AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vitthal Mandir : दर्शनाला आले “राव” भाविकांची धावाधाव, विभागीय आयुक्तांमुळे किलोमीटरच्या रांगा, तर मंदिरातील लेपन प्रक्रियाही पूर्ण

आज द्वादशी आणि रविवार असल्याने पंढरपूरमध्ये दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. दोन किलोमीटर दर्शन रांग गेली आहे. सध्या 4 ते 5 तास वेळ दर्शनासाठी लागत आहे. अशातच रांग बंद करून व्हीआयपी दर्शन देण्याचा हट्ट मंदिर प्रशासनानं धरला.  त्यामुळे आता भाविकांमध्ये नाराजी पसरली आहे. 

Vitthal Mandir : दर्शनाला आले राव भाविकांची धावाधाव, विभागीय आयुक्तांमुळे किलोमीटरच्या रांगा, तर मंदिरातील लेपन प्रक्रियाही पूर्ण
दर्शनाला आले "राव" भाविकांची धावाधाव, विभागीय आयुक्तांमुळे किलोमीटरच्या रांगा, तर मंदिरातील लेपन प्रक्रियाही पूर्णImage Credit source: tv9
| Updated on: Jun 12, 2022 | 4:22 PM
Share

पंढरपूर : पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात (Pandharpur Vitthal mandir) रोज दर्शनाला हजारो भाविक येत असतात. त्यात आता आषाढी वारी जवळ आली असल्याने दिवसेंदिवस मंदिरात (Vitthal Mandir) भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. मात्र आज मंदिरात भक्तांना तासंतास रांगेत ताटकळत उभं राहवं लागलंय. आणि त्याला कारण ठरलंय, विभागीय आयुक्त सौरभ राव यांची पंढरपूर वारी. विभागीय आयुक्त सौरभ राव (Sourabh Rao)दर्शनासाठी पंढरपूरला पोहोचले. मात्र पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या व्हीआयपी दर्शनासाठी वारकऱ्यांची दर्शन रांग थांबवली, त्यामुळे भाविकांची मोठी गैरसोय झाल्याचे दिसून आले. आज द्वादशी आणि रविवार असल्याने पंढरपूरमध्ये दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. दोन किलोमीटर दर्शन रांग गेली आहे. सध्या 4 ते 5 तास वेळ दर्शनासाठी लागत आहे. अशातच रांग बंद करून व्हीआयपी दर्शन देण्याचा हट्ट मंदिर प्रशासनानं धरला.  त्यामुळे आता भाविकांमध्ये नाराजी पसरली आहे.

भाविकांची गर्दी वाढली

पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी जगभरातून भाविक हे पंढरपुरात दाखल होतात. नियमित दिवशीही पंढरपुरात दर्शनासाठी वेळ लागतो. मात्र अशा व्हीआयपी दर्शनामुळे भक्तांना आणखी काही तास रांगेत उभं राहवं लागलं आहे. अशी वेळ ही पहिल्यांदाच आली नाही. याआधीही अशा व्हीआयपी दर्शनामुळे भाविकांची गैरसोय झाली आहे. त्यामुळे आता वारकरी वर्ग नाराज आहे. ऐन वारीच्या तोंडवरचा हा प्रकार सध्या पंढरपुरात चर्चेत आहे. त्यामुळे आता वारकरी आक्रमक होण्याची शक्यता आहे.

लेपन प्रक्रिया पूर्ण

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या रूक्मिणी मातेच्या मूर्तीच्या चरणावरील‌ लेपन प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ही प्रक्रिया रात्री आणि दिवसा मिळून पाच ते सहा तास चालली होती. सिलिकॉन पावडर आणि इतर साहित्य वापरून झीज झालेल्या ठिकाणी चरण पूर्ववत केले. औरंगाबाद येथील भारतीय पुरातत्व विभागाचे अधिकारी श्रीकांत मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली ही लेपन‌ प्रक्रिया पार झाली.

पदस्पर्श दरर्शन‌ बंद राहणार

दरम्यान आज दिवसभर रूक्मिणी मातेचे नित्योपचार आणि पदस्पर्श दरर्शन‌ बंद राहणार आहे.रूक्मिणी मूर्तीच्या चरणाची झीज झाली होती. त्यानंतर भारतीय पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंदिरात येवून मूर्तीची पाहाणी केली होती. त्यानंतर काल रात्री मूर्तीच्या चरणावर लेपन प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आणि आज दुपारी ती प्रक्रिया पुर्ण झाली असल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

Follow Us
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका.
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी.
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची...
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची....
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार.
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर.
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश.
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.