिकवू नका, असेही म्हटले. शेतकरी (Farmers) मेळाव्याच्या निमित्ताने त्यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना हात घालत आणि विश्वगुरू म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीका केली.

‘शेतकऱ्यांना चिरडले’

शेतकऱ्याच्या विरोधात केंद्राने कायदे केले. या कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन केले. कायदा परत घेईपर्यंत शेतकरी ठाम राहिला. शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी त्यांच्या अंगावर गाड्या घालून चिरडून टाकण्यात आले. मात्र तरीही शेतकरी मागे हटला नाही, शेवटी शेतकऱ्यांनी थकवले आणि कायदे मागे घेण्यास भाग पाडले. त्यामुळे एकदा शेतकरी पेटून उठला, तर भल्याभल्यांना वाकवू शकतो, हे दाखवून दिले. स्वत:ला विश्वगुरू समजतात, त्या विश्वगुरूला वाकवायची ताकद शेतकऱ्यांमध्ये आहे. त्या शेतकऱ्याचा पुत्र असल्याचा अभिमान वाटत असल्याचे मुंडे म्हणाले.

विचारांत आणि रक्तात छत्रपती

ज्यांच्या विचारात आणि रक्तात छत्रपती आहेत, त्यांना कुणी सांगायची गरज नाही. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बोलण्याची गरज नाही, असे म्हणत मुंडेंनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली. कर्जमाफी देण्याची पहिली घोषणा छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. तर शरद पवारांनी दुसऱ्यांदा 2008 साली कृषी मंत्री असताना करून दिली, याची आठवण मुंडेंनी करून दिली.

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.