AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एसटी कर्मचाऱ्यांनी 10 मार्चच्या आत कामावर यावे; अन्यथा सारे पर्याय खुले, परबांचा इशारा

परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले की, आपण चर्चा करून विषय सोडवू शकतो. अनेक जण एसटी कर्मचाऱ्यांना भडकावत आहेत. आम्ही सदाभाऊ खोत यांचेही ऐकले होते. मात्र, प्रश्न सुटला नाही. त्यामुळे कोणीही वेगळ्या वाटा चोखाळू नये. तशाने काहीही होणार नाही. त्यामुळे भूलथापांना बळी न पडता कामावर यावे.

एसटी कर्मचाऱ्यांनी 10 मार्चच्या आत कामावर यावे; अन्यथा सारे पर्याय खुले, परबांचा इशारा
अनिल परब, परिवहन मंत्री.
| Updated on: Mar 04, 2022 | 2:44 PM
Share

मुंबईः एसटी कर्मचाऱ्यांनी 10 मार्चच्या आत कामावर यावे. अन्यथा सारे पर्याय खुले आहेत, असा इशारा शुक्रवारी परिवहन मंत्री अनिल परब यांनी माध्यमांशी बोलताना दिला. एसटी महामंडळाचे (MSRTC) राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करणे शक्य नाही, असे त्रिसदस्यीय समितीच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. राज्य सरकारने हा अहवाल न्यायालयात (Court) मांडला. त्यानंतर परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी हा अहवाल आज विधानसभेत पटलावर ठेवला. अपेक्षेप्रमाणे दुपारी परब यांनी माध्यमांशी संवाद साधला. एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा कामावर यावे आणि आपली सेवा सुरू करावी, असे आवाहन त्यांनी केले.

काय दिला इशारा?

परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले की, सध्या 52 हजार कर्मचारी कामावर नाहीत. त्यातील 30 हजार कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे. कोणाचे निलंबन झाले आहे, तर कोणाला बडतर्फीची नोटीस बजावली आहे. कोणाला बडतर्फ केले आहे. या कर्मचाऱ्यांनी येत्या दहा मार्चपर्यंत कामावर यावे. त्यांची रोजी-रोटी जावू नये, अशीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सरकारची इच्छा आहे. हे कर्मचारी कामावर आले, तर त्यांच्यावरील कारवाई मागे घेण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

बडतर्फांचे काय?

मंत्री परब म्हणाले की, ज्या कर्मचाऱ्यांना बडतर्फीची नोटीस दिलीय. ती मागे घेतली जाईल. ज्यांना बडतर्फ केले आहे, त्यांनी अपील करावे. नियमाप्रमाणे त्यांना कामावर घेतले जाईल. मात्र, ज्या कर्मचाऱ्यांना बडतर्फ होऊन तीन महिने झालेत. त्यांना अपील करता येणार नाही. मात्र, या कर्मचाऱ्यांना अपील करण्यासाठी आम्ही पंधरा दिवसांची मुदत देऊ. त्यांनी अपील करावे. त्यांनाही कामावर घेऊ. कोणाचेही नुकसान होणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले.

अन्यथा वेगळा विचार

मंत्री परब पुढे म्हणाले की, आपण चर्चा करून विषय सोडवू शकतो. अनेक जण एसटी कर्मचाऱ्यांना भडकावत आहेत. आम्ही सदाभाऊ खोत यांचेही ऐकले होते. मात्र, प्रश्न सुटला नाही. त्यामुळे कोणीही वेगळ्या वाटा चोखाळू नये. तशाने काहीही होणार नाही. त्यामुळे भूलथापांना बळी न पडता कामावर यावे. एसटी सर्वसामान्यांची आहे. सध्या बारावीच्या मुलांची परीक्षा सुरू आहे. त्यांचे हाल होत आहेत. मात्र, कर्मचारी कामावर आले नाही, तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.

इतर बातम्याः

अर्थमंत्री विरुद्ध ऊर्जामंत्री वादाचा 2 लाख 50 हजार उद्योजकांना फटका, या अधिवेशनात तरी तोडगा निघणार का?

नाशिकचे संमेलन फक्त भुजबळांचे, पंचतारांकितच्या भपक्यात धोरणाचा बळी; ठाले-पाटलांचे ताशेरे

युक्रेनहून आलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू देणार नाही, पंतप्रधानांशी बोलणार; मंत्री देशमुखांची ग्वाही

अजितदादांच्या विमान अपघाताबाबत मला शंका, रोहित पवारांचा खळबळजनक दावा
अजितदादांच्या विमान अपघाताबाबत मला शंका, रोहित पवारांचा खळबळजनक दावा.
अजितदादांच्या विमान अपघातावर रोहित पवारांचा मोठा दावा
अजितदादांच्या विमान अपघातावर रोहित पवारांचा मोठा दावा.
नारायण राणे यांची तब्येत बिघडली, मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल
नारायण राणे यांची तब्येत बिघडली, मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल.
अजित पवार यांनी सांगितलेल्या 3 निर्णयावर कॅबिनेट बैठकीत शिक्कामोर्तब
अजित पवार यांनी सांगितलेल्या 3 निर्णयावर कॅबिनेट बैठकीत शिक्कामोर्तब.
चंद्रपुरात भाजप- ठाकरे गटाची हातमिळवणी, सुषमा अंधारे यांचे मोठे विधान
चंद्रपुरात भाजप- ठाकरे गटाची हातमिळवणी, सुषमा अंधारे यांचे मोठे विधान.
अगोदर दिल्लीत बैठक, आता विलीनीकरणार फडणवीसांचे मोठे भाष्य
अगोदर दिल्लीत बैठक, आता विलीनीकरणार फडणवीसांचे मोठे भाष्य.
अजित पवारांच्या शेवटच्या सभेच्या ठिकाणी काय लागला निकाल?
अजित पवारांच्या शेवटच्या सभेच्या ठिकाणी काय लागला निकाल?.
सुनेत्रा पवारांनी पदभार स्वीकारताच रोहित पवार यांचं ट्विट
सुनेत्रा पवारांनी पदभार स्वीकारताच रोहित पवार यांचं ट्विट.
जिल्हा परिषदेत महायुती सुस्साट, मविआचा सुपडा साफ
जिल्हा परिषदेत महायुती सुस्साट, मविआचा सुपडा साफ.
दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी ट्रॅफिक पोलिस सरसावले
दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी ट्रॅफिक पोलिस सरसावले.