ठाण्यात पाऊस सुरु, वाहतूक कोंडीतून मात्र नागरिकांची सुटका!

दोन दिवसांपूर्वी शीळ फाटा आणि कल्याण फाटा या भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळाली होती. मुसळधार पावसामुळे रस्त्यांना नदीचं स्वरुप आलं होतं. मात्र, आज ही परिस्थिती नाही. या भागात वाहतूक सुरळीत असल्याचं चित्र आज पाहायला मिळत आहे.

ठाण्यात पाऊस सुरु, वाहतूक कोंडीतून मात्र नागरिकांची सुटका!
ठाण्यात आज वाहतूक कोंडी नाही
Follow us
| Updated on: Jul 21, 2021 | 2:35 PM

ठाणे : गेल्या 2-3 दिवसांपासून सातत्याने पडणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका ठाणे, मुंब्रा, कळवा, शीळ फाटा, कल्याण फाटा परिसरात पाहायला मिळाला. सखोल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं चित्र अनेक भागात पाहायला मिळालं होतं. दोन दिवसांपूर्वी शीळ फाटा आणि कल्याण फाटा या भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळाली होती. मुसळधार पावसामुळे रस्त्यांना नदीचं स्वरुप आलं होतं. मात्र, आज ही परिस्थिती नाही. या भागात वाहतूक सुरळीत असल्याचं चित्र आज पाहायला मिळत आहे. (no traffic jam in Sheel Fata, Kalyan Fata area today)

ठाणे परिसरात काहीसा पाऊस सुरु आहे. असं असलं तरी आज शीळ फाटा आणि कल्याण फाटा परिसरात वाहतूक कोंडी नाही. त्यामुळे चाकरमान्यांना आणि अन्य मोठ्या वाहनांना आपल्या इप्सित स्थळी पोहोचण्यात अडचणी येत नसल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या शीळ फाटा, कल्याण फाटा, नवी मुंबईला जाणाऱ्या रस्त्यावर, तसंच ठाणे, मुंब्राकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक कोंडी नाही. त्यामुळे वाहतूक सुरुळीत सुरु असल्याचं चित्र आहे.

मंगळवारी प्रचंड वाहतूक कोंडी

दरम्यान, पावसाने काहिशी उसंत दिली असली तरी पावसामुळे चिखल आणि खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झाल्यानं काल ठाण्यात प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळाली होती. नाशिक महामार्गावर तर पाच ते सहा किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.

दोन दिवसाच्या मुसळधार पावसामुळे ठाणेकरांना काल वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. पाऊस थांबल्यानंतरही खाड्यांमुळे आणि रस्त्याच्या बाजूला चिखल झाल्यामुळे ठाणेकर पुन्हा वाहतूक कोंडीत अडकले होते. ठाणे-नाशिक हायवेवर नाशिककडे जाणाऱ्या मार्गिकेवर जवळपास पाच ते सहा किलोमीटरच्या वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. दुपारनंतर ही वाहतूक कोंडी वाढल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे नाशिकला जाणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. अनेक अवजड वाहने असल्याने वाहतूक कोंडी अधिकच निर्माण झाली होती.

रुग्णवाहिका अडकली

या वाहतूक कोंडीत एक रुग्णवाहिकाही अडकली होती. बराच वेळ ही रुग्णवाहिका अडकली होती. नंतर वाहतूक पोलिसांनी या रुग्णवाहिकेची वाहतूक कोंडीतून सुटका केली. खड्यामुळे निर्माण झालेली वाहतूक कोंडी काढण्यासाठी वाहतूक विभागाच्या नाकीनऊ येत आहेत. एमएमआरडीएच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन खड्डे भरण्याचे काम सुरू केलं. त्यामुळे वाहतूक कोंडी लवकरच सुटेल असं सांगितलं गेलं.

संबंधित बातम्या :

कल्याणमध्ये रस्त्यांची दुर्दशा, खड्ड्यांतून वाट काढताना प्रचंड हाल, कंत्राटदार, अधिकाऱ्यांवर कारवाई करा : भाजप

डोक्यावर मुसळधार पाऊस, शहरात ठिकठिकाणी पाणी साचलं, ठाण्याचे पालिका आयुक्त भर पावसात रस्त्यावर

no traffic jam in Sheel Fata, Kalyan Fata area today

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.