AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रवादी नवऱ्याच्या भूमिकेत, शिवसेना बायकोच्या तर काँग्रेस बिनबुलाये वऱ्हाडी, सुजय विखेंचा आघाडीवर घणाघात

गेली अडीच वर्षे राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस सरकार चालवत आहे. मात्र या आघाडीवर भाजप खासदार सुजय विखे (Sujay Vikhe Patil) यांनी घणाघाती टीका केली आहे. तसेच ईडीच्या कारवाईवरूनही त्यांनी सरकारवर निशाणा साधलाय.

राष्ट्रवादी नवऱ्याच्या भूमिकेत, शिवसेना बायकोच्या तर काँग्रेस बिनबुलाये वऱ्हाडी, सुजय विखेंचा आघाडीवर घणाघात
मी कधीही शिवसेना, मातोश्री आणि उद्धव ठाकरेंविरोधात बोललो नाही- सुजय विखे पाटीलImage Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Mar 27, 2022 | 2:20 PM
Share

अहमदनगर : शिवसेना आणि भाजपचा (Bjp-Shivsena Alliance) मागच्या विधानसभा निवडणुकीनंतर काडीमोड झाला. त्यानंतर राज्यात महाविकास (Mahavikas Aghadi) आघाडी स्थापन झाली. गेली अडीच वर्षे राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस सरकार चालवत आहे. मात्र या आघाडीवर भाजप खासदार सुजय विखे (Sujay Vikhe Patil) यांनी घणाघाती टीका केली आहे. तसेच ईडीच्या कारवाईवरूनही त्यांनी सरकारवर निशाणा साधलाय. महाविकास आघाडीचा संसार असा आहे, लग्न हे राष्ट्रवादी शिवसेनेचं आहे , राष्ट्रवादी हे नवऱ्याच्या भूमिकेत आहे, शिवसेना ही मूक बायकोच्या भूमिकेत आहे तर काँग्रेस हे बिनबुलाये वऱ्हाडी आहेत, त्यांना कितीही बोललं तरी हे जेवणाचा ताट सोडायला तयार नाहीत अशी टीका भाजप खासदार सुजय विखे यांनी केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून यावर जोरदार प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.

ईडीच्या कारवाईवरूनही हल्लाबोल

त्याचबरोबर राज्यातील ईडीच्या कारवाईवरून देखील त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. आम्ही तर त्यांना चोऱ्या करायला सांगितले नव्हते, ज्यांनी चोऱ्या केल्या, भ्रष्टाचार केला त्यांच्यावर कारवाई तर होणारच असं मत सुजय विखे यांनी व्यक्त केलं आहे. तर देशाचे पंतप्रधान म्हणतात की मी चौकीदार हूं त्यामुळे देशाचं संरक्षण करणं त्यांचं कर्तव्य आहे. जर तुम्ही भ्रष्टाचार केला नसेल तर पुरावे द्यावे, टीव्हीवर येऊन बोलण्याची काय गरज आहे असं विखे म्हटलंय. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात ईडीने कारवाईचा धडका लावला आहे. त्यावरून महाविकास आघाडी आणि भाजप अनेकदा आमनेसामने आले आहेत. त्यावरच आता सुजय विखे यांनीही अशी तिखट प्रतिक्रिया दिली आहे.

अजून खूप मोठी यादी तयार

किरीट सोमय्या यांना काल पोलिसांनी दिलेल्या वागणुकीबद्दल बोलताना , केंद्रीय मंत्र्यांना अटक करताना राज्य सरकारने कोणताही विचार केला नाही. आम्ही केवळ दोन मंत्री उचलले तर तुमची एवढी तळतळ होते, अजून तर खूप मोठी लिस्ट आहे असं विखे म्हणाले. त्याचबरोबर केंद्र शासनाच्या निधीतून अहमदनगर जिल्ह्यात जे रस्त्याचे काम झाले. त्याचे श्रेय राष्ट्रवादीचे काही आमदार घेतात. त्यांनी जराशी नैतिकता बाळगायला हवी असं म्हणत नाव न घेता त्यांनी आमदार रोहित पवार त्यांच्यावर निशाणा साधला.

काही नेते जात्यात, काही नेते सुपात, तर काहींचं पीठ झालं, चंद्रकांत पाटलांकडून डायरीच्या चौकशीचीही मागणी

Video | कोरोना काळात मुंबई मनपाला लुटलं, Devendra Fadnavis यांचा शिवसेनेवर घणाघात, 24 महिन्यांत 38 मालमत्ता!

Video | मोदी युगात चमच्यांची जागा अंधभक्तांनी घेतली; संजय राऊतांची चंद्रकांत पाटलांवर सडकून टीका

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.