AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दहावी-बारावीची ATKT परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय, वर्षा गायकवाड यांची माहिती

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांची ऑक्टोबरमध्ये होणारी एटीकेटी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला (SSC HSC ATKT Exam Postpone ) आहे.

दहावी-बारावीची ATKT परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय, वर्षा गायकवाड यांची माहिती
| Updated on: Sep 02, 2020 | 7:51 PM
Share

मुंबई : राज्यातील दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांची ऑक्टोबरमध्ये होणारी एटीकेटी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. नुकतंच शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबतची माहिती दिली. (SSC HSC ATKT Exam Postpone )

दरवर्षी दहावी, बारावीच्या मुख्य परीक्षेत एटीकेटी मिळालेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा ऑक्टोबरमध्ये घेतली जाते. मात्र यंदा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.

या परीक्षा नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात घेतल्या जातील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेऊन याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी केली.

गेल्या काही वर्षांपासून दहावी, बारावीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना तात्काळ फेरपरीक्षा देऊन उत्तीर्ण होण्याची संधी देण्यात येते. माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी हा निर्णय घेतला होता. त्यानुसार दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर जुलै किंवा ऑगस्टमध्ये फेरपरीक्षा घेतली जायची. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जात नव्हते.

पण यंदा कोरोनामुळे या परीक्षांचे निकाल जुलैमध्ये लावण्यात आले. त्यामुळे फेरपरीक्षा घेण्यात आल्या नाहीत. यामुळे  अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष वाचवण्याची संधी मिळालेली नाही. दरम्यान लॉकडाऊनमुळे दहावीची भूगोल विषयाची परीक्षा देखील रद्द करण्यात आली होती. विद्यार्थ्यांना या विषयाचे सरासरी गुण देण्यात आले.

दरम्यान कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांंना कोरोनाचा फटका बसला आहे. याचा परीक्षा दहावी, बारावी यासह पदवी परीक्षांवर झाला आहे. त्यामुळे सध्या तरी दहावी, बारावीची फेरपरीक्षा घेतली जाणार नाही, असे वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले. (SSC HSC ATKT Exam Postpone )

संबंधित बातम्या :  

नाशिकमधील जुळ्या बहीण भावाला दहावीत समान टक्के, महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंद

SSC Result 2020 | राज्याचा दहावीचा निकाल 95.30 टक्के, कोणत्या विभागाचा निकाल किती टक्के?

Follow Us
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने एकच खळबळ
चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीच
Eknath Shinde | चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीचा आदेश!
राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा
Raj Thackeray | राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा; मोदींच्या मौनावर गंभीर सवाल
आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधान
Rohit Pawar | 'आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधानाने खळबळ
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात
मोठी बातमी! महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात; विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी
मुंबईत भीषण दुर्घटना! शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू
अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; सचिन अहिरांच्या प्रवेशानंतर शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही?
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
सोबत असलो तर चांगले, नाहीतर नालायक?; सचिन अहिरांचा ठाकरेंवर पलटवार
Sachin Ahir | सोबत असलो तर चांगले, नाहीतर नालायक?; शिंदे गटात जाताच सचिन अहिरांचा ठाकरेंवर पलटवार
पत्रकार परिषदेच्या पहिल्या वाक्यातच शिंदे म्हणाले 'असं काही' अन् पिकला
Eknath Shinde | पत्रकार परिषदेच्या पहिल्या वाक्यातच शिंदे म्हणाले 'असं काही' अन् पिकला हशा... सचिन अहिरदेखील... पहा व्हिडीओ