AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजित पवार बुलढाण्यात का गेले नाहीत?, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले कारण

उबाठा गटाचे खासदार संजय राऊत म्हणतात, मंत्रालयातून अदृश्य फोन आला. तो कुणाचा होता. तो मुख्यमंत्र्यांचा होता की, गृहमंत्र्यांचा होता. त्यानंतर हा लाठीमार करण्यात आला.

अजित पवार बुलढाण्यात का गेले नाहीत?, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले कारण
Govinda Hatwar
Govinda Hatwar | Updated on: Sep 03, 2023 | 10:17 PM
Share

जालना, ३ सप्टेंबर २०२३ : जालन्यातील घटनेमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे काही आमदार नाराज असल्याचं बोललं जातं. याचं कारणामुळे अजित पवार शासन आपल्या दारी या कार्यक्रमात गेले नसल्याचं सांगितलं जातं. जालन्यातल्या घटनेनंतर बुलडाण्यात शासन आपल्या दारी हा कार्यक्रम झाला. या आधीच्या कार्यक्रमांना मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सोबत असायचे. लडाख दौऱ्यानिमित्त देवेंद्र फडणवीस हे भारतीय सैनिकांच्या कार्यक्रमाला गेले आहेत. तर अजित पवार प्रकृतीमुळे गैरहजर असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. अजित पवार यांच्या गावात म्हणजे बारामतीच्या काठेवाडीत मराठा आंदोलकांची निदर्शने झालीत. तेव्हा गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्या किंवा सत्तेतून बाहेर पडा अशी मागणी आंदोलकांनी केली. जालन्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं गेलं. डीवायएसपी यांना ताबडतोब जिल्ह्याच्या बाहेर पाठवण्याच्या सूचना दिल्याचं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

तो फोन कुणाचा?

शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड म्हणतात, काही विक्षिप्त पोलीस अधिकाऱ्यांमुळे लाठीचार्ज झाला. उद्या मुख्यमंत्री आमच्याकडे येणार आहेत. या प्रकरणाची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांना निलंबनाची मागणी करणार आहे. तर उबाठा गटाचे खासदार संजय राऊत म्हणतात, मंत्रालयातून अदृश्य फोन आला. तो कुणाचा होता. तो मुख्यमंत्र्यांचा होता की, गृहमंत्र्यांचा होता. त्यानंतर हा लाठीमार करण्यात आला.

बेछूट आरोप करणे थांबवा

संजय शिरसाट म्हणाले, मंत्रालयातून फोन आला हे संजय राऊत यांना माहीत असेल तर त्यांनी तातडीने माध्यमांसमोर सांगितलं पाहिजे. नाहीतर तुम्ही त्या कटकारस्थानामध्ये सहभागी होता, हे सांगितलं पाहिजे. बेछूट आरोप करण्यापेक्षा वस्तुस्थिती समोर आणली पाहिजे.

काही लोकं येऊन गेले. लोकांनी त्यांची जागा दाखवली. ज्या लोकांनी मराठा समाजाचा गळा घोटला ते लोकं तिथं गळाकाढायला आले होते. अशोक चव्हाण किंवा माजी मुख्यमंत्री असतील. आपल्या सरकारने २०१४, २०१७ मध्ये मराठा समाजाला आरक्षण दिलं. सर्वोच्च न्यायालयात प्रकरण गेलं. महाविकास आघाडीचं सरकार आलं. तिकडचं मिळालेलं आरक्षण गेलं, असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल