AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवार यांना काँग्रेसने पंतप्रधान होऊ दिलं नाही? अजित पवार बघा काय म्हणाले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्याबद्दल मोठा दावा केलाय. त्या दाव्यावर अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार यांनी त्यावेळची परिस्थिती नेमकी काय होती? याबाबत माहिती दिली.

शरद पवार यांना काँग्रेसने पंतप्रधान होऊ दिलं नाही? अजित पवार बघा काय म्हणाले
| Updated on: Aug 09, 2023 | 11:22 PM
Share

ठाणे | 9 ऑगस्ट 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीएच्या बैठकीत मोठा दावा केल्याची बातमी समोर आलीय. नरेंद्र मोदी यांनी नुकतीच दिल्लीत एनडीएच्या खासदारांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी काँग्रेसवर टीका केली. काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप केला. विशेष म्हणजे काँग्रसने शरद पवार यांना पंतप्रधान होऊ दिलं नाही, असा दावा नरेंद्र मोदी यांनी केला. तसेच काँग्रेस आणि शरद पवार यांनी चांगल्या लोकांना संधी देण्यापासून डावललं, असाही दावा मोदींनी केल्याची बातमी समोर आलेली.

नरेंद्र मोदी यांच्या या दाव्यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिलीय. “देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत:चं मत मांडलेलं आहे. आमच्या सारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी बोलणं उचित नाही. एकदा राज्यातील 48 पैकी 38 खासदारांनी शरद पवार यांना पंतप्रधान पदासाठी पाठिंबा दिला होता. पण नरसिंह रावांना त्यावेळी इतर राज्यातील खासदारांनी पाठिंबा दिला. ते पंतप्रधान झाले. शरद पवार यांना दोन-तीन वेळा पंतप्रधान पदाची संधी आली होती. पण ती पूर्ण झाली नाही”, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.

स्थानिक स्वाराज्य संस्थाच्या निवडणुका युतीत लढणार की नाही?

“स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका युतीने लढायचं का? याबाबत स्थानिक पातळीवर ठरवलं जाईल. सुप्रीम कोर्टात निवडणुकीचा विषय प्रलंबित आहे. निवडणुका लागल्यानंतर पक्षांची ताकद मर्यादीत असेल तिथे स्थानिक पातळीवर युतीला मुभा देवू. तीन पक्षातील एखादा पक्ष जिथं पावरफुल असेल तिकडे तो पक्ष लढेल”, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.

“प्रत्येक नागरिकांचं संरक्षण करणं समितीची जबाबदारी आहे. कुणाला कुठलं सरंक्षण दिलं पाहिजे हे समिती ठरवत असते. केंद्रीय निेतीन गडकरींना धमकीचे फोन आलेले होते. पोलीस अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती असते. जे कुणीही प्रमुख असतात ते त्यात हस्तक्षेप करत नाहीत”, असं अजित पवार म्हणाले.

“आम्ही राष्ट्रवादी म्हणून काम करत आहोत. आम्हाला नागालँडचा आम्हाला पाठिंबा आहे. एक सगळा परिवार एकसंघ परिवार राहावा. नवीन पिढीला काम करता यावं यासाठी कार्यक्रम आहे. कामातून कार्यकर्ता घडत असतो”, असं अजित पवार म्हणाले.

स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश
स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश.
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले...
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले....
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ.
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका.
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण...
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण....
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?.
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?.
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी...
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी....
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल.
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ.